शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

साताऱ्यात सहा महिन्यानंतर वाटाण्याला उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:44 IST

सातारा : मागील काही महिन्यांपासून पालेभाज्यांचा दर गडगडला असलातरी वाटाण्याला सहा महिन्यानंतर उच्चांकी दर मिळाला आहे. सातारा बाजार समितीत ...

सातारा : मागील काही महिन्यांपासून पालेभाज्यांचा दर गडगडला असलातरी वाटाण्याला सहा महिन्यानंतर उच्चांकी दर मिळाला आहे. सातारा बाजार समितीत क्विंटलला १० हजार रुपयांपर्यंत दर आला. यामुळे शेतकऱ्यांत आनंद असतानाच मंगळवारपासून कडक निर्बंधामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद औटघटकेचाच ठरणार आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत सोमवारी कांद्याची ३०८ क्विंटल आवक झाली. कांद्याला क्विंटलला ३०० पासून १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. कांद्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सातारा बाजार समितीत सोमवारी ३०७ वाहनांतून ९१५ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. बटाटा २३०, लसूण २० आणि आल्याची ८ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. बाजार समितीत गवारला १० किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. गवारचा दर अजूनही तेजीत आहे. तसेच शेवगा शेंगला ३०० ते ४०० पर्यंत दर आला. शेवगा शेंगेच्या दरात सुधारणा झाली. तर वांग्याला १० किलोला २०० ते ३०० रुपये दर मिळाला. टोमॅटो १०० ते १५०, कोबीला ८० ते १०० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजुनही कमीच मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला २०० ते २५० अन् दोडक्याला ४०० ते ५०० रुपये भाव आला.

बटाट्याला क्विंटलला १४०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बटाट्याचा दर स्थिर राहिला आहे. हिरव्या मिरचीला २ ते ३ हजारापर्यंत भाव आला. आल्याला १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. आले दरात पुन्हा उतार आला आहे. तर लसणाला क्विंटलला ८ हजारापर्यंत भाव आला. लसणाचा दरही पुन्हा थोडा वाढला आहे. विशेष म्हणजे वाटाण्याला भाव कमी होता. मात्र, दीड महिन्यापासून दरात सुधारणा झाली. सोमवारी तर सहा महिन्यांतील उच्चांकी दर मिळाला. क्विंटलला १० हजारापर्यंत भाव आला. अजूनही दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

चौकट :

आजपासून बाजार समित्या बंद...

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी कडक निर्बंध घातले आहेत. याची अंमलबजावणी मंगळवारपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या १ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना भाजीपालाच बाजार समितीत आणता येणार नाही. तसेच किरकोळ विक्रीही बंद आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

......................................................