शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पुसेसावळीची दंगल अन् समाजभान

By दीपक शिंदे | Updated: September 23, 2023 12:41 IST

दीपक शिंदे, मुख्य उपसंपादक, सातारा आक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून पुसेसावळीत दंगल उसळली. त्यात एका निरपराध्याचा बळी गेला. अनेकजण जखमी होऊन ...

दीपक शिंदे, मुख्य उपसंपादक, साताराआक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून पुसेसावळीत दंगल उसळली. त्यात एका निरपराध्याचा बळी गेला. अनेकजण जखमी होऊन जायबंदी झाले. घरांची तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ झाली. पुसेसावळीतील घटनेचे पडसाद जिल्हा आणि राज्यभर उमटले. पण, ही दंगल राजकारण्यांनी फारशी गांभीर्याने घेतलीच नाही असे जाणवले. दंगलीनंतर आठ दिवस कोणी पुसेसावळीकडे फिरकलेच नाही. जसे काही होतेय ते होऊ दे, आपल्याला काय त्याचे, अशा प्रकारची भावना दिसली. पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी मात्र, रोज त्या परिसरात जाऊन शांततेचे आवाहन करत होते. समाजातील संपत चाललेल्या माणुसकीचा हा दृश्य परिणाम तर नाही ना, असे वाटू लागले आहे.माणसा-माणसांमध्ये प्रेमभाव वाढावा यासाठी जातीव्यवस्था संपवून सर्व समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. जातीव्यवस्था आता फार लोकांच्या मनात राहिलेली नाही. पण, काहींच्या डोक्यात आहे. त्यातूनच अनेकांची डोकी फिरवण्याचे काम काही महाभाग करत आहेत. विसरत चाललेले जात आणि धर्माचे मायाजाल पुन्हा टाकण्याचा काहींचा प्रयत्न यशस्वी होऊ लागला आहे. एखाद्याला लक्ष्य करुन त्याचा बीमोड करण्याची भावना वाढू लागली आहे. आतापर्यंत सुपारी देऊन आणि शस्त्रांच्या सहाय्याने एकमेकांवर हल्ले केले जात होते.

पण, आता सुपारी दिली जाते पण, ती सोशल माध्यमांची सुपारी असते. मोबाइल हे माध्यम आणि सोशल मीडिया हा त्यातील शस्त्र झाला आहे. या शस्त्राचा चुकीच्या पद्धतीने वापर करुन एकमेकांवर हल्ले करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत आहे. डोकी भडकवून जीवघेण्या इतपत भावना भडकविल्या जात आहेत. त्या थांबविण्यासाठी राज्यातील सत्ताधारीही कमी पडत आहेत.एखाद्या ठिकाणी दंगल उसळल्यानंतर तिथल्या लोकप्रतिनिधीने ताबडतोब उपस्थित राहून लोकांना आवाहन करण्याची आवश्यकता होती. पण, पुसेसावळी ज्या मतदारसंघात येते त्या मतदारसंघाचे आमदार दहा दिवसांनंतर मतदारसंघात गेले. पालकमंत्र्यांचीही तीच अवस्था. केवळ खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखा खासदार दंगल झाल्यानंतर काही तासांतच पुसेसावळीत पोहोचून लोकांना शांततेचे आवाहन करुन आले. इतरांमध्ये तेवढे धाडस नव्हते का?

का होत असलेल्या प्रकाराशी काही देणेघेणेच नव्हते. दंगलीत ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, ज्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या त्यांना किती नुकसानभरपाई मिळाली? त्यांना कोणी दिलासा दिला का? दंगलीत काही झाले तरी चालते का? ज्या निरपराध युवकाचा बळी गेला त्याच्या कुटुंबीयांना कोणी मदत केली का ? अजून तरी कोणी मदत केल्याचे ऐकिवात नाही. कोणी कशाला सरकारनेही अजून किती मदत देणार हे जाहीर केलेले नाही. देणार की नाही हे सुद्धा स्पष्ट नाही. एवढी अनास्था दाखविल्यानंतर कुटुंबीयांनी न्यायाची काय अपेक्षा करायची.अनास्थेच्या या प्रकारात काही सामाजिक संघटना आक्रमक झाल्या. पण, त्यांनीही मोर्चासारखे हत्यार उगारायचे ठरविले. त्यातून पुन्हा ताणतणाव अधिकच वाढणार म्हटल्यावर त्यांच्यावरही बंदी आणली. पण, खऱ्या अर्थाने दंगलीच्या घटनेवर जर उपाय करायचा असेल तर त्यातील दंगलग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे. जी कोणीही आतापर्यंत केली नाही. केवळ शाब्दिक आश्वासनावर विसंबून चूल चालणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून मदतीची गरज आहे. तरच त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य होईल.

कोणतीही गोष्टी पुढे पाठविण्यापूर्वी करा विचार ( थिंक )आपल्या हातात असलेल्या मोबाइलवर शेकडो गोष्टी येत असतात. त्यातली आपण काही पाहतो, काही पाहत नाही आणि काही पाहून पुढे पाठवितो. पुढे पाठविताना काही गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे. आपण पुढे पाठवत असलेली गोष्ट खरी आहे का, त्यात सत्यता किती आहे, दुसरी गोष्ट समाजासाठी हानिकारक तर नाही ना ? तिसरी बाब त्यातून आपण कोणती माहिती प्रसारित करीत आहोत ? चौथी बाब त्यातून नकारात्मक भावना तर समाजात पसरणार नाहीत ना आणि पाचवी बाब त्यातून आपण पाठवत असलेल्या व्यक्तीला किंवा समाजाला काही चांगले ज्ञान मिळेल का ? या सर्वांचा विचार करा आणि मगच एखादी पोस्ट पुढे पाठवा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर