शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात कांदा महागच<bha>;</bha> चार हजार रुपये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:34 IST

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली तरी दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत ...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली तरी दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत आहे, तर मंडईत चांगला कांदा ५० रुपयांच्या पुढे आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर बाजार समितीत गवार अन् हिरवी मिरची भाव खात असून कोबी, टोमॅटो अजूनही स्वस्तच आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. पण, सध्या कांद्याची चांगली आवक होत असली तरी दर वाढलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत. बाजार समितीत रविवारी फळभाज्यांची एकूण ६०४ क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची २४५ क्विंटलची आवक झाली. क्विंटलला अडीच हजारपासून चार हजारापर्यंत भाव आला, तर वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ८० ते १२० अन् कोबीला २० ते ३० रुपये १० किलोला मिळाले.

पाऊचचा दर वाढला...

मागील काही आठवड्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत. सध्या सूर्यफूल तेल डबा २०३० ते २१३० रुपयांना मिळत आहे. सोयाबीनचा तेल डबा १९५० ते २ हजार, शेंगतेलाचा २१०० ते २३५० आणि पामतेलाचा डबा १७०० ते १७६० रुपयांना मिळू लागलाय, तर एक लिटरच्या खाद्यतेल पाऊचमागे सरासरी चार रुपये वाढ झालेली आहे.

खरबुजाची आवक...

सातारा बाजार समितीत सफरचंद, संत्री, चिक्कू, द्राक्षे, कलिंगड तसेच खरबुजाचीही आवक झाली. कलिंगडाबरोबरच खरबुजाला मागणी वाढल्याचे दिसून आले.

आलं स्वस्तच...

बाजार समितीत कांदा, लसूण, गवार, शेवग्याचा दर टिकून आहे. मात्र, अनेक भाज्यांना दर मिळत नाही. दोडक्याला १० किलोला ३०० ते ३५० रुपये भाव आला. मिरचीला ३०० ते ४५० रुपये, भेंडी ४०० ते ४२०, शेवग्याला १० किलोला ३०० ते ४०० रुपये भाव आला. आले, वाटाणा अजून स्वस्तच आहे.

साताऱ्यातील मंडईत भाज्यांचे दर अजूनही ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. पण, कांद्याचा दर वाढत चालला आहे. चांगला कांदा ६० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.

- राजाराम यादव, ग्राहक

मागील आठ दिवसांपासून कांद्याला उठाव आहे. त्यामुळे दर वाढत चाललाय. सध्या चार हजारांपर्यंत क्विंटलला दर मिळत आहे, तर बाजारात बसून विकायचा झाला, तर दर वाढून मिळतोय.

- नारायण साळुंखे, शेतकरी

खाद्यतेलाबाबत पाश्चात्य मार्केट तेजीतच आहे. त्यातच भारत देश आयातीवरच बहुतांशी अवलंबून आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत. सध्या १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते १०० रुपये वाढ झाली.

- संभाजी आगुंडे, तेल विक्री प्रतिनिधी