शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

Satara: विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला चार मतदारसंघ घ्या, ५० टक्के जागांवर ठाम राहण्याचा निर्धारही व्यक्त, जिल्हा बैठकीत ठराव

By नितीन काळेल | Updated: July 1, 2024 19:40 IST

Satara News: लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसने प्रचारयंत्रणा राबविलेल्या भागात महाविकास आघाडी उमेदवाराला मताधिक्य मिळाले. काॅंग्रेसची जिल्ह्यात ताकद आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला आठपैकी चार जागा मिळाव्यात असा ठराव काॅंग्रेसच्या बैठकीत करण्यात आला.

- नितीन काळेल सातारा  - लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसने प्रचारयंत्रणा राबविलेल्या भागात महाविकास आघाडी उमेदवाराला मताधिक्य मिळाले. काॅंग्रेसची जिल्ह्यात ताकद आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला आठपैकी चार जागा मिळाव्यात असा ठराव काॅंग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. तसेच विधानसभेला जिल्ह्यातील ५० टक्के जागा लढविण्याचा ठाम निर्धारही पदाधिकाऱ्यांनी केला.

येथील जिल्हा काॅंग्रेस कमिटीत जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर बैठक झाली. यामध्ये लाेकसभा निवडणुकीचा आढावा आणि आगामी विधानसभेबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपले मते व्यक्त केली. या बैठकीला जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, काॅंग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर राजकीय चर्चा करण्यात आली. यावर जिल्ह्यातील सर्वच तालुकाध्यक्षांनी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के म्हणजे विधानसभेचे आठपैकी चार मतदारसंघ काॅंग्रेसला देण्याची मागणी जिल्हा काॅंग्रेस कमिटीने प्रदेश काॅंग्रेसकडे करावी. त्याचबरोबर काॅंग्रेसनेही महाविकास आघाडीसमोर याबाबतचा प्रस्ताव ठेवावा. जिल्हा काॅंग्रेस कमिटीनेही माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांच्यामार्फत ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आली.

पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्यानंतर जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांनी बैठकीत तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मते व्यक्त केली आहेत. याबाबत जिल्हा काॅंग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीकडे प्रस्ताव पाठवून निम्म्या जागा मागेल. तसेच या मागणीवर आपण ठाम राहू, असे स्पष्ट केले. तर जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केले. महाविकास आघाडी उमेदवाराचा थोडक्यात पराभव झाला, याची सल आहेच. आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी तयार रहावे. जिल्ह्यातील विधानसभेचे अधिकाधिक मतदारसंघ काॅंग्रेसकडे घेण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. तसा प्रयत्न प्रदेश काॅंग्रेस कमिटीकडे करेन, असे आश्वासन दिले.

या बैठकीला काॅंग्रेसच्या महिला प्रदेश सचिव धनश्री महाडीक, प्रदेश प्रतिनिधी बाबासाहेब कदम, रफिक बागवान, राजू मुलाणी, सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, काेरेगाव तालुकाध्यक्ष अॅड. श्रीकांत चव्हाण, जावळी अध्यक्ष संदीप माने, पाटण अध्यक्ष अभिजित पाटील, वाईचे विलास पिसाळ, खंडाळा सर्फराज बागवान, खटाव डाॅ. संतोष गोडसे, महाबळेश्वरचे नंदकुमार बावळेकर, सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रतापराव देशमुख, युवक काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, कल्याण पिसाळ, अन्वर पाशाखान, एम. के. भोसले, मनोजकुमार तपासे, युवकचे जिल्हाध्यक्ष अमरिजत कांबळे, अमित जाधव, सलीम बागवान, उमेश मोहिते, नाजीम इनामदार, डाॅ. शंकर पवार, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. हे मतदारसंघ असणार...सातारा जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. तर भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन तर राष्ट्रीय काॅंग्रेसचा एक आहे. काॅंग्रेसच्या बैठकीत चार जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यातील कऱ्हाड दक्षिण हा मतदारसंघ असणार आहे. येथून माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण हे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे हा मतदारसंघ काॅंग्रेसकडेच राहील. तर माण, वाई आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची इतर तीनमध्ये मागणी होऊ शकते असा अंदाज आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSatara areaसातारा परिसर