शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

सातारा : मागासवर्गीयांच्या पुनर्वसनाची जमीन रेल्वेने बळकावली : पार्थ पोळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 16:32 IST

कोरेगाव तालुक्यातील भीमनगर येथे कोयना धरणातून विस्थापित झालेल्या मागासवर्गीय लोकांची तब्बल १२ एकर जमीन कोणताही मोबदला न देता रेल्वे खात्याने बळकावली आहे. या प्रकारामुळे बाधित लोक भूमिहीन झाले असून, त्याविरोधात ३१ मे रोजी सकाळी दहा वाजता जरंडेश्वरच्या हद्दीत रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याची माहिती मागासवर्गीय शेतकरी, धरणग्रस्त पंचायतचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमागासवर्गीयांच्या पुनर्वसनाची जमीन रेल्वेने बळकावली : पार्थ पोळके३१ मे रोजी जरंडेश्वर हद्दीत रेल रोको आंदोलन करणार

सातारा : कोरेगाव तालुक्यातील भीमनगर येथे कोयना धरणातून विस्थापित झालेल्या मागासवर्गीय लोकांची तब्बल १२ एकर जमीन कोणताही मोबदला न देता रेल्वे खात्याने बळकावली आहे. या प्रकारामुळे बाधित लोक भूमिहीन झाले असून, त्याविरोधात ३१ मे रोजी सकाळी दहा वाजता जरंडेश्वरच्या हद्दीत रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याची माहिती मागासवर्गीय शेतकरी, धरणग्रस्त पंचायतचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.पार्थ पोळके म्हणाले, कोयना धरणातून सुमारे ६२ वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्या मागासवर्गीय कुटुंबांचे पुनर्वसन भीमनगर (ता. कोरेगाव) येथे झाले होते. वास्तविक पुनर्वसन खात्याने पुनर्वसनासाठी जी जमीन संपादित केली होती, त्या ठिकाणी मागासवर्गीयांची ४५० लोकसंख्येचे गाव आहे. असे असताना रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता या विस्थापित मागासवर्गीयांची जवळजवळ १२ एकर जमीन अनधिकृतपणे बळकावली आहे.

महाराष्ट्रातील कोणत्याच धरणातील विस्थापित मागासवर्गीय सुखी नाही. कोयना धरण होऊन ६२ वर्षे झाली, या धरणातील मागासवर्गीयांचे हाल अतिशय वाईट आहेत. जावळी तालुक्यातील आंबेडकर नगरातील विस्थापित मागासवर्गीयांनी स्वत: जमिनी खरेदी करून घरेबांधली आहेत. शासनाने या लोकांना कायद्याने असलेली मदत केलेली नाही.या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना संघटनेने निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, राज्य उपाध्यक्ष भिकू सपकाळ, अनंता कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, नामदेव जगताप, शांताराम कांबळे, गौरव कांबळे आदी उपस्थित होते.मागासवर्गीयांना भूमिहीन करण्याचा डावपुनर्वसन करताना ४५ एकराची जमीन देण्यात आली होती. त्यावर लोक विस्थापित झाले. त्यापैकी १२ एकर जमीन कोणतीही माहिती न देता परस्पर काढून घेऊन मागासवर्गीयांना भूमिहीन करण्यासाठी हा मोठा डाव आखला गेला आहे, याविरोधात जोरदार संघर्ष करणार असल्याचे पार्थ पोळके यांनी सांगितले.या आहेत मागण्या

  1. -रेल्वेने घेतलेल्या जमिनीच्या मोबदल्यात पर्यायी जमीन मिळावी
  2. - रेल्वे लाईन बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना रेल्वेच्या सेवेत घ्यावे
टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वे