शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दोन आमदारांमध्ये खडाजंगी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 14:10 IST

निवडून आलेले आमदार काय करतात? , असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांनी महिंद धरणाच्या गळतीवरुन करताच पाटणचे आमदार शंभूराज देसाई आक्रमक झाले.  पाटणच्या विकास कामांविषयी मला कोणीही शिकविण्याची गरज नाही. अठरा हजार मतांनी मी निवडून आलोय, अशा शब्दात शंभूराज यांनी शाब्दिक प्रतिहल्ला करताच दोन्ही आमदारांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभेत खडाजंगी सुरू झाली.

ठळक मुद्देमहिंद धरणाच्या गळतीवरुन देसाई-पाटील आमने - सामनेनिवडून आलेले आमदार काय करतात? : नरेंद्र पाटील अठरा हजार मतांनी निवडून आलोय : शंभूराज देसाई

सातारा , दि. २८ : निवडून आलेले आमदार काय करतात? , असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांनी महिंद धरणाच्या गळतीवरुन करताच पाटणचे आमदार शंभूराज देसाई आक्रमक झाले.  पाटणच्या विकास कामांविषयी मला कोणीही शिकविण्याची गरज नाही. अठरा हजार मतांनी मी निवडून आलोय, अशा शब्दात शंभूराज यांनी शाब्दिक प्रतिहल्ला करताच दोन्ही आमदारांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभेत खडाजंगी सुरू झाली.

जिल्हा नियोजन विकास समितीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच साताऱ्यात शनिवारी सभा सुरू झाली. या सभेला दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सह पालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सभा सुरू झाल्यानंतर आमदार नरेंद्र पाटील यांनी महिंद धरणाच्या गळतीचा मुद्दा उपस्थित केला.  त्या धरणाजवळ माझे गाव आहे, त्यामुळे मला या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही का? असा सवाल पाटील यांनी केला. या विषयावर दोन्ही आमदारांमध्ये खडाजंगी सुरू असताना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शांत रहा.. शांत रहा.. तुम्हाला बोलायची संधी देतोय, म्हणून सभेचे पावित्र्य नष्ट करू नका, अशा शब्दांत त्यांनी दोन्ही आमदारांना वाद न घालण्याची सूचना केली.

दरम्यान, या चर्चेवेळी वांग-मराठवाडी पुनर्वसनाचा विषय आमदार शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला. त्यावेळी पालकमंत्री शिवतारे यांनी धरणग्रस्त चळवळीचे नेते भारत पाटणकर यांच्याशी या पुनर्वसनाबाबत सविस्तर बैठक झाली असल्याचे स्पष्ट केले. पुनर्वसनाचा मुद्दा समोर आल्यामुळे धरणाच्या सांडव्यातून वाया जाणाऱ्या पाण्याचा मुद्दा बाजूला पडला. यानंतर या सभेत इतर विषयांवर चर्चा सुरू झाली.

या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी वारंवार गैरहजर राहतात, त्यामुळे साताऱ्याच्या विभाग नियंत्रकांना नोटीस काढण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईPoliticsराजकारण