शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

सातारा : एकीकडे झाडांचे संवर्धन; दुसरीकडे वणवा, आगी लावण्याच्या घटनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 16:00 IST

प्रमुख पर्यटनस्थळ असणाऱ्या कास मार्गावरील गणेशखिंड पठार परिसरात गतवर्षी लावण्यात आलेल्या हजारो झाडांच्या संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून पाणी घातले जात आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र विघ्नसंतोषी लोकांकडून आगी लावण्याचा प्रकार होत आहे.

ठळक मुद्देकास परिसरात सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपांना पाणीदुसरीकडे मात्र विघ्नसंतोषी लोकांकडून आगी लावण्याचा प्रकार

पेट्री : प्रमुख पर्यटनस्थळ असणाऱ्या कास मार्गावरील गणेशखिंड पठार परिसरात गतवर्षी लावण्यात आलेल्या हजारो झाडांच्या संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून पाणी घातले जात आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र विघ्नसंतोषी लोकांकडून आगी लावण्याचा प्रकार होत आहे.देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या सातारा शहराच्या पश्चिमेकडील कास पठार परिसरात वारंवार लावण्यात आलेल्या वणव्याच्या आगीत आत्तापर्यंत शेकडो टन चारा नष्ट झाला आहे. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून लावण्यात आलेल्या वणव्याने कित्येक वृक्ष होरपळले गेले आहेत. वनसंपदेबरोबरच प्राणीही धोक्यात येऊ लागले आहेत. तसेच अनेक पशुपक्ष्यांच्या निवाºयाचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे.सामाजिक वनीकरण विभागाद्वारे या गणेशखिड परिसरात हजारोंच्या संख्येने पावसाळ्यात झाडे लावण्यात आली होती. या रोपांना महिन्यांतून दोनवेळा असे साधारण दर महिन्याला २२ टँकरद्वारे पाणी वृक्षसंगोपनासाठी घातले जात आहे.अविवेकी मनोवृत्ती असणाऱ्यांकडून एका बाजूला हा परिसर भकास करण्याचेच काम सुरू आहे. तर दुसऱ्या बाजुला समाजिक संस्था, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी तसेच प्रशासनाकडून जीवाचे रान करून वृक्षांचे रक्षण, संवर्धन करतानाचे चित्र दिसत आहे. 

सध्यस्थितीला वातावरणात दुपारच्यावेळी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. तसेच वणवा पेटविणाऱ्या विघ्नसंतुष्टी लोकांकडून झाडांचे संरक्षण करण्याची गरज आहे. ही जबाबदारी आपणा सर्वांवरच येऊन पडली आहे.- ओम जाधव,पर्यावरणप्रेमी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी