शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

साताऱ्यात सहा महिन्यानंतर वाटाण्याला उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:44 IST

सातारा : मागील काही महिन्यांपासून पालेभाज्यांचा दर गडगडला असलातरी वाटाण्याला सहा महिन्यानंतर उच्चांकी दर मिळाला आहे. सातारा बाजार समितीत ...

सातारा : मागील काही महिन्यांपासून पालेभाज्यांचा दर गडगडला असलातरी वाटाण्याला सहा महिन्यानंतर उच्चांकी दर मिळाला आहे. सातारा बाजार समितीत क्विंटलला १० हजार रुपयांपर्यंत दर आला. यामुळे शेतकऱ्यांत आनंद असतानाच मंगळवारपासून कडक निर्बंधामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद औटघटकेचाच ठरणार आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत सोमवारी कांद्याची ३०८ क्विंटल आवक झाली. कांद्याला क्विंटलला ३०० पासून १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. कांद्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सातारा बाजार समितीत सोमवारी ३०७ वाहनांतून ९१५ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. बटाटा २३०, लसूण २० आणि आल्याची ८ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. बाजार समितीत गवारला १० किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. गवारचा दर अजूनही तेजीत आहे. तसेच शेवगा शेंगला ३०० ते ४०० पर्यंत दर आला. शेवगा शेंगेच्या दरात सुधारणा झाली. तर वांग्याला १० किलोला २०० ते ३०० रुपये दर मिळाला. टोमॅटो १०० ते १५०, कोबीला ८० ते १०० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजुनही कमीच मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला २०० ते २५० अन् दोडक्याला ४०० ते ५०० रुपये भाव आला.

बटाट्याला क्विंटलला १४०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बटाट्याचा दर स्थिर राहिला आहे. हिरव्या मिरचीला २ ते ३ हजारापर्यंत भाव आला. आल्याला १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. आले दरात पुन्हा उतार आला आहे. तर लसणाला क्विंटलला ८ हजारापर्यंत भाव आला. लसणाचा दरही पुन्हा थोडा वाढला आहे. विशेष म्हणजे वाटाण्याला भाव कमी होता. मात्र, दीड महिन्यापासून दरात सुधारणा झाली. सोमवारी तर सहा महिन्यांतील उच्चांकी दर मिळाला. क्विंटलला १० हजारापर्यंत भाव आला. अजूनही दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

चौकट :

आजपासून बाजार समित्या बंद...

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी कडक निर्बंध घातले आहेत. याची अंमलबजावणी मंगळवारपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या १ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना भाजीपालाच बाजार समितीत आणता येणार नाही. तसेच किरकोळ विक्रीही बंद आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

......................................................