शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

सातारा : शेंडा हिरवागार... बुंध्यांना आग, कास मार्ग भकासच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:05 IST

घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गाच्या सौंदर्याला विघ्नसंतोषींची दृष्ट लागली आहे. हिरव्यागार झाडांच्या बुंधक्याला अज्ञात लोक जाळ लावत असल्याने ते मरणयातना सहन करत आहेत. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. त्यामुळे कास मार्ग भकास होण्यास वेळ लागणार नाही.

ठळक मुद्देवणवा पेटविणाऱ्याकडून वनसंपदा दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर झाडे जीवंतपणी सोसतायत मरण यातनासातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळ कास, बामणोली मार्ग भकासच्या मार्गावर

पेट्री (सातारा) : घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गाच्या सौंदर्याला विघ्नसंतोषींची दृष्ट लागली आहे. हिरव्यागार झाडांच्या बुंधक्याला अज्ञात लोक जाळ लावत असल्याने ते मरणयातना सहन करत आहेत. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. त्यामुळे कास मार्ग भकास होण्यास वेळ लागणार नाही.

सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून कास, बामणोलीची ओळख आहे. देश_विदेशातून बहुसंख्य पर्यटक पर्यटनस्थळी वर्षभर भेटी देतात. धकाधकीच्या जीवनात मनाला प्रसन्नता, शुद्ध हवा, निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी बहुसंख्य पर्यटक परिसरात येतात.

येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मायेच्या सावलीचा सुखावह स्पर्श देण्यात मोलाचा वाटा येथील घनदाट झाडीझुडपे, वृक्षांचाच आहे. येथील बहुसंख्य वनसंपदेनेच निसर्गाचे सौंदर्य वाढविलेले आहे. परंतु वणवा पेटविणाऱ्याकडून वनसंपदा दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निसर्ग सौंदर्यही लोप पावले जाऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.वणवा लावणाऱ्यांकडून येथील परिसर भकास करण्याचाच जणू काही ठेका घेतल्याचे दिसत आहे. हा वणवा आता वृक्षांच्याच मुळांवर उठू लागला आहे. रोपट्यांचे मोठ्या वृक्षात रूपांतर होण्यास कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पावसापासून ही झाडे कित्येक वर्षे तग धरून पर्यावरणाचा संतुलन राखत असताना आता ही झाडे वणव्यात क्षणार्धातच जमीनदोस्त होऊ लागली आहेत.सातारा-कास मार्गावर दोन-तीन महिन्यांपासून ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी अंबानी ते पारंबे फाटा दरम्यान देवकल फाट्यानजीक पेटविलेल्या वणव्याने रस्त्यालगत तसेच आसपास काही झाडांच्या बुंध्यांनीच पेट घेतला. झाडांचे बुंधे आगीत धुपत असल्याने बुंध्यातून धुराचे लोट बाहेर पडत आहेत.

झाडांच्या बुंध्यांची राख होते तर त्यांच्या फांद्या व शेंड्याकडील भाग हिरवागार दिसत आहे. परंतु झाडांचा बुंधाच पेटला जाऊ लागल्याने ते निकामी होऊन काही झाडे उन्मळून पडली आहेत. अशा विकृत घटनांवर तत्काळ कठोर पाऊले उचलून कायदेशीर कारवाई केली गेली पाहीजे असे पर्यावरणप्रेमींचे मत व्यक्त होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनenvironmentवातावरण