शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

सातारा : शेंडा हिरवागार... बुंध्यांना आग, कास मार्ग भकासच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:05 IST

घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गाच्या सौंदर्याला विघ्नसंतोषींची दृष्ट लागली आहे. हिरव्यागार झाडांच्या बुंधक्याला अज्ञात लोक जाळ लावत असल्याने ते मरणयातना सहन करत आहेत. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. त्यामुळे कास मार्ग भकास होण्यास वेळ लागणार नाही.

ठळक मुद्देवणवा पेटविणाऱ्याकडून वनसंपदा दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर झाडे जीवंतपणी सोसतायत मरण यातनासातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळ कास, बामणोली मार्ग भकासच्या मार्गावर

पेट्री (सातारा) : घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गाच्या सौंदर्याला विघ्नसंतोषींची दृष्ट लागली आहे. हिरव्यागार झाडांच्या बुंधक्याला अज्ञात लोक जाळ लावत असल्याने ते मरणयातना सहन करत आहेत. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. त्यामुळे कास मार्ग भकास होण्यास वेळ लागणार नाही.

सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून कास, बामणोलीची ओळख आहे. देश_विदेशातून बहुसंख्य पर्यटक पर्यटनस्थळी वर्षभर भेटी देतात. धकाधकीच्या जीवनात मनाला प्रसन्नता, शुद्ध हवा, निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी बहुसंख्य पर्यटक परिसरात येतात.

येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मायेच्या सावलीचा सुखावह स्पर्श देण्यात मोलाचा वाटा येथील घनदाट झाडीझुडपे, वृक्षांचाच आहे. येथील बहुसंख्य वनसंपदेनेच निसर्गाचे सौंदर्य वाढविलेले आहे. परंतु वणवा पेटविणाऱ्याकडून वनसंपदा दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निसर्ग सौंदर्यही लोप पावले जाऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.वणवा लावणाऱ्यांकडून येथील परिसर भकास करण्याचाच जणू काही ठेका घेतल्याचे दिसत आहे. हा वणवा आता वृक्षांच्याच मुळांवर उठू लागला आहे. रोपट्यांचे मोठ्या वृक्षात रूपांतर होण्यास कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पावसापासून ही झाडे कित्येक वर्षे तग धरून पर्यावरणाचा संतुलन राखत असताना आता ही झाडे वणव्यात क्षणार्धातच जमीनदोस्त होऊ लागली आहेत.सातारा-कास मार्गावर दोन-तीन महिन्यांपासून ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी अंबानी ते पारंबे फाटा दरम्यान देवकल फाट्यानजीक पेटविलेल्या वणव्याने रस्त्यालगत तसेच आसपास काही झाडांच्या बुंध्यांनीच पेट घेतला. झाडांचे बुंधे आगीत धुपत असल्याने बुंध्यातून धुराचे लोट बाहेर पडत आहेत.

झाडांच्या बुंध्यांची राख होते तर त्यांच्या फांद्या व शेंड्याकडील भाग हिरवागार दिसत आहे. परंतु झाडांचा बुंधाच पेटला जाऊ लागल्याने ते निकामी होऊन काही झाडे उन्मळून पडली आहेत. अशा विकृत घटनांवर तत्काळ कठोर पाऊले उचलून कायदेशीर कारवाई केली गेली पाहीजे असे पर्यावरणप्रेमींचे मत व्यक्त होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनenvironmentवातावरण