शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

सातारा : गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल 59 लाखांची ऐतिहासिक भरपाई, विमा कंपनीला न्यायालयाचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 13:48 IST

गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल एवढी मोठी नुकसान भरपाई सातारा जिल्ह्यातील न्यायालयांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या न्यायालयीन इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम

सातारा : पूर्णवेळ गृहिणीचे काम करणा-या विवाहित महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्या वारसांना ५९ लाख नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनीने द्यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय क-हाड येथील जिल्हा न्यायालयाने दिला.

स्वत:चे कोणतेही उत्पन्न नसलेल्या व संसारी स्त्रीच्या भूमिकेतून दिवसरात्र स्वत:च्या कुटुंबासाठी कार्यमग्न असलेल्या गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल एवढी मोठी नुकसान भरपाई सातारा जिल्ह्यातील न्यायालयांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या न्यायालयीन इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम ठरली आहे.

अर्जदारांतर्फे काम पाहिलेले अ‍ॅड. राजेंद्र वीर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, क-हाड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप महादेव गुरव हे त्यांची पत्नी वैशाली, मुलगी प्रतीक्षा आणि मुलगा प्रतीक यांच्यासह कारमधून दार्जीलिंगकडे जात होते. जात असताना वाटेत राईगंज शहराजवळ त्यांच्या कारची व समोरून आलेल्या मालट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दिलीप गुरव यांच्यासह त्यांची पत्नी वैशाली व मुले गंभीर जखमी झाली होती. या अपघातातून दिलीप गुरव व मुले बचावली; परंतु वैशाली यांना प्राणघातक दुखापती झाल्याने त्यांचा दुस-या दिवशी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.

या दोन्ही वाहनांचा विमा न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीकडे उतरविण्यात आला होता. त्यामुळे या अपघाती मृत्यूबद्दल नुकसान भरपाई मिळावी म्हणून वैशाली यांचे वारस असलेल्या दिलीप गुरव व त्यांच्या मुलांनी क-हाड येथील जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाई मिळण्याबाबत अर्ज दाखल केला होता.

गुरव यांनी दिलेल्या अर्जात, वैशाली या पूर्णवेळ गृहिणी होत्या. त्यामुळे त्यांना स्वत:चे कोणतेही उत्पन्न नव्हते. अश गृहिणींच्या अपघाती मृत्यूबद्दल भरपाईच्या केसेसमध्ये गृहिणींचे उत्पन्न निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने व मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमध्ये घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अशा गृहिणीच्या कमवत्या पतीच्या उत्पन्नाचा विचार होऊन पतीच्या उत्पन्नाच्या एक तृतीअंश इतकी रक्कम गृहिणीचे गृहित उत्पन्न मानण्यात येते. अ‍ॅड. राजेंद्र वीर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय व मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन या कामी अर्जदारांची बाजू मांडताना कोर्टापुढे असे नमूद केले की, दिलीप गुरव हे बँकेत अधिकारी असून, अपघताच्या वेळी त्यांना दरमहा एक लाखांपेक्षा जास्त पगार होता. त्यामुळे स्वत:चे कोणतेही उत्पन्न नसलेल्या त्यांच्या पत्नी वैशाली यांचे गृहित उत्पन्न हे त्यांच्या पगाराच्या कमीत कमी एक तृतीअंश इतके म्हणजेच ३३ हजार दरमहा इतके धरून त्यानुसार अर्जदारांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. अर्जदारांच्या मागणीला विमा कंपनीतर्फे जोरदार विरोध करण्यात येऊन अशा गृहिणीचे गृहित उत्पन्न जास्तीत जास्त दरमहा ३ हजार इतके धरावे, असे अर्जात नमूद करण्यात आले होते.

वैशाली यांची साथ, प्रोत्साहन व पार पडलेल्या कौटुंबिक जबाबदा-यांमध्ये यांचा मोलाचा वाटा होता. या बाबींचा विचार करून कºहाड येथील दुसरे जिल्हा न्यायाधीश सी.पी. गड्डम यांनी वैशाली यांचे गृहित उत्पन्न दरमहा ३३ हजार इतके धरून त्यानुसार एकूण ४४ लाख अधिक अर्ज दाखल तारखेपासून होणारे व्याज १५ लाख अशी एकूण ५९ लाख इतकी नुकसान भरपाई अर्जदार दिलीप गुरव व मुलांना न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीने द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCourtन्यायालय