शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

सातारा नगरपालिका : रस्त्यावर कचरा.. आॅन दि स्पॉट दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 14:45 IST

घंटागाडीऐवजी सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकून शहराचे सौंदर्य बकाल करणाऱ्यांवर आता आॅन दि स्पॉट कारवाई सुरू करण्यात आली आहे. सातारा पालिकेने दोन दिवसांत सहाजणांवर कारवाई करून प्रत्येकी १८० रुपये दंडही वसूल केला आहे. या कारवाईची नागरिकांनी धास्ती घेतली असून, कारवाई आणखीन तीव्र केली जाणार आहे.

ठळक मुद्देसातारा नगरपालिका : रस्त्यावर कचरा.. आॅन दि स्पॉट दंडदोन दिवसांत सहाजणांवर कारवाई; शहर स्वच्छतेसाठी मोहीम

सातारा : घंटागाडीऐवजी सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकून शहराचे सौंदर्य बकाल करणाऱ्यांवर आता आॅन दि स्पॉट कारवाई सुरू करण्यात आली आहे. सातारा पालिकेने दोन दिवसांत सहाजणांवर कारवाई करून प्रत्येकी १८० रुपये दंडही वसूल केला आहे. या कारवाईची नागरिकांनी धास्ती घेतली असून, कारवाई आणखीन तीव्र केली जाणार आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. या अभियानांर्तगत सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, कचऱ्यांची ओला व सुका अशी वर्गवारी न करता तो तसाच घंटागाडीत टाकणे, सस्त्यावर थुंकणे, लघुशंका करणे अथवा शौच करणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने सर्व नगरपालिका व नगरपंचायतींना दिले आहेत.सातारा पालिकेने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. कारवाईच्या पहिल्या दिवशी चिटणीस चौकातील शशिकला घाडगे या महिलेवर तर दुसऱ्या दिवशी इतर पाच जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.संबंधितांकडून जागेवरच १८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील वीस प्रभागांच्या स्वच्छतेची जबाबदारी वीस मुकादमांकडे सोपविण्यात आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित मुकादमांना पावती पुस्तक देऊन त्यांना कारवाईचे अधिकार दिले आहेत. पालिकेच्या या मोहिमेची नागरिक धास्ती घेऊ लागले असून, याचा चांगला परिणाम शहर स्वच्छतेवर दिसून येणार आहे.सातारा शहरातून दररोज ६० ते ७० टन ओला व सुका कचरा संकलितकेला जातो. ४० घंटागाड्यांच्या माध्यमातून हे काम दररोज सुरू असते. शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात असताना नागरिकांची रस्त्यावर कचरा टाकण्याची मानसिकता मात्र बदलत नाही. कचरा कुंडीच्या जागी अथवा रस्त्यावर येता-जाता कचरा टाकला जातो. त्यामुळे शहराचे सौंदर्य बकाल होत आहे. पालिकेने सुरू केलेल्या या कारवाईमुळे विघ्नसंतोषी नागरिकांवर जरब बसणार आहे. 

पालिकेकडून जनजागृती करूनही काही नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. तर काही ओला व सुका अशी वर्गवारी न करता तो घंटागाडीत टाकतात. अशा कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करताना पालिकेची दमछाक होते. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, शहर स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठीच दंडात्मक कारवाई हाती घेण्यात आली आहे. पुढे ही मोहीम आणखी प्रभावीपणे राबविली जाईल.- संचित धुमाळ,उपमुख्याधिकारी, सातारा पालिका

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMuncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर