शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

सातारा : मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर एसटीचा दुष्काळ, महामंडळाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 13:53 IST

शिवकालीन मार्ग म्हणून इतिहासात नोंद असलेल्या सातारा-औंध-पंढरपूर व मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गावर दिवसभर एकही बस धावत नसल्याने प्रवाशांना अन्य खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही सातारा, कऱ्हाड , वडूज, पाटण, पंढरपूर आगार प्रमुखांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

ठळक मुद्देमल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर एसटीचा दुष्काळमहामंडळाचे दुर्लक्ष खासगी वाहतुकीचा वापर करण्याची प्रवाशांवर वेळ

मायणी (सातारा) : शिवकालीन मार्ग म्हणून इतिहासात नोंद असलेल्या सातारा-औंध-पंढरपूर व मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गावर दिवसभर एकही बस धावत नसल्याने प्रवाशांना अन्य खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही सातारा, कऱ्हाड , वडूज, पाटण, पंढरपूर आगार प्रमुखांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.सातारा औंध मायणी, दिघंची, महूद, पंढरपूर या मार्गाची शिवकालीन मार्ग म्हणून ओळख आहे. महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडणारा रस्ता म्हणूनही याकडे पाहिले जात होते.

मल्हारपेठ-पाटण-उंब्रज-मसूर-मायणी-झरे-महूद-पंढरपूर हा राज्यमार्ग आहे. हे दोन्ही मार्ग सातारा, कऱ्हाड , खटाव, कोरेगाव, पाटण या तालुक्यांसह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, आटपाडी, खानापूर तालुक्यांतून जातो.या दोन्ही मार्गांवर मायणी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणावरून सातारा ७९, मल्हारपेठ ६५, पंढरपूर ९४ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र सातारा वगळता दिवसभर मायणी गावातून मल्हारपेठ, कऱ्हाड , पाटण, मसूर, पंढरपूरकडे जाण्यासाठी एकही बस नाही.

त्यामुळे प्रवाशांना विटा, कऱ्हाडमार्गे पाटण, मल्हारपेठला जावे लागते. पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना विटा, खानापूर किंवा म्हसवडमार्गे जावे लागते.आषाढी, कार्तिक या मोठ्या एकादशीसह महिन्यात येणाऱ्या एकादशींना पंढरपूरकडे जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. या मार्गावर एसटी बस नसल्याने या भक्तांना अन्य मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे वेळ व पैसा दोन्ही खर्च होतो.

या मार्गाशी संबंधित कऱ्हाड , पाटण, कोरेगाव, सातारा, पंढरपूर व खटाव तालुक्यांतील वडूज आगारांना एसटी बस सोडण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार होत आहे. मात्र त्याकडे सर्व आगारप्रमुखांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंडसह वेळ खर्च करावा लागत आहे.तीस किलोमीटरचा अधिक प्रवासपंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना विटा व म्हसवडमार्गे पंढरपूरला जावे लागते. त्यामुळे वीस ते तीस किलोमीटर अधिक प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ व पैसा अधिक खर्च होतो....म्हणे प्रवासीच कमीकऱ्हाड -पंढरपूर, कऱ्हाड -सोलापूर, पाटण-पंढरपूर, मायणी-पंढरपूर आदी बसेस पूर्वी या मार्गावर सुरू होत्या. मात्र प्रवाशांची संख्या कमी आहे. हे कारण पुढे करून या सर्व बसेस संबंधित आगाराने बंद केल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरstate transportराज्य परीवहन महामंडळ