शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : न्हावी बुद्रुक, वेळू संपूर्ण माळरान ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 18:09 IST

ज्या माळरानावर कोणतेच पीक येत नव्हते. त्या कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक, वेळूतील शेतकरी बागायत पिके घेतआहेत. ही सारी किमया पाण्याची आहे. आता या दोन्ही गावांची १०० टक्के ठिबककडे वाटचाल सुरू आहे. वर्षभरात संपूर्ण कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा या दोन्ही गावांनी उचलला आहे.

ठळक मुद्देशेतकरी घेत आहेत आता बागायती पिकेन्हावी बुद्रुक, वेळू माळरानावर संपूर्ण कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा

सातारा : ज्या माळरानावर कोणतेच पीक येत नव्हते. त्या कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक, वेळूतील शेतकरी बागायत पिके घेतआहेत. ही सारी किमया पाण्याची आहे. आता या दोन्ही गावांची १०० टक्के ठिबककडे वाटचाल सुरू आहे. वर्षभरात संपूर्ण कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा या दोन्ही गावांनी उचलला आहे.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक व वेळू या गावांना भेटी देऊन जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आणि वॉटर कपमधून झालेल्या कामांतून जी हिरवाई फुलली आहे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता झाली आहे, त्याची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, तहसीलदार स्मिता पवार, सत्यमेव वॉटर कप फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, तालुका कृषी अधिकारी एस. बी. साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.या गावात पूर्वी टँकरने पाणी आणून ते विहिरीत ओतले जायचे. आता ही परिस्थिती राहिली नसून विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गावाला लागणारे पाण्याचे टँकर आता पूर्णपणे बंद होऊन लोकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली.वेळूचा तलाव जोड प्रकल्पाचे काम अतिशय चांगले झाले असून, राज्याला नव्हे तर देशाला दिशा देणारे काम झाले आहे. या सर्व कांमांचे श्रेय गावकºयांचेच आहे, असेही कौतुक त्यांनी यावेळी केले.जलसंधारणाच्या कामामुळे या गावांना आता शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. येथील शेतकऱ्यांनी आता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. यासाठी संपूर्ण क्षेत्र हे ठिबकखाली आणा, १ वर्षाने मी तुमच्या गावात येऊन सर्वांचा सत्कार करेन, असे आश्वासनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी दिले.जयलुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामसेवक इंगवले व कृषी सहायक वैशाली सुतार यांचा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सत्कार केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तलाव जोड प्रकल्पाची पाहणी केली. यात काय सुधारणा करता येतील? याबाबतीही अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी