शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

सातारा : धोकादायक वळणाला मिररचा आधार.., अपघाताचे प्रमाण घटले ; नागरिकांमधून समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 18:41 IST

सातारा येथील समर्थ मंदिर परिसरातील टोपेमामा चौकामध्ये धोकादायक वळणावर बसविण्यात आलेल्या मिररमुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले असून, यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देधोकादायक वळणाला मिररचा आधार..अपघाताचे प्रमाण घटले नागरिकांमधून समाधान

सातारा : येथील समर्थ मंदिर परिसरातील टोपेमामा चौकामध्ये धोकादायक वळणावर बसविण्यात आलेल्या मिररमुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले असून, यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.समर्थ मंदिर परिसरातील गोविंदनगरी अपार्टमेंटशेजारी टोपेमामा मंदिर असून या ठिकाणी चौक आहे. आजूबाजूला इमारती आणि जुनी घरे असल्यामुळे राजवाड्याहून आलेल्या वाहन चालकांना पोवईनाक्यावरून आलेली वाहने दिसत नव्हती. त्यामुळे या चौकात सतत अपघात होत होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलाला याच चौकात कारने धडक दिली होती. मात्र, सुदैवाने त्या मुलाला फारशी जखम झाली नाही. या चौकामध्ये वारंवार अपघात होत असल्याने काही नागरिकांनी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. परंतु, फार पूर्वीपासून या ठिकाणी लोकांचे वास्तव्य असल्याने आणि लोकांना पर्यायी जागा नसल्याने रुंदीकरणाला अडथळे येत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.राजवाड्याहून समर्थ मंदिरकडे जाताना तीव्र चढ आहे. या चढावर वाहनांचा वेग बऱ्यापैकी असतो. त्यामुळे पोवईनाक्यावरून आलेले वाहन राजवाड्याहून येणाऱ्या चालकाला दिसत नव्हते. त्यामुळे हमखास या ठिकाणी दिवसातून एकदा तरी अपघात होत होता. त्यामुळे या परिसरात राहाणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन पाच हजार रुपये किमतीचा मिरर त्या ठिकाणी बसविला.

गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी हा मिरर बसविल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण अक्षरश: घटले आहे. वाहन चालकांना दुसऱ्या बाजुंनी आलेली वाहने त्या आरशामध्ये दिसत असल्यामुळे हा चौक आता सुरक्षित झाला आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा