शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सातारा सिंचन मंडळाची २३ कोटींची विक्रमी पाणीपट्टी वसुली

By सचिन काकडे | Updated: April 4, 2024 18:25 IST

दुष्काळी स्थितीतही कामगिरी : सर्व विभागांच्या सहकार्यातून यश

सातारा : सातारा सिंचन मंडळाने २०२३-२४ वर्षात टंचाई परिस्थिती असतानाही विक्रमी २२ कोटी ८८ लाख रुपयांची पाणीपट्टी वसुली केली आहे. यासाठी विविध विभागांचे सहकार्य लाभले तर, मंडळामार्फत यापूर्वी १९ कोटी ४१ लाख रुपयांची सर्वाधिक पाणीपट्टी वसुली करण्यात आली होती.सातारा सिंचन मंडळाकडे सातारा जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाची आणि देखभाल-दुरुस्तीची कामे आहेत तर, या मंडळाकडे धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी व कोयना हे पाच मोठे प्रकल्प आहेत. तसेच येरळवाडी, राणंद, नेर आणि आंधळी हे चार मध्यम प्रकल्प व २८ लघु प्रकल्प आणि ६४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सिंचन व्यवस्थापनासाठी आहेत. त्यातच जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही सातारा सिंचन मंडळाने पाणीपट्टी वसुलीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. २०२३-२४ वर्षात २२ कोटी ८८ लाख रुपयांची वसुली झालेली आहे.या विक्रमी पाणीपट्टी वसुलीबाबत सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांनी लाभक्षेत्रातील बागायतदार, कालवा पाणी वापर संस्था, सहकारी साखर कारखाने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वाई, सातारा, तासवडे (कऱ्हाड) व लघु औद्योगिक वसाहत पाटण, सातारचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सातारा नगरपालिका आदींचे सहकार्याबद्दल आभार मानले आहेत, तसेच मंडळांतर्गत सर्व विभागांतील कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक व सिंचन व्यवस्थापनातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे काैतुक केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर