शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

साताऱ्यात सहा महिन्यानंतर वाटाण्याला उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:44 IST

सातारा : मागील काही महिन्यांपासून पालेभाज्यांचा दर गडगडला असलातरी वाटाण्याला सहा महिन्यानंतर उच्चांकी दर मिळाला आहे. सातारा बाजार समितीत ...

सातारा : मागील काही महिन्यांपासून पालेभाज्यांचा दर गडगडला असलातरी वाटाण्याला सहा महिन्यानंतर उच्चांकी दर मिळाला आहे. सातारा बाजार समितीत क्विंटलला १० हजार रुपयांपर्यंत दर आला. यामुळे शेतकऱ्यांत आनंद असतानाच मंगळवारपासून कडक निर्बंधामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद औटघटकेचाच ठरणार आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत सोमवारी कांद्याची ३०८ क्विंटल आवक झाली. कांद्याला क्विंटलला ३०० पासून १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. कांद्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सातारा बाजार समितीत सोमवारी ३०७ वाहनांतून ९१५ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. बटाटा २३०, लसूण २० आणि आल्याची ८ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. बाजार समितीत गवारला १० किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. गवारचा दर अजूनही तेजीत आहे. तसेच शेवगा शेंगला ३०० ते ४०० पर्यंत दर आला. शेवगा शेंगेच्या दरात सुधारणा झाली. तर वांग्याला १० किलोला २०० ते ३०० रुपये दर मिळाला. टोमॅटो १०० ते १५०, कोबीला ८० ते १०० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजुनही कमीच मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला २०० ते २५० अन् दोडक्याला ४०० ते ५०० रुपये भाव आला.

बटाट्याला क्विंटलला १४०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बटाट्याचा दर स्थिर राहिला आहे. हिरव्या मिरचीला २ ते ३ हजारापर्यंत भाव आला. आल्याला १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. आले दरात पुन्हा उतार आला आहे. तर लसणाला क्विंटलला ८ हजारापर्यंत भाव आला. लसणाचा दरही पुन्हा थोडा वाढला आहे. विशेष म्हणजे वाटाण्याला भाव कमी होता. मात्र, दीड महिन्यापासून दरात सुधारणा झाली. सोमवारी तर सहा महिन्यांतील उच्चांकी दर मिळाला. क्विंटलला १० हजारापर्यंत भाव आला. अजूनही दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

चौकट :

आजपासून बाजार समित्या बंद...

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी कडक निर्बंध घातले आहेत. याची अंमलबजावणी मंगळवारपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या १ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना भाजीपालाच बाजार समितीत आणता येणार नाही. तसेच किरकोळ विक्रीही बंद आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

......................................................