शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : न्हावी बुद्रुक, वेळू संपूर्ण माळरान ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 18:09 IST

ज्या माळरानावर कोणतेच पीक येत नव्हते. त्या कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक, वेळूतील शेतकरी बागायत पिके घेतआहेत. ही सारी किमया पाण्याची आहे. आता या दोन्ही गावांची १०० टक्के ठिबककडे वाटचाल सुरू आहे. वर्षभरात संपूर्ण कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा या दोन्ही गावांनी उचलला आहे.

ठळक मुद्देशेतकरी घेत आहेत आता बागायती पिकेन्हावी बुद्रुक, वेळू माळरानावर संपूर्ण कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा

सातारा : ज्या माळरानावर कोणतेच पीक येत नव्हते. त्या कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक, वेळूतील शेतकरी बागायत पिके घेतआहेत. ही सारी किमया पाण्याची आहे. आता या दोन्ही गावांची १०० टक्के ठिबककडे वाटचाल सुरू आहे. वर्षभरात संपूर्ण कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा या दोन्ही गावांनी उचलला आहे.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक व वेळू या गावांना भेटी देऊन जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आणि वॉटर कपमधून झालेल्या कामांतून जी हिरवाई फुलली आहे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता झाली आहे, त्याची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, तहसीलदार स्मिता पवार, सत्यमेव वॉटर कप फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, तालुका कृषी अधिकारी एस. बी. साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.या गावात पूर्वी टँकरने पाणी आणून ते विहिरीत ओतले जायचे. आता ही परिस्थिती राहिली नसून विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गावाला लागणारे पाण्याचे टँकर आता पूर्णपणे बंद होऊन लोकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली.वेळूचा तलाव जोड प्रकल्पाचे काम अतिशय चांगले झाले असून, राज्याला नव्हे तर देशाला दिशा देणारे काम झाले आहे. या सर्व कांमांचे श्रेय गावकºयांचेच आहे, असेही कौतुक त्यांनी यावेळी केले.जलसंधारणाच्या कामामुळे या गावांना आता शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. येथील शेतकऱ्यांनी आता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. यासाठी संपूर्ण क्षेत्र हे ठिबकखाली आणा, १ वर्षाने मी तुमच्या गावात येऊन सर्वांचा सत्कार करेन, असे आश्वासनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी दिले.जयलुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामसेवक इंगवले व कृषी सहायक वैशाली सुतार यांचा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सत्कार केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तलाव जोड प्रकल्पाची पाहणी केली. यात काय सुधारणा करता येतील? याबाबतीही अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी