शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

साताऱ्यात कांदा महागच<bha>;</bha> चार हजार रुपये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:34 IST

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली तरी दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत ...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली तरी दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत आहे, तर मंडईत चांगला कांदा ५० रुपयांच्या पुढे आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर बाजार समितीत गवार अन् हिरवी मिरची भाव खात असून कोबी, टोमॅटो अजूनही स्वस्तच आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. पण, सध्या कांद्याची चांगली आवक होत असली तरी दर वाढलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत. बाजार समितीत रविवारी फळभाज्यांची एकूण ६०४ क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची २४५ क्विंटलची आवक झाली. क्विंटलला अडीच हजारपासून चार हजारापर्यंत भाव आला, तर वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ८० ते १२० अन् कोबीला २० ते ३० रुपये १० किलोला मिळाले.

पाऊचचा दर वाढला...

मागील काही आठवड्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत. सध्या सूर्यफूल तेल डबा २०३० ते २१३० रुपयांना मिळत आहे. सोयाबीनचा तेल डबा १९५० ते २ हजार, शेंगतेलाचा २१०० ते २३५० आणि पामतेलाचा डबा १७०० ते १७६० रुपयांना मिळू लागलाय, तर एक लिटरच्या खाद्यतेल पाऊचमागे सरासरी चार रुपये वाढ झालेली आहे.

खरबुजाची आवक...

सातारा बाजार समितीत सफरचंद, संत्री, चिक्कू, द्राक्षे, कलिंगड तसेच खरबुजाचीही आवक झाली. कलिंगडाबरोबरच खरबुजाला मागणी वाढल्याचे दिसून आले.

आलं स्वस्तच...

बाजार समितीत कांदा, लसूण, गवार, शेवग्याचा दर टिकून आहे. मात्र, अनेक भाज्यांना दर मिळत नाही. दोडक्याला १० किलोला ३०० ते ३५० रुपये भाव आला. मिरचीला ३०० ते ४५० रुपये, भेंडी ४०० ते ४२०, शेवग्याला १० किलोला ३०० ते ४०० रुपये भाव आला. आले, वाटाणा अजून स्वस्तच आहे.

साताऱ्यातील मंडईत भाज्यांचे दर अजूनही ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. पण, कांद्याचा दर वाढत चालला आहे. चांगला कांदा ६० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.

- राजाराम यादव, ग्राहक

मागील आठ दिवसांपासून कांद्याला उठाव आहे. त्यामुळे दर वाढत चाललाय. सध्या चार हजारांपर्यंत क्विंटलला दर मिळत आहे, तर बाजारात बसून विकायचा झाला, तर दर वाढून मिळतोय.

- नारायण साळुंखे, शेतकरी

खाद्यतेलाबाबत पाश्चात्य मार्केट तेजीतच आहे. त्यातच भारत देश आयातीवरच बहुतांशी अवलंबून आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत. सध्या १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते १०० रुपये वाढ झाली.

- संभाजी आगुंडे, तेल विक्री प्रतिनिधी