शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
4
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
5
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
6
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
7
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
8
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
9
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
10
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
11
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
12
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
13
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
14
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
15
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
16
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
17
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
18
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
19
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
20
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात सहा महिन्यानंतर वाटाण्याला उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:44 IST

सातारा : मागील काही महिन्यांपासून पालेभाज्यांचा दर गडगडला असलातरी वाटाण्याला सहा महिन्यानंतर उच्चांकी दर मिळाला आहे. सातारा बाजार समितीत ...

सातारा : मागील काही महिन्यांपासून पालेभाज्यांचा दर गडगडला असलातरी वाटाण्याला सहा महिन्यानंतर उच्चांकी दर मिळाला आहे. सातारा बाजार समितीत क्विंटलला १० हजार रुपयांपर्यंत दर आला. यामुळे शेतकऱ्यांत आनंद असतानाच मंगळवारपासून कडक निर्बंधामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद औटघटकेचाच ठरणार आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत सोमवारी कांद्याची ३०८ क्विंटल आवक झाली. कांद्याला क्विंटलला ३०० पासून १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. कांद्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सातारा बाजार समितीत सोमवारी ३०७ वाहनांतून ९१५ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. बटाटा २३०, लसूण २० आणि आल्याची ८ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. बाजार समितीत गवारला १० किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. गवारचा दर अजूनही तेजीत आहे. तसेच शेवगा शेंगला ३०० ते ४०० पर्यंत दर आला. शेवगा शेंगेच्या दरात सुधारणा झाली. तर वांग्याला १० किलोला २०० ते ३०० रुपये दर मिळाला. टोमॅटो १०० ते १५०, कोबीला ८० ते १०० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजुनही कमीच मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला २०० ते २५० अन् दोडक्याला ४०० ते ५०० रुपये भाव आला.

बटाट्याला क्विंटलला १४०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बटाट्याचा दर स्थिर राहिला आहे. हिरव्या मिरचीला २ ते ३ हजारापर्यंत भाव आला. आल्याला १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. आले दरात पुन्हा उतार आला आहे. तर लसणाला क्विंटलला ८ हजारापर्यंत भाव आला. लसणाचा दरही पुन्हा थोडा वाढला आहे. विशेष म्हणजे वाटाण्याला भाव कमी होता. मात्र, दीड महिन्यापासून दरात सुधारणा झाली. सोमवारी तर सहा महिन्यांतील उच्चांकी दर मिळाला. क्विंटलला १० हजारापर्यंत भाव आला. अजूनही दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

चौकट :

आजपासून बाजार समित्या बंद...

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी कडक निर्बंध घातले आहेत. याची अंमलबजावणी मंगळवारपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या १ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना भाजीपालाच बाजार समितीत आणता येणार नाही. तसेच किरकोळ विक्रीही बंद आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

......................................................