शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याची यशोगाथा राज्यात : बनवडी अन् नागठाणे गावावर शासनाचा माहितीपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:28 IST

जिल्ह्याने आतापर्यंत विविध अभियान, उपक्रमात गौरवास्पद कामगिरी केली असून, बनवडी आणि नागठाणे गावातील घनकचरा व्यवस्थापन तर आदर्शवत आहे.

ठळक मुद्देघनकचरा व्यवस्थापन

सातारा : जिल्ह्याने आतापर्यंत विविध अभियान, उपक्रमात गौरवास्पद कामगिरी केली असून, बनवडी आणि नागठाणे गावातील घनकचरा व्यवस्थापन तर आदर्शवत आहे. आता तर राज्य शासनाच्या वतीने या गावातील घनकचरा व्यवस्थापनावर माहितीपट (डाक्युमेंट्री) तयार करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा पुन्हा राज्यात या यशोगाथेच्या निमित्ताने सर्वांसमोर जाणार आहे. जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

मागील १५ वर्षांपासून जिल्ह्याने विविध अभियान, उपक्रम व योजनांमध्ये नेत्रदीपक व यशस्वी काम केले आहे. काही दिवसांपूर्वी तर स्वच्छतेमुळे देशाच्या राजधानीत जिल्हा परिषदेचा गौरव झाला होता. आतातर आदर्श घनकचरा व्यवस्थानानेही सर्वदूर ख्याती मिळविली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा नावलौकिक सर्वदूर पोहोचला.

गेल्या वर्षभरापासून सातारा जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनावर भर दिला आहे. याचाच परिणाम म्हणजे अनेक गावांनी यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभागाची टीम कार्यरत राहून कामांचा पाठपुरावा करीत आहे.

कºहाड तालुक्यातील बनवडी आणि नागठाणे (ता. सातारा) येथील कचºयावर मात करण्यात ग्रामपंचायतीला यश आले. या दोन गावांत ओला व सुका या कचºयांसाठी घंटागाड्या आहेत. तसेच या कचºयापासून गांडूळखत निर्माण करण्यात येत आहे. या खतापासून ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळत असून, गावाच्या विकासासाठी ते वापरता येत आहे. बनवडी आणि नागठाणेतील घनकचरा व्यवस्थापनाची माहिती सर्वदूर पोहोचल्याने आता राज्य शासनालाही याची दखल घ्यावी लागली. त्यामुळेच या गावांवर माहितीपट तयार करण्यात येत आहे. हा माहितीपट यशोगाथा म्हणून दाखविण्यात येणार आहे.

बनवडी व नागठाणेत माहितीपटासाठी चित्रीकरण झाले. बनवडीत सरंपच, माजी सरपंच, ग्रामस्थांची मुलाखत घेण्यात आली. घनकचरा व्यवस्थानचे चित्रीकरण झाले. नागठाणे येथेही पथकाने चित्रीकरण केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे यांची मुलाखत घेण्यात आली. 

जिल्ह्यातील बनवडी आणि नागठाणे गावातील घनकचरा व्यवस्थापनवर डॉक्युमेंट्री तयार होत आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील अशी अनेक कामे आहेत ती इतरांना प्रेरणादायी ठरली आहेत. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छता टीम, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद या सर्वांचा सहभाग राहिला. लोकांनीही विश्वास दाखविला. त्यामुळेच हे यश मिळाले आहे.-डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद