शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

सातारा : मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर एसटीचा दुष्काळ, महामंडळाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 13:53 IST

शिवकालीन मार्ग म्हणून इतिहासात नोंद असलेल्या सातारा-औंध-पंढरपूर व मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गावर दिवसभर एकही बस धावत नसल्याने प्रवाशांना अन्य खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही सातारा, कऱ्हाड , वडूज, पाटण, पंढरपूर आगार प्रमुखांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

ठळक मुद्देमल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर एसटीचा दुष्काळमहामंडळाचे दुर्लक्ष खासगी वाहतुकीचा वापर करण्याची प्रवाशांवर वेळ

मायणी (सातारा) : शिवकालीन मार्ग म्हणून इतिहासात नोंद असलेल्या सातारा-औंध-पंढरपूर व मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गावर दिवसभर एकही बस धावत नसल्याने प्रवाशांना अन्य खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही सातारा, कऱ्हाड , वडूज, पाटण, पंढरपूर आगार प्रमुखांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.सातारा औंध मायणी, दिघंची, महूद, पंढरपूर या मार्गाची शिवकालीन मार्ग म्हणून ओळख आहे. महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडणारा रस्ता म्हणूनही याकडे पाहिले जात होते.

मल्हारपेठ-पाटण-उंब्रज-मसूर-मायणी-झरे-महूद-पंढरपूर हा राज्यमार्ग आहे. हे दोन्ही मार्ग सातारा, कऱ्हाड , खटाव, कोरेगाव, पाटण या तालुक्यांसह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, आटपाडी, खानापूर तालुक्यांतून जातो.या दोन्ही मार्गांवर मायणी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणावरून सातारा ७९, मल्हारपेठ ६५, पंढरपूर ९४ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र सातारा वगळता दिवसभर मायणी गावातून मल्हारपेठ, कऱ्हाड , पाटण, मसूर, पंढरपूरकडे जाण्यासाठी एकही बस नाही.

त्यामुळे प्रवाशांना विटा, कऱ्हाडमार्गे पाटण, मल्हारपेठला जावे लागते. पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना विटा, खानापूर किंवा म्हसवडमार्गे जावे लागते.आषाढी, कार्तिक या मोठ्या एकादशीसह महिन्यात येणाऱ्या एकादशींना पंढरपूरकडे जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. या मार्गावर एसटी बस नसल्याने या भक्तांना अन्य मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे वेळ व पैसा दोन्ही खर्च होतो.

या मार्गाशी संबंधित कऱ्हाड , पाटण, कोरेगाव, सातारा, पंढरपूर व खटाव तालुक्यांतील वडूज आगारांना एसटी बस सोडण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार होत आहे. मात्र त्याकडे सर्व आगारप्रमुखांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंडसह वेळ खर्च करावा लागत आहे.तीस किलोमीटरचा अधिक प्रवासपंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना विटा व म्हसवडमार्गे पंढरपूरला जावे लागते. त्यामुळे वीस ते तीस किलोमीटर अधिक प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ व पैसा अधिक खर्च होतो....म्हणे प्रवासीच कमीकऱ्हाड -पंढरपूर, कऱ्हाड -सोलापूर, पाटण-पंढरपूर, मायणी-पंढरपूर आदी बसेस पूर्वी या मार्गावर सुरू होत्या. मात्र प्रवाशांची संख्या कमी आहे. हे कारण पुढे करून या सर्व बसेस संबंधित आगाराने बंद केल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरstate transportराज्य परीवहन महामंडळ