शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराज चव्हाणांसाठी धोक्याची घंटा; 'कराड दक्षिण'ची सेमी फायनल अतुल भोसलेंनी जिंकली

By प्रमोद सुकरे | Updated: June 5, 2024 22:30 IST

काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटलांवर आत्मचिंतनाची वेळ

कराड - नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक म्हणजे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिली जात होती. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येकानेच प्रतिष्ठा पणाला लावत काम केले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघही त्याला अपवाद नाही. पण काँग्रेस विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात प्रथमच भाजपने मताधिक्य घेतल्याने डॉ.अतुल भोसले यांनी विधानसभेची सेमी फायनल जिंकली अशीच चर्चा सुरू झाली आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा यशवंत विचारांचा  किंवा काँग्रेस विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आजवर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपची लाट आली तरी या मतदारसंघाने काँग्रेसचाच आमदार निवडून दिला आहे. आजवर येथून दिवंगत यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील -उंडाळकर यांनी नेतृत्व केले. तर सध्या काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नेतृत्व करीत आहेत.

भाजपचे नेते डॉ.अतुल भोसले यांनी यापूर्वी २ वेळा कराड दक्षिणमधून नशीब आजमावले. पण त्यावेळी त्यांना यश आले नाही. मात्र त्यांनी आपली चिकाटी सोडलेली नाही .कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी सातत्याने विकास कामे व समाजकार्याचा धडाका सुरू ठेवला आहे.

नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक त्यांनी विधानसभेची सेमी फायनल म्हणूनच लढली. त्यासाठी अथक परिश्रम घेतले. आणि त्याचेच फलित म्हणून यावेळी ६१६ मतांचे मताधिक्य भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना दिले गेले आहे. या मतांनी उदयनराजे भोसले यांच्या विजयाला हातभार लावला आहेच पण उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मार्गावर त्यांनी यशाची बिजे रोवली आहेत असंच म्हटलं तरी वागत ठरणार नाही.

मताधिक्य चर्चेचा विषय

गत लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदार संघातून राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार खासदार श्रीनिवास पाटील यांना सुमारे ३१ हजारांचे मताधिक्य दिले होते. यावेळी कराडचा उमेदवार नसल्याने हे मताधिक्य कमी होईल असा अनेकांचा कयास होता. पण कराड दक्षिणेत भाजप मताधिक्य घेईल असं कोणीही म्हटण्याचं धाडस करत नव्हते. पण डॉ.अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ६१६ मतांची घेतलेले मताधिक्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ

कराड दक्षिण हा काँग्रेस विचारांचा मतदारसंघ मानला जातो. येथे काँग्रेस अंतर्गत असणारे दोन परस्परविरोधी गट सर्वश्रुत होते. मात्र अलीकडच्या काही वर्षात हे दोन गट एकत्रित आले आहेत. स्थानिक शिखर संस्थांच्या निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण व अँड. उदयसिंह पाटील यांनी एकीचे बळही दाखवून दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दक्षिणेत मताधिक्य घेणारच  फक्त किती? एवढीच चर्चा होत होती. पण प्रत्यक्षात काँग्रेसची झालेली पिछाडी नेत्यांसह कार्यकर्त्यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी कराड दक्षिण मतदार संघात  ३ लाख ३ हजार ८८० एवढे मतदार होते. पैकी १ लाख ९७ हजार ६९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे सुमारे ६५.२७ टक्के मतदान झाले होते. प्रत्यक्षात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना ९२ हजार ८१४ तर राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना ९२ हजार १९८ एवढी मते मिळाली. तर इतर उमेदवारांना मिळून १३ हजार ६१४ मते मिळाली. यात उदयनराजे भोसले यांना ६१६ मतांचे मताधिक्य मिळाल्याचे स्पष्ट होते.

यापूर्वी नगरपालिकेत फुलले होते कमळ !

खरंतर कराड च्या मातीत यापूर्वी एकदा कमळ फुलले होते. तेही नगरपालिकेच्या निवडणुकीत. सन  २०१६  मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षा पदाच्या निवडणुकीत भाजपच्या रोहिणी शिंदे यांनी तिरंगी लढतीत बाजी मारत विजय संपादन केला होता. त्यानंतर आता कराड दक्षिणेत लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मताधिक्य मिळालेले आहे.

 

टॅग्स :satara-pcसाताराPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेAtul Bhosaleअतुल भोसलेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल