शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सातारा जिल्ह्यात तीन दिवसांत साडेचारशे मिलीमीटर पाऊस

By admin | Updated: September 13, 2015 22:17 IST

रविवारी मुसळधार : दुष्काळी भागातील बळीराजा सुखावला

सातारा : पावसाचे माहेरघर असलेल्या सातारा जिल्ह्यात यंदा वरुणराजाने निराशाच केली. जुनच्या पहिल्या आठवड्याचा अपवाद वगळता जुलै, आॅगस्ट कोरडा गेला. यामुळे दुष्काळाचे ढग गडद होत असताच परतीच्या पावसाने दिलासा दिला. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात तब्बल साडेचारशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या पूर्वभाग असलेला महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली, पाटण, कोयना, नवजा येथे पहिले तीन महिने मुसळधार पाऊस पडत असतो. आॅगस्टमध्ये कोयना धरण अनेकदा भरत असते, मात्र यंदा रविवार, दि. १३ रोजी कोयनेत ८० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे दुष्काळाची चिन्हे दिसत आहेत.फलटण, माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांच्या काही भागांत परतीचा पाऊस पडतो. या पावसाला सुरुवात झाली असून, गेल्या आठ-दहा दिवसांपासून हजेरी लावली आहे. त्यामुळे या परिसरातील बळीराजा सुखावला आहे.फलटण, खटाव, वाठार स्टेशन आदी परिसरात रविवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नाले, ओघळी भरून वाहत आहेत. येरळा नदीला शनिवारीच पाणी आले आहे. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रविवारी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पूणपणे उघडीप दिली. मात्र, दुष्काळी माण, खटाव, फलटण भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बळीराजा सुखावला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, अशी आशा व्यक्त होत आहे.जिल्ह्यात गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवसांत सुमारे ४२५.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये तीन दिवसांत तालुकानिहाय पडलेला पाऊस असा : सातारा ४३.३, जावळी ४७, कोरेगाव ३५.९, कऱ्हाड ३४.८, पाटण ४७.७, फलटण ३४.०, माण १५.८, खटाव ३२.७, वाई ४३.१, महाबळेश्वर ६९.६, खंडाळा २९.४. (प्रतिनिधी)