शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

पावसानं शिवार भिजवलं; काळ्या मातीच्या कुशीत बियाणं रुजवलं!

By नितीन काळेल | Updated: June 13, 2024 18:58 IST

साडे चार हजार हेक्टवर पेरणी; भात लागणीस प्रारंभ; बाजरी, मक्याची पेर

सातारा : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाल्याने खरीप हंगामातील पेरणीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात साडे चार हजार हेक्टरवर पेर झाली आहे. बाजरी, मका या पिकांचा प्रामुख्याने पेरणीत समावेश आहे. काही भागात भाताची लागणही सुरू झाली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९३ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४३ हजार ९७८ हेक्टर, भुईमूग २९ हजार ४३५, खरीप ज्वारीचे ११ हजार १५२ हेक्टर तसेच मका १५हजार १९०, तर तूर, मूग, उडदाचे क्षेत्र कमी राहते. जिल्ह्यात यावर्षी पावसाला वेळेत सुरुवात झाली आहे. तसेच आतापर्यंत सर्वदूर पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी खरीप पेरणीसाठी वापसा आलेला नाही. त्यामुळे पेरणी खोळंबली आहे. तरीही शेतकऱ्यांनी माळरानावरील आणि वापसा आलेल्या रानात पेरणीस सुरुवात केली आहे.

खरीप हंगामातील पेरणी आतापर्यंत दीड टक्के झाली आहे. ४ हजार ३२९ हेक्टरवर पेर पूर्ण आहे. यामध्ये १ हजार ७८४ हेक्टरवर भात लागण झाली आहे. सातारा, पाटण, कऱ्हाड, वाई तालुक्यात लागणीला वेग आला आहे. बाजरीची ५ टक्के पेरणी झाली आहे. बाजरीचे सर्वाधिक क्षेत्र माण तालुक्यात ३१ हजार हेक्टरवर राहण्याचा अंदाज आहे. सध्या जिल्ह्यातील माणमध्येच पेर सुरू आहे. खटाव, फलटण, खंडाळा आणि कोरेगाव तालुक्यात सुरुवात झालेली नाही. ज्वारी आणि मका पिकाच्या पेरणीलाही सुरुवात झाली आहे. पण, पाऊस पडत असल्याने पेरणीला वेग आलेला नाही.

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यामुळे यंदाही क्षेत्र अधिक राहण्याचा अंदाज आहे. सध्या जिल्ह्यात ९६८ हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली. टक्केवारीत हे प्रमाण एक इतकेच आहे. तर सोयाबीनची सातारा, पाटण, कऱ्हाड, कोरेगाव या तालुक्यातच पेर सुरू असल्याचे दिसून येत आहे. भुईमुगाची पेरणी दोन टक्के क्षेत्रावर झाली आहे. पाटण तालुक्यात ७०६ हेक्टरवर सध्या भुईमूग पेरणी पूर्ण झाली आहे.

खरीपचे सर्वाधिक क्षेत्र पाटणमध्ये ४६ हजार हेक्टर

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगामात पेरणी होते. सर्वाधिक क्षेत्र हे पाटण तालुक्यात ४६ हजार ३६७ हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. यानंतर खटाव तालुक्यात ४५ हजार ८९६ हेक्टर, माण ३९ हजार ६०६, कऱ्हाड ३८ हजार ५७७, सातारा तालुका ३१ हजार ६५२, वाई १७ हजार २४२, जावळी १८ हजार २२०, कोरेगाव २० हजार ७६४, खंडाळा तालुका १० हजार ५६ आणि महाबळेश्वर तालुक्यात ४ हजार २२६ हेक्टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी