शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सातारा : लढाईला विराम; राजकारणाला जोर लोकसभा उमेदवारी : उदयनराजेंची भिस्त पवारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:22 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अखेर चर्चेचे दरवाजे उघडले आहेत. लोकसभा उमेदवारीवरून खासदार उदयनराजे भोसले व पक्षाच्या इतर नेत्यांमध्ये सुरू असलेल्या समोरासमोरील लढाईला या निमित्ताने विराम मिळाला. मात्र पक्षांतर्गत तिकीट काटाकाटीच्या राजकारणाने भलताच जोर धरला आहे

ठळक मुद्दे लढाईला विराम; राजकारणाला जोर लोकसभा उमेदवारी : उदयनराजेंची भिस्त पवारांवर

सागर गुजर ।सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अखेर चर्चेचे दरवाजे उघडले आहेत. लोकसभा उमेदवारीवरून खासदार उदयनराजे भोसले व पक्षाच्या इतर नेत्यांमध्ये सुरू असलेल्या समोरासमोरील लढाईला या निमित्ताने विराम मिळाला. मात्र पक्षांतर्गत तिकीट काटाकाटीच्या राजकारणाने भलताच जोर धरला आहे.लोकसभा निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले तिसऱ्यांदा इच्छुक आहेत.

राष्ट्रवादीची उमेदवारी पुन्हा एकदा मिळावी, यासाठी त्यांनी जोर लावला आहे. यावेळी मात्र पक्षाच्या आमदारांचाच त्यांना जोरदार विरोध आहे. सोमवारी बारामतीत गोविंदबाग येथे झालेल्या बैठकीतही आमदारांनी आपला विरोध खासदार पवारांसमोर व्यक्त केला. (असा कोणताही विरोध आमदारांनी या बैठकीत केला नाही, असे स्पष्टीकरण खा. पवारांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना केले.) तरीही पवारांनी अपेक्षित निर्णय घेतला नसल्याने ही आमदार मंडळी निराश होऊन पुन्हा साताºयात परतली. पवारांच्या मनातील कुणालाच काही ओळखता आलं नाही. दुसºया बाजूला पुण्यातील मोतिबाग या पवारांच्या निवासस्थानी उदयनराजेंनाही आठ दिवस थांबण्याचा सल्ला दिला.

पवारांना काहीही करून साताऱ्याची जागा हातातून सोडायची नाही. एका बाजूला भाजपचे नेते जिल्ह्यात येऊन बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची भाषा वापरतात, तर दुसऱ्या बाजूला आपल्याच पक्षांतर्गत असणारा गृह कलह थांबविण्यासाठी पवारांना आपला राजकारणातील अनुभव कामाला लावावा लागत आहे. राजकारणातील पीक पेरणीपासून काढणीपर्यंत जे काही लागतं, याची इत्यंभूत माहिती असणाऱ्या या कसदार नेत्यापुढे सध्या मोठा पेचप्रसंग उभा आहे. मात्र, यातूनही मार्ग काढण्यासाठी पवारांनी आपली तिसरी फळी कामाला लावली आहे. बारामतीचे नेते असले तरी सातारा जिल्ह्यातील छोट्या कार्यकर्त्यालाही नावासकट ओळखणाºया पवारांची हीच अभ्यासू नीती या निमित्ताने उपयोगात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

दस्तुरखुद्द पवारांनीच चर्चेचे दरवाजे खुले केल्याने एकमेकांवर तोंडसुख घेण्याबाबत नेतेमंडळींनी आवर घातल्याचे पाहायला मिळते. समोरासमोरील लढाईला सध्या विराम देण्यात आला आहे. मात्र काटाकाटीचे राजकारण जोर धरू लागले आहे.

लोकसभा निवडणुकांनंतर झालेल्या विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात खा. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी नेत्यांना अडचणीत आणल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षाचा खासदार असतानाही निर्णय घेताना आपल्याला जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्याचा आक्षेप खासदार उदयनराजे यांनी घेतला आहे. आता यातून कोणता सुवर्णमध्य काढला जातोय, ते खा. पवारांनाच माहित! तसेही त्यांनी सिक्कीमचे माजी राज्यपाल व आपले महाविद्यालयीन मित्र श्रीनिवास पाटील यांच्या रुपाने हुकुमाचे पान आपल्याजवळ राखून ठेवलेले आहेच.पवारांची तिसऱ्या फळीकडूनही अपेक्षापवारांनी उदयनराजेंचे ऐकले, आमदारांशी दोनदा चर्चा केली. आता या तिसºया ‘डोळ्यांचा’ ते वापर करणार आहेत. कोणाचं बळ किती? याची माहिती एव्हाना घेण्याचे काम सुरू झाले आहे. जे कार्यकर्ते ‘फोकस’मध्ये नाहीत; पण ज्यांचा अनुभव दांडगा आहे. राजकीय परिस्थितीची ज्यांना चांगली समज आहे, अशा कार्यकर्त्यांची मतेही खा. पवार जाणून घेत आहेत.

टॅग्स :police parade groundपोलिस कवायत मैदानSatara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवार