शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

सातारा : गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल 59 लाखांची ऐतिहासिक भरपाई, विमा कंपनीला न्यायालयाचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 13:48 IST

गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल एवढी मोठी नुकसान भरपाई सातारा जिल्ह्यातील न्यायालयांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या न्यायालयीन इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम

सातारा : पूर्णवेळ गृहिणीचे काम करणा-या विवाहित महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्या वारसांना ५९ लाख नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनीने द्यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय क-हाड येथील जिल्हा न्यायालयाने दिला.

स्वत:चे कोणतेही उत्पन्न नसलेल्या व संसारी स्त्रीच्या भूमिकेतून दिवसरात्र स्वत:च्या कुटुंबासाठी कार्यमग्न असलेल्या गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल एवढी मोठी नुकसान भरपाई सातारा जिल्ह्यातील न्यायालयांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या न्यायालयीन इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम ठरली आहे.

अर्जदारांतर्फे काम पाहिलेले अ‍ॅड. राजेंद्र वीर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, क-हाड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप महादेव गुरव हे त्यांची पत्नी वैशाली, मुलगी प्रतीक्षा आणि मुलगा प्रतीक यांच्यासह कारमधून दार्जीलिंगकडे जात होते. जात असताना वाटेत राईगंज शहराजवळ त्यांच्या कारची व समोरून आलेल्या मालट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दिलीप गुरव यांच्यासह त्यांची पत्नी वैशाली व मुले गंभीर जखमी झाली होती. या अपघातातून दिलीप गुरव व मुले बचावली; परंतु वैशाली यांना प्राणघातक दुखापती झाल्याने त्यांचा दुस-या दिवशी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.

या दोन्ही वाहनांचा विमा न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीकडे उतरविण्यात आला होता. त्यामुळे या अपघाती मृत्यूबद्दल नुकसान भरपाई मिळावी म्हणून वैशाली यांचे वारस असलेल्या दिलीप गुरव व त्यांच्या मुलांनी क-हाड येथील जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाई मिळण्याबाबत अर्ज दाखल केला होता.

गुरव यांनी दिलेल्या अर्जात, वैशाली या पूर्णवेळ गृहिणी होत्या. त्यामुळे त्यांना स्वत:चे कोणतेही उत्पन्न नव्हते. अश गृहिणींच्या अपघाती मृत्यूबद्दल भरपाईच्या केसेसमध्ये गृहिणींचे उत्पन्न निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने व मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमध्ये घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अशा गृहिणीच्या कमवत्या पतीच्या उत्पन्नाचा विचार होऊन पतीच्या उत्पन्नाच्या एक तृतीअंश इतकी रक्कम गृहिणीचे गृहित उत्पन्न मानण्यात येते. अ‍ॅड. राजेंद्र वीर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय व मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन या कामी अर्जदारांची बाजू मांडताना कोर्टापुढे असे नमूद केले की, दिलीप गुरव हे बँकेत अधिकारी असून, अपघताच्या वेळी त्यांना दरमहा एक लाखांपेक्षा जास्त पगार होता. त्यामुळे स्वत:चे कोणतेही उत्पन्न नसलेल्या त्यांच्या पत्नी वैशाली यांचे गृहित उत्पन्न हे त्यांच्या पगाराच्या कमीत कमी एक तृतीअंश इतके म्हणजेच ३३ हजार दरमहा इतके धरून त्यानुसार अर्जदारांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. अर्जदारांच्या मागणीला विमा कंपनीतर्फे जोरदार विरोध करण्यात येऊन अशा गृहिणीचे गृहित उत्पन्न जास्तीत जास्त दरमहा ३ हजार इतके धरावे, असे अर्जात नमूद करण्यात आले होते.

वैशाली यांची साथ, प्रोत्साहन व पार पडलेल्या कौटुंबिक जबाबदा-यांमध्ये यांचा मोलाचा वाटा होता. या बाबींचा विचार करून कºहाड येथील दुसरे जिल्हा न्यायाधीश सी.पी. गड्डम यांनी वैशाली यांचे गृहित उत्पन्न दरमहा ३३ हजार इतके धरून त्यानुसार एकूण ४४ लाख अधिक अर्ज दाखल तारखेपासून होणारे व्याज १५ लाख अशी एकूण ५९ लाख इतकी नुकसान भरपाई अर्जदार दिलीप गुरव व मुलांना न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीने द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCourtन्यायालय