शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

सातारा : प्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 13:45 IST

भावी आयुष्याची स्वप्न उराशी बाळगून प्रियकरासोबत लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियकराने तिचा घात केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. मांढरदेव घाटामध्ये खून झालेल्या महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांना ही धक्कादायक माहिती समजली.

ठळक मुद्दे प्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी केला पत्नीचा खूनमांढरदेव घाटातील महिलेची ओळख पटली; पती ताब्यात

सातारा : भावी आयुष्याची स्वप्न उराशी बाळगून प्रियकरासोबत लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियकराने तिचा घात केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. मांढरदेव घाटामध्ये खून झालेल्या महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांना ही धक्कादायक माहिती समजली.बानू कोकरे (वय २३, रा. भिवंडी, मुंबई) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी वाई तालुक्यातील मांढरदेव घाटामध्ये बानू कोकरेचा गळा चिरून खून करण्यात आला होता. महिलेच्या हातावर केवळ बानू असे गोंधले होते. यावरून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. वाई परिसरातील सर्व हॉटेल आणि लॉजमध्ये जाऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.

यावेळी संबंधित महिला व तिच्यासोबत अन्य एकजण असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर त्यांचा पत्ता लॉजमधून घेऊन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. सोशल मीडियावर बानूचा फोटो व्हायरल झाल्यानंतर एका व्यक्तीने पोलिसांना आरोपीबाबत माहिती दिली. त्यानंतर साताऱ्यांतील पोलीस मुंबई (भिवंडी) येथे पोहोचले.

आरोपीला घरातून अटक केल्यानंतर साताऱ्यात आणण्यात आले आहे. त्याच्याकडे कसून चौकशी पोलीस करत असताना त्याने प्रेम विवाह केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा प्रकार केला असल्याची कबुली दिली.

मात्र, खून करण्यापाठीमागचे नेमके कारण अद्याप त्याने पोलिसांना सांगितले नसून पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. पत्नीचा खून करण्यासाठी त्याच्यासोबत अन्य काहीजण असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याचे नाव सध्या तरी गोपनिय ठेवले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMurderखून