सातारा : एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा उघडकीस येण्याचे प्रकरण साताऱ्यात पहिल्यांदाच उघडकीस आल्यामुळे पोलीस दलही खडबडून जागे झाले. बनावट नोटा प्रकरणाची पाळेमुळे पश्चिम बंगालपर्यंत पोहोचली असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे सातारा पोलिसांचे एक पथक शनिवारी पश्चिम बंगालला रवाना होणार आहे.दरम्यान आत्तापर्यंत पोलिसांनी सहाजणांना अटक केली असून त्यापैकी रणजित जितेंद्र बिश्वास (वय ३२, रा. कमछलबेरीया, जि, नदीया. पश्चिम बंगाल. सध्या रा. नेरे हिंजवडी, पुणे) याच्या पोलीस कोठडीत दि. १२ पर्यंत वाढ झाली आहे. तर खंडाप्पा बळीराम तुगावे (वय २९, रा. मंगळूर, ता. औसा, जि. लातूर. सध्या रा. नेरे दत्तवाडी, हिंजवडी पुणे), राहुल आण्णाराव सुरवसे (वय २४, रा. राणी अंकुलगा ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर. सध्या रा. नेरे दत्तवाडी पुणे), ज्ञानेश्वर भानुदास कसबे (वय २३, रा. हेळंब, ता. देवणी, जि. लातूर. सध्या रा. नेरे दत्तवाडी पुणे) आणि अनिकेत मनोहर सूर्यवंशी (वय १९, रा. हेळंब, जि. लातुर. सध्या रा. वडगावशेरी, पुणे), परमेश्वर भानुदास कचरे (वय २७, रा. हेळंब, ता. देवणी, जि. लातूर) यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या टोळीकडून आत्तापर्यंत अठरा हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालपर्यंत या टोळीचे धागेदोरे पोहोचले आहेत. आणखी कोणी या टोळीमध्ये आहे का, नोटा छापण्याचे ठिकाण नेमके कोठे आहे, यासंदर्भात सातारा पोलीस तपास करणार आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कदम यांच्या नेतृत्वाखाली सहाजणांचे पथक पश्चिम बंगालला शनिवारी रवाना होणार आहे. हे पथक परत आल्यानंतरच आणखी काही या प्रकारणातील माहिती उघडकीस होणार आहे. त्यामुळे सातारकरांना यासंदर्भात उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)सूृत्रधाराच्या कोठडीत वाढबनावट नोटा प्रकरणातील मुख्य सुत्रधार रणजित बिश्वास याच्या कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. या नोटा नेमक्या कुठून आल्या याचा पोलीस चौकशी करत आहेत.
सातारा पोलिसांचे पथक आज पश्चिम बंगालला जाणार
By admin | Updated: December 5, 2014 23:20 IST