शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सातारा : सोयाबीन खरेदीला नाफेडचा ग्रीन सिग्नल, खरेदी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 17:33 IST

सातारा जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला अखेर नाफेडतर्फे ग्रीन सिग्नल दाखविण्यात आला आहे. जिल्ह्यातील ७0 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी या खरेदी केंद्रावर नोंद केली. गुरुवारपासून प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात झाली असून २ शेतकऱ्यांनी ११ क्विंटल सोयाबीन केंद्रावर आणून घातले आहे.

ठळक मुद्देसोयाबीन खरेदीला नाफेडचा ग्रीन सिग्नल, खरेदी सुरुवडूजला मूग, उडीद खरेदी केंद्रांना परवानगी

सातारा : जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला अखेर नाफेडतर्फे ग्रीन सिग्नल दाखविण्यात आला आहे. जिल्ह्यातील ७0 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी या खरेदी केंद्रावर नोंद केली. गुरुवारपासून प्रत्यक्षात खरेदीला सुरुवातझाली असून २ शेतकऱ्यांनी ११ क्विंटल सोयाबीन केंद्रावर आणून घातले आहे.

सोयाबीन खरेदी केंद्रे सुरु असली तरी प्रत्यक्षात खरेदी सुरु नसल्याबाबत लोकमतने वृत्त प्रसिध्द केले होते. याची दखल घेऊन प्रशासनातर्फे सोयाबीन खरेदी सुरु केली आहे. शेतकरी सोयाबीन विकून दसरा, दिवाळी साजरी करतात. मात्र अद्यापही शासनाच्या केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरु नसल्याने शेतकरी विवंचनेत होते. वडूज परिसरात मूग, उडीद या पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या भागातही मूग व उडीद खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी होत होती.सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ३ हजार ३९९ रुपये इतका हमीभाव शासनाने जाहीर केला आहे. त्यासाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये सोयाबीन खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. तालुका खरेदी विक्री संघांमार्फत शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदणी करुन घेतल्या जात आहेत. यासाठी शेतकरी खरेदी विक्री संघात चकरा मारताना दिसत आहेत. आॅनलाईन नोंदणी करताना जमीनीच्या उताऱ्यावर सोयाबीन पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.

नोव्हेंबर महिन्यांनंतर पिकांची नोंदणी करण्याचे काम तलाठी मंडळींकडून केली जाते. मात्र, सोयाबीनची नोंद असलेला सातबारा असल्याशिवाय सोयाबीन खरेदी करता येणार नसल्याचे शासनाने कळविले असल्याने पिकाची नोंद असलेला सातबारा घेऊनच शेतकऱ्यांना यावे लागत आहे. तसेच बँकेचा खातेक्रमांकही महत्त्वाचा आहे. सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.दरम्यान, कोरेगाव, वाई, सातारा येथील खरेदी विक्री केंद्रांच्या गोडावूनमध्ये हमीभावाने सोयाबीन करण्यात येत आहे. त्यातच खासगी व्यापाऱ्यांनीही सोयाबीन खरेदीचे भाव वाढवले आहे. सरकारच्या हमीभावाच्या जवळपास ३२५0 इतका प्रतिक्विंटल दर ते देत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी दर वाढवले असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची विक्री केली आहे.व्यापाऱ्यांकडे गर्दीशासकीय केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करत असताना सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते. मात्र खासगी ठिकाणी विक्रीला आणलेले सोयाबीन दर्जानुसार दर देऊन खरेदी केली जात असल्याने तसेच पैसेही लगेच मिळत असल्याने शेतकरीही खासगी ठिकाणी सोयाबीन विक्री करण्यावर भर देत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर