शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
2
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
3
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
4
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
5
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
6
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
7
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
8
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
9
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
10
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
11
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
12
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
13
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
14
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
15
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
16
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
17
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
18
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
19
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
20
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा होरपळतोय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:29 IST

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून, सोमवारी जिल्ह्याचे तापमात ४०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. ...

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून, सोमवारी जिल्ह्याचे तापमात ४०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून पारा चाळीशी पार गेल्याने सातारकर पुरते हैराण झाले आहेत. रविवारी जिल्ह्याचे तापमान ४२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असून, ते आतापर्यंतचे उच्चांकी तापमान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे तापमान गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढले आहे. सरासरी चाळीस अंश सेल्सिअसचा पल्लाही पाऱ्याने ओलांडला आहे. सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असल्याने दुपारनंतर नागरिकांचे घराबाहेर पडणेही बंद झाले आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते व रहदारीची ठिकाणे दुपारच्या सुमारास ओस पडत आहेत.जिल्ह्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान रविवारी नोंदविण्यात आले. कमाल तापमानाची ४२.१ अंश तर किमान २६.६ अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली आहे. सोमवारी पारा दोन अंशांनी उतरून ४०.६ अंशांवर स्थिरावला. दुपारच्या वेळेस आकाशात ढग दाटून आल्याने उन्हाची दाहकता कमी जाणवली. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना वैशाख वणव्याची आठवण येत असून, उकाड्यामुळे रसवंतीगृह, आईस्क्रीमची दुकाने गर्दीने बहरून जात आहेत.डोळेच फक्त उघडे : कडक उन्हाच्या गरम झळा त्रास देत आहेत. श्वासोच्छवासातून गरम हवा गेल्याने डोके दुखणे, कोरडी सर्दी होण्याचे आजार जडत आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना जाणाºया तरुणी, शासकीय कार्यालये, दुकानांमध्ये काम करणाºया महिला घरातून बाहेर पडताना स्टोलने चेहरा झाकून घेत आहेत. केवळ डोळेच उघडे ठेवले जात आहेत. त्यामुळे काहीअंशी का होईना उन्हापासून बचाव करता येत असल्याचा या तरुणींचा अनुभव आहे. दुचाकीवरून जाणाºया महिलाही स्कार्पने तोंड झाकत आहेत. त्यामुळे उष्माघाताचा त्रासही जाणवत नाही.आईच्या पदरात लेकरूथंड वातावरणासाठी प्रसिद्ध असलेला कूल सातारा सध्या तापमानवाढीमुळं ‘हॉट’ बनला आहे. सरासरी ४१ अंशांवर तापमानाची नोंद होत असल्याने कडक उन्हामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या माउलीने आपल्या बाळालाही पदराखाली घेतले आहे.उष्माघात टाळण्यासाठी हे उपाय महत्त्वाचेसातारा : जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून, वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे प्रमाणही वाढत आहे. उष्माघात झाल्यानंतर थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था आदी लक्षणे दिसून येतात. उष्माघात जीवावर बेतू नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही घरगुती उपाययोजना केल्यास उष्माघातापासून बचाव होऊ शकतो.उष्माघात होऊ नये, यासाठी वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे.कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावी.उष्णता शोषून घेणारे कपडे वापरावेत. काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. सैल, पांढºया रंगाचे कपडे वापरावेत.दिवसभरात जास्तीत-जास्त पाणी प्यावे. उन्हामध्ये काम करताना थोडी विश्रांती घ्यावी.उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम थांबवावे.उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, टोपी यांचा वापर करावा.उष्ण पदार्थ खाणे टाळावे, शक्यतो पहाटे व सायंकाळीच चालण्यासाठी घराबाहेर पडावे.