शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

साताऱ्यात कांदा महागच<bha>;</bha> चार हजार रुपये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:34 IST

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली तरी दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत ...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली तरी दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत आहे, तर मंडईत चांगला कांदा ५० रुपयांच्या पुढे आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर बाजार समितीत गवार अन् हिरवी मिरची भाव खात असून कोबी, टोमॅटो अजूनही स्वस्तच आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. पण, सध्या कांद्याची चांगली आवक होत असली तरी दर वाढलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत. बाजार समितीत रविवारी फळभाज्यांची एकूण ६०४ क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची २४५ क्विंटलची आवक झाली. क्विंटलला अडीच हजारपासून चार हजारापर्यंत भाव आला, तर वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ८० ते १२० अन् कोबीला २० ते ३० रुपये १० किलोला मिळाले.

पाऊचचा दर वाढला...

मागील काही आठवड्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत. सध्या सूर्यफूल तेल डबा २०३० ते २१३० रुपयांना मिळत आहे. सोयाबीनचा तेल डबा १९५० ते २ हजार, शेंगतेलाचा २१०० ते २३५० आणि पामतेलाचा डबा १७०० ते १७६० रुपयांना मिळू लागलाय, तर एक लिटरच्या खाद्यतेल पाऊचमागे सरासरी चार रुपये वाढ झालेली आहे.

खरबुजाची आवक...

सातारा बाजार समितीत सफरचंद, संत्री, चिक्कू, द्राक्षे, कलिंगड तसेच खरबुजाचीही आवक झाली. कलिंगडाबरोबरच खरबुजाला मागणी वाढल्याचे दिसून आले.

आलं स्वस्तच...

बाजार समितीत कांदा, लसूण, गवार, शेवग्याचा दर टिकून आहे. मात्र, अनेक भाज्यांना दर मिळत नाही. दोडक्याला १० किलोला ३०० ते ३५० रुपये भाव आला. मिरचीला ३०० ते ४५० रुपये, भेंडी ४०० ते ४२०, शेवग्याला १० किलोला ३०० ते ४०० रुपये भाव आला. आले, वाटाणा अजून स्वस्तच आहे.

साताऱ्यातील मंडईत भाज्यांचे दर अजूनही ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. पण, कांद्याचा दर वाढत चालला आहे. चांगला कांदा ६० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.

- राजाराम यादव, ग्राहक

मागील आठ दिवसांपासून कांद्याला उठाव आहे. त्यामुळे दर वाढत चाललाय. सध्या चार हजारांपर्यंत क्विंटलला दर मिळत आहे, तर बाजारात बसून विकायचा झाला, तर दर वाढून मिळतोय.

- नारायण साळुंखे, शेतकरी

खाद्यतेलाबाबत पाश्चात्य मार्केट तेजीतच आहे. त्यातच भारत देश आयातीवरच बहुतांशी अवलंबून आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत. सध्या १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते १०० रुपये वाढ झाली.

- संभाजी आगुंडे, तेल विक्री प्रतिनिधी