शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : न्हावी बुद्रुक, वेळू संपूर्ण माळरान ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 18:09 IST

ज्या माळरानावर कोणतेच पीक येत नव्हते. त्या कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक, वेळूतील शेतकरी बागायत पिके घेतआहेत. ही सारी किमया पाण्याची आहे. आता या दोन्ही गावांची १०० टक्के ठिबककडे वाटचाल सुरू आहे. वर्षभरात संपूर्ण कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा या दोन्ही गावांनी उचलला आहे.

ठळक मुद्देशेतकरी घेत आहेत आता बागायती पिकेन्हावी बुद्रुक, वेळू माळरानावर संपूर्ण कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा

सातारा : ज्या माळरानावर कोणतेच पीक येत नव्हते. त्या कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक, वेळूतील शेतकरी बागायत पिके घेतआहेत. ही सारी किमया पाण्याची आहे. आता या दोन्ही गावांची १०० टक्के ठिबककडे वाटचाल सुरू आहे. वर्षभरात संपूर्ण कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा या दोन्ही गावांनी उचलला आहे.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक व वेळू या गावांना भेटी देऊन जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आणि वॉटर कपमधून झालेल्या कामांतून जी हिरवाई फुलली आहे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता झाली आहे, त्याची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, तहसीलदार स्मिता पवार, सत्यमेव वॉटर कप फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, तालुका कृषी अधिकारी एस. बी. साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.या गावात पूर्वी टँकरने पाणी आणून ते विहिरीत ओतले जायचे. आता ही परिस्थिती राहिली नसून विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गावाला लागणारे पाण्याचे टँकर आता पूर्णपणे बंद होऊन लोकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली.वेळूचा तलाव जोड प्रकल्पाचे काम अतिशय चांगले झाले असून, राज्याला नव्हे तर देशाला दिशा देणारे काम झाले आहे. या सर्व कांमांचे श्रेय गावकºयांचेच आहे, असेही कौतुक त्यांनी यावेळी केले.जलसंधारणाच्या कामामुळे या गावांना आता शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. येथील शेतकऱ्यांनी आता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. यासाठी संपूर्ण क्षेत्र हे ठिबकखाली आणा, १ वर्षाने मी तुमच्या गावात येऊन सर्वांचा सत्कार करेन, असे आश्वासनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी दिले.जयलुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामसेवक इंगवले व कृषी सहायक वैशाली सुतार यांचा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सत्कार केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तलाव जोड प्रकल्पाची पाहणी केली. यात काय सुधारणा करता येतील? याबाबतीही अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी