शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात कांदा महागच<bha>;</bha> चार हजार रुपये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:34 IST

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली तरी दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत ...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली तरी दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत आहे, तर मंडईत चांगला कांदा ५० रुपयांच्या पुढे आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर बाजार समितीत गवार अन् हिरवी मिरची भाव खात असून कोबी, टोमॅटो अजूनही स्वस्तच आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. पण, सध्या कांद्याची चांगली आवक होत असली तरी दर वाढलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत. बाजार समितीत रविवारी फळभाज्यांची एकूण ६०४ क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची २४५ क्विंटलची आवक झाली. क्विंटलला अडीच हजारपासून चार हजारापर्यंत भाव आला, तर वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ८० ते १२० अन् कोबीला २० ते ३० रुपये १० किलोला मिळाले.

पाऊचचा दर वाढला...

मागील काही आठवड्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत. सध्या सूर्यफूल तेल डबा २०३० ते २१३० रुपयांना मिळत आहे. सोयाबीनचा तेल डबा १९५० ते २ हजार, शेंगतेलाचा २१०० ते २३५० आणि पामतेलाचा डबा १७०० ते १७६० रुपयांना मिळू लागलाय, तर एक लिटरच्या खाद्यतेल पाऊचमागे सरासरी चार रुपये वाढ झालेली आहे.

खरबुजाची आवक...

सातारा बाजार समितीत सफरचंद, संत्री, चिक्कू, द्राक्षे, कलिंगड तसेच खरबुजाचीही आवक झाली. कलिंगडाबरोबरच खरबुजाला मागणी वाढल्याचे दिसून आले.

आलं स्वस्तच...

बाजार समितीत कांदा, लसूण, गवार, शेवग्याचा दर टिकून आहे. मात्र, अनेक भाज्यांना दर मिळत नाही. दोडक्याला १० किलोला ३०० ते ३५० रुपये भाव आला. मिरचीला ३०० ते ४५० रुपये, भेंडी ४०० ते ४२०, शेवग्याला १० किलोला ३०० ते ४०० रुपये भाव आला. आले, वाटाणा अजून स्वस्तच आहे.

साताऱ्यातील मंडईत भाज्यांचे दर अजूनही ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. पण, कांद्याचा दर वाढत चालला आहे. चांगला कांदा ६० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.

- राजाराम यादव, ग्राहक

मागील आठ दिवसांपासून कांद्याला उठाव आहे. त्यामुळे दर वाढत चाललाय. सध्या चार हजारांपर्यंत क्विंटलला दर मिळत आहे, तर बाजारात बसून विकायचा झाला, तर दर वाढून मिळतोय.

- नारायण साळुंखे, शेतकरी

खाद्यतेलाबाबत पाश्चात्य मार्केट तेजीतच आहे. त्यातच भारत देश आयातीवरच बहुतांशी अवलंबून आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत. सध्या १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते १०० रुपये वाढ झाली.

- संभाजी आगुंडे, तेल विक्री प्रतिनिधी