शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मागासवर्गीयांच्या पुनर्वसनाची जमीन रेल्वेने बळकावली : पार्थ पोळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 16:32 IST

कोरेगाव तालुक्यातील भीमनगर येथे कोयना धरणातून विस्थापित झालेल्या मागासवर्गीय लोकांची तब्बल १२ एकर जमीन कोणताही मोबदला न देता रेल्वे खात्याने बळकावली आहे. या प्रकारामुळे बाधित लोक भूमिहीन झाले असून, त्याविरोधात ३१ मे रोजी सकाळी दहा वाजता जरंडेश्वरच्या हद्दीत रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याची माहिती मागासवर्गीय शेतकरी, धरणग्रस्त पंचायतचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमागासवर्गीयांच्या पुनर्वसनाची जमीन रेल्वेने बळकावली : पार्थ पोळके३१ मे रोजी जरंडेश्वर हद्दीत रेल रोको आंदोलन करणार

सातारा : कोरेगाव तालुक्यातील भीमनगर येथे कोयना धरणातून विस्थापित झालेल्या मागासवर्गीय लोकांची तब्बल १२ एकर जमीन कोणताही मोबदला न देता रेल्वे खात्याने बळकावली आहे. या प्रकारामुळे बाधित लोक भूमिहीन झाले असून, त्याविरोधात ३१ मे रोजी सकाळी दहा वाजता जरंडेश्वरच्या हद्दीत रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याची माहिती मागासवर्गीय शेतकरी, धरणग्रस्त पंचायतचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.पार्थ पोळके म्हणाले, कोयना धरणातून सुमारे ६२ वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्या मागासवर्गीय कुटुंबांचे पुनर्वसन भीमनगर (ता. कोरेगाव) येथे झाले होते. वास्तविक पुनर्वसन खात्याने पुनर्वसनासाठी जी जमीन संपादित केली होती, त्या ठिकाणी मागासवर्गीयांची ४५० लोकसंख्येचे गाव आहे. असे असताना रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता या विस्थापित मागासवर्गीयांची जवळजवळ १२ एकर जमीन अनधिकृतपणे बळकावली आहे.

महाराष्ट्रातील कोणत्याच धरणातील विस्थापित मागासवर्गीय सुखी नाही. कोयना धरण होऊन ६२ वर्षे झाली, या धरणातील मागासवर्गीयांचे हाल अतिशय वाईट आहेत. जावळी तालुक्यातील आंबेडकर नगरातील विस्थापित मागासवर्गीयांनी स्वत: जमिनी खरेदी करून घरेबांधली आहेत. शासनाने या लोकांना कायद्याने असलेली मदत केलेली नाही.या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना संघटनेने निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, राज्य उपाध्यक्ष भिकू सपकाळ, अनंता कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, नामदेव जगताप, शांताराम कांबळे, गौरव कांबळे आदी उपस्थित होते.मागासवर्गीयांना भूमिहीन करण्याचा डावपुनर्वसन करताना ४५ एकराची जमीन देण्यात आली होती. त्यावर लोक विस्थापित झाले. त्यापैकी १२ एकर जमीन कोणतीही माहिती न देता परस्पर काढून घेऊन मागासवर्गीयांना भूमिहीन करण्यासाठी हा मोठा डाव आखला गेला आहे, याविरोधात जोरदार संघर्ष करणार असल्याचे पार्थ पोळके यांनी सांगितले.या आहेत मागण्या

  1. -रेल्वेने घेतलेल्या जमिनीच्या मोबदल्यात पर्यायी जमीन मिळावी
  2. - रेल्वे लाईन बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना रेल्वेच्या सेवेत घ्यावे
टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वे