शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

साताऱ्यावर अजूनही रेडझोनचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST

सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अक्षरशः कहर झाला. रुग्णवाढीचा दर ४० टक्क्यांच्या ...

सागर गुजर

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अक्षरशः कहर झाला. रुग्णवाढीचा दर ४० टक्क्यांच्या वर गेला होता. तो आता आटोक्यात येत असल्याचे चित्र असले तरीदेखील अजूनही धोक्याची पातळी कायम आहे. रुग्णवाढीचा सध्याचा दर १४.५१ टक्के असून जिल्ह्यावर रेडझोनचे सावट कायम आहे.

दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तर एप्रिल महिन्यापासून हजारात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे एका दिवसाला अडीच हजारांवर बाधित सापडले. सातारा तालुक्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या मोठी आहे. मे महिन्यात १० हजार ५८ बाधित सापडले तर २५५ जणांचा मृत्यू झाला. फलटणमध्ये ९ हजार ६९७ रुग्ण मे महिन्यात सापडले. खटाव तालुक्यात ५ हजार ९६७ रुग्ण सापडले.

मे महिन्यामध्ये सातारा तालुक्यात २५५, कऱ्हाडमध्ये १८२, फलटणमध्ये ५७, माणमध्ये ६०, खटावमध्ये १४६, कोरेगावमध्ये ७३, पाटणमध्ये ३६, वाईमध्ये १०४, जावळीत ६०, महाबळेश्वरमध्ये १० आणि खंडाळ्यात ४९ इतक्या बाधित रुग्णांना जीव गमवावा लागला. जिल्ह्यामध्ये बाधितांचे मृत्यू रोखण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरले आहे. या परिस्थितीमध्ये निर्बंध उठतील अशी परिस्थिती नाही.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे जनतेचे लक्ष

सातारा जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या मोठी असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्बंध लागू केले आहेत. ८ जूनपर्यंत या निर्बंधांना मुदतवाढ दिली आहे. सलग सोळा दिवसांपासून किराणा माल दुकाने, मंडई बंद आहे. घरपोच किराणा माल मिळत नसल्याने सामान्यांची कोंडी झालेली आहे. आठ तारखेनंतर निर्बंध वाढले तर खायचे काय, अशी चिंता सामान्य जनतेला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

लसीकरण मोहीम वेगाने राबवण्याची गरज

जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिमेला म्हणावी तेवढी गती अजून लाभलेली नाही. जिल्ह्याच्या लोकसंख्येची व्याप्ती लक्षात घेऊन लसीकरण केंद्रे वाढवण्याची आणि लसींची संख्या वाढविण्याची गरज आहे. शासनाकडून मोठ्या प्रमाणावर लसी मिळाल्या तर कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्य होऊ शकेल.

शिक्क्यांविनाच फिरतायत कोरोनाचे एक्के

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारले जात होते. दुसऱ्या लाटेत मात्र प्रशासन ढिले पडले. संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर ते बाधित आढळले तरीदेखील त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारले गेले नाहीत. बाधित रुग्ण इतर लोकांच्या संपर्कात आल्याने संसर्ग वाढला; परंतु अद्याप देखील प्रशासनाला याचे गांभीर्य नाही. शिक्क्यांविनाच फिरतायत कोरोनाचे एक्के अशी परिस्थिती असून स्थानिक स्वराज्य संस्थेला देखील याचे सोयरसुतक राहिलेले दिसत नाही.