शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दोन आमदारांमध्ये खडाजंगी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 14:10 IST

निवडून आलेले आमदार काय करतात? , असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांनी महिंद धरणाच्या गळतीवरुन करताच पाटणचे आमदार शंभूराज देसाई आक्रमक झाले.  पाटणच्या विकास कामांविषयी मला कोणीही शिकविण्याची गरज नाही. अठरा हजार मतांनी मी निवडून आलोय, अशा शब्दात शंभूराज यांनी शाब्दिक प्रतिहल्ला करताच दोन्ही आमदारांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभेत खडाजंगी सुरू झाली.

ठळक मुद्देमहिंद धरणाच्या गळतीवरुन देसाई-पाटील आमने - सामनेनिवडून आलेले आमदार काय करतात? : नरेंद्र पाटील अठरा हजार मतांनी निवडून आलोय : शंभूराज देसाई

सातारा , दि. २८ : निवडून आलेले आमदार काय करतात? , असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांनी महिंद धरणाच्या गळतीवरुन करताच पाटणचे आमदार शंभूराज देसाई आक्रमक झाले.  पाटणच्या विकास कामांविषयी मला कोणीही शिकविण्याची गरज नाही. अठरा हजार मतांनी मी निवडून आलोय, अशा शब्दात शंभूराज यांनी शाब्दिक प्रतिहल्ला करताच दोन्ही आमदारांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभेत खडाजंगी सुरू झाली.

जिल्हा नियोजन विकास समितीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच साताऱ्यात शनिवारी सभा सुरू झाली. या सभेला दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सह पालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सभा सुरू झाल्यानंतर आमदार नरेंद्र पाटील यांनी महिंद धरणाच्या गळतीचा मुद्दा उपस्थित केला.  त्या धरणाजवळ माझे गाव आहे, त्यामुळे मला या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही का? असा सवाल पाटील यांनी केला. या विषयावर दोन्ही आमदारांमध्ये खडाजंगी सुरू असताना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शांत रहा.. शांत रहा.. तुम्हाला बोलायची संधी देतोय, म्हणून सभेचे पावित्र्य नष्ट करू नका, अशा शब्दांत त्यांनी दोन्ही आमदारांना वाद न घालण्याची सूचना केली.

दरम्यान, या चर्चेवेळी वांग-मराठवाडी पुनर्वसनाचा विषय आमदार शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला. त्यावेळी पालकमंत्री शिवतारे यांनी धरणग्रस्त चळवळीचे नेते भारत पाटणकर यांच्याशी या पुनर्वसनाबाबत सविस्तर बैठक झाली असल्याचे स्पष्ट केले. पुनर्वसनाचा मुद्दा समोर आल्यामुळे धरणाच्या सांडव्यातून वाया जाणाऱ्या पाण्याचा मुद्दा बाजूला पडला. यानंतर या सभेत इतर विषयांवर चर्चा सुरू झाली.

या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी वारंवार गैरहजर राहतात, त्यामुळे साताऱ्याच्या विभाग नियंत्रकांना नोटीस काढण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईPoliticsराजकारण