शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : प्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 13:45 IST

भावी आयुष्याची स्वप्न उराशी बाळगून प्रियकरासोबत लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियकराने तिचा घात केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. मांढरदेव घाटामध्ये खून झालेल्या महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांना ही धक्कादायक माहिती समजली.

ठळक मुद्दे प्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी केला पत्नीचा खूनमांढरदेव घाटातील महिलेची ओळख पटली; पती ताब्यात

सातारा : भावी आयुष्याची स्वप्न उराशी बाळगून प्रियकरासोबत लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियकराने तिचा घात केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. मांढरदेव घाटामध्ये खून झालेल्या महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांना ही धक्कादायक माहिती समजली.बानू कोकरे (वय २३, रा. भिवंडी, मुंबई) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी वाई तालुक्यातील मांढरदेव घाटामध्ये बानू कोकरेचा गळा चिरून खून करण्यात आला होता. महिलेच्या हातावर केवळ बानू असे गोंधले होते. यावरून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. वाई परिसरातील सर्व हॉटेल आणि लॉजमध्ये जाऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.

यावेळी संबंधित महिला व तिच्यासोबत अन्य एकजण असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर त्यांचा पत्ता लॉजमधून घेऊन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. सोशल मीडियावर बानूचा फोटो व्हायरल झाल्यानंतर एका व्यक्तीने पोलिसांना आरोपीबाबत माहिती दिली. त्यानंतर साताऱ्यांतील पोलीस मुंबई (भिवंडी) येथे पोहोचले.

आरोपीला घरातून अटक केल्यानंतर साताऱ्यात आणण्यात आले आहे. त्याच्याकडे कसून चौकशी पोलीस करत असताना त्याने प्रेम विवाह केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा प्रकार केला असल्याची कबुली दिली.

मात्र, खून करण्यापाठीमागचे नेमके कारण अद्याप त्याने पोलिसांना सांगितले नसून पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. पत्नीचा खून करण्यासाठी त्याच्यासोबत अन्य काहीजण असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याचे नाव सध्या तरी गोपनिय ठेवले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMurderखून