शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

Satara news: फळबागा नसताना भरला विमा; भरपाई लाटण्याचा डाव, १४२ बोगस प्रकरणे

By नितीन काळेल | Updated: April 20, 2023 18:10 IST

ज्या शेतकऱ्यांनी बाग नसतानाही विमा भरला, त्यांच्यावर काय कारवाई होणार?

नितीन काळेलसातारा : फळबाग नसतानाही आंबिया बहरात विमा भरून भरपाई लाटण्याचा डाव जिल्ह्यात उघडकीस आला असून, यासंदर्भाने तपासणीही पूर्ण झाली आहे. यामध्ये ५९९ शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यातील १४२ जण बोगस असल्याचे समोर आल्याची माहिती हाती आली आहे.अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीत फळबागांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. २०२१च्या मृग बहरापासून २०२२-२३ च्या आंबिया बहरापर्यंत ९ हजार ८८३ शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभाग घेतला आहे. तर फळबागा नसतानाही विमा लाभ घेतलेली अनेक प्रकरणे राज्यात उघडकीस आली आहेत. त्यामुळे याची तपासणी करण्यात येत आहे.सातारा जिल्ह्यातही फळबागांचा विमा उतरविलेल्या क्षेत्राची तपासणी प्रक्रिया झाली. आंबिया बहरातील ही तपासणी होती. यातून कितीजणांनी कागदावरच फळबागांचा विमा भरला ते समोर आलेले आहे. अशांची संख्या १४२ इतकी आहे, तर यासाठी ५९९ जणांनी विमा भरला होता, असे कृषी विभागातील सुत्रांनी सांगितले.

कारवाई होणार का ?फळबाग विमा ज्या शेतकऱ्यांनी भरला आहे, त्या शेतकऱ्यांची तपासणी झाली आहे. शेतकऱ्याकडे खरंच फळबाग आहे का ? किती क्षेत्र आहे, किती विमा भरला, याची माहिती घेण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी बाग नसतानाही विमा भरला, त्यांच्यावर काय कारवाई होणार, हे स्पष्ट नाही.

मृग बहरासाठी पाच हजार शेतकरी सहभागी...

गेल्या वर्षी मृग बहरात फळपीक विमा रक्कम भरणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ७८४ इतकी आहे. त्यांनी २ हजार ३७२ हेक्टरसाठी विमा काढला होता. त्यासाठी ३० कोटी ८४ लाख इतकी विमा संरक्षित रक्कम होती, तर १ कोटी ५४ लाख २० हजार रुपये हप्त्यापोटी भरले होते. आंबियानंतर मृग बहरातील तपासणी होणार आहे का ? याबाबत अद्याप निश्चित काही झालेले नाही.

आंबिया बहरात २५१ हेक्टर क्षेत्र...रब्बीमधील २०२२-२३ वर्षात आंबिया बहरात विम्यात ५९९ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. तर २५१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित होते. त्यासाठी ३३ लाख ८७ हजार ६४४ रुपये विमा हप्ता रक्कम शेतकऱ्यांनी भरली आहे.

पाच फळबागांसाठी योजना...

सातारा जिल्ह्यात फळपीक विमा योजना पाच फळांसाठी आहे. यामध्ये द्राक्ष, आंबा, केळी, स्ट्राॅबेरी आणि डाळिंब यांचा समावेश आहे.

तपासणीत तिघांचा समावेश...आंबिया बहरातील बोगस फळपीक विमा शोधण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी, तलाठी आणि कृषी सहायकांचा समावेश करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ही तपासणी करण्यात आली.

१४२ बोगस; शासनाकडे प्रस्ताव...

जिल्ह्यातील आंबिया बहरातील फळबागांचा विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्राची तपासणी झाली आहे. त्यातून १४२ बोगस प्रकरणे आढळली. याचा प्रस्ताव आता शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी