शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सातारा : नीरा खोऱ्यातील धरणांची स्थिती चिंताजनक, वीर धरणात मर्यादित पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:01 IST

राज्य शासनाने खंडाळा तालुक्याचा समावेश दुष्काळी भागाच्या यादीत केला आहे. त्यासाठी विशेष योजना शासनाकडून जाहीरही केल्या जातील. मात्र, पाण्यासारख्या भीषण टंचाईला सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील धरणाची स्थिती चिंताजनक असून, या महिनाअखेरच पाणीसाठा तब्बल तीन टीएमसीने खालावला आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी वापराचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देनीरा खोऱ्यातील धरणांची स्थिती चिंताजनक, वीर धरणात मर्यादित पाणीसाठामहिनाअखेरच पाणीसाठा तब्बल तीन टीएमसीने खालावला

खंडाळा : राज्य शासनाने खंडाळा तालुक्याचा समावेश दुष्काळी भागाच्या यादीत केला आहे. त्यासाठी विशेष योजना शासनाकडून जाहीरही केल्या जातील. मात्र, पाण्यासारख्या भीषण टंचाईला सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील धरणाची स्थिती चिंताजनक असून, या महिनाअखेरच पाणीसाठा तब्बल तीन टीएमसीने खालावला आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी वापराचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे.मागील वर्षी २१ आॅक्टोबर २०१७ रोजी नीरा खोऱ्यातील नीरा-देवधर, भाटघर व वीर या तिन्ही धरणांतील पाणीसाठा १०० टक्के एवढा होता तर या तिन्ही धरणांत मिळून एकूण पाणीसाठा टीएमसीमध्ये ४४.६४ टीएमसी एवढा होता. त्या तुलनेत यावर्षी नीरा खोऱ्यातील नीरा-देवधर १०० टक्के, भाटघर ९९.८४ टक्के व वीर धरणात केवळ ७०.०९ टक्के एवढाच पाणीसाठा असून, तो टीएमसीमध्ये ४१.८४ टीएमसी एवढा आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा जवळपास २.८० टीएमसी एवढा कमी आहे. यावर्षी टंचाईसदृश स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यानी पाणी जपून वापरावे तसेच सूक्ष्म सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करून पाणी काटकसरीने वापरावे. त्याचबरोबर अनधिकृत पाणी उपसा, कालव्यावरील सायपन काढून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर