शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सातारा : एकीकडे झाडांचे संवर्धन; दुसरीकडे वणवा, आगी लावण्याच्या घटनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 16:00 IST

प्रमुख पर्यटनस्थळ असणाऱ्या कास मार्गावरील गणेशखिंड पठार परिसरात गतवर्षी लावण्यात आलेल्या हजारो झाडांच्या संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून पाणी घातले जात आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र विघ्नसंतोषी लोकांकडून आगी लावण्याचा प्रकार होत आहे.

ठळक मुद्देकास परिसरात सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपांना पाणीदुसरीकडे मात्र विघ्नसंतोषी लोकांकडून आगी लावण्याचा प्रकार

पेट्री : प्रमुख पर्यटनस्थळ असणाऱ्या कास मार्गावरील गणेशखिंड पठार परिसरात गतवर्षी लावण्यात आलेल्या हजारो झाडांच्या संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून पाणी घातले जात आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र विघ्नसंतोषी लोकांकडून आगी लावण्याचा प्रकार होत आहे.देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या सातारा शहराच्या पश्चिमेकडील कास पठार परिसरात वारंवार लावण्यात आलेल्या वणव्याच्या आगीत आत्तापर्यंत शेकडो टन चारा नष्ट झाला आहे. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून लावण्यात आलेल्या वणव्याने कित्येक वृक्ष होरपळले गेले आहेत. वनसंपदेबरोबरच प्राणीही धोक्यात येऊ लागले आहेत. तसेच अनेक पशुपक्ष्यांच्या निवाºयाचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे.सामाजिक वनीकरण विभागाद्वारे या गणेशखिड परिसरात हजारोंच्या संख्येने पावसाळ्यात झाडे लावण्यात आली होती. या रोपांना महिन्यांतून दोनवेळा असे साधारण दर महिन्याला २२ टँकरद्वारे पाणी वृक्षसंगोपनासाठी घातले जात आहे.अविवेकी मनोवृत्ती असणाऱ्यांकडून एका बाजूला हा परिसर भकास करण्याचेच काम सुरू आहे. तर दुसऱ्या बाजुला समाजिक संस्था, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी तसेच प्रशासनाकडून जीवाचे रान करून वृक्षांचे रक्षण, संवर्धन करतानाचे चित्र दिसत आहे. 

सध्यस्थितीला वातावरणात दुपारच्यावेळी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. तसेच वणवा पेटविणाऱ्या विघ्नसंतुष्टी लोकांकडून झाडांचे संरक्षण करण्याची गरज आहे. ही जबाबदारी आपणा सर्वांवरच येऊन पडली आहे.- ओम जाधव,पर्यावरणप्रेमी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी