शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सातारा : पहाटे थंडी, दुपारी उकाडा, फेब्रुवारीतच कमाल तापमान ३५ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:27 IST

गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील कमाल तापमानात सतत वाढ होत असून फेब्रुवारीतच ३५ अंशाचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे किमान तापमानात घट झाल्याने पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत आहे. सतत बदलत असणाऱ्या अशा वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्याने आजारी पडण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.

ठळक मुद्देपहाटे थंडी, दुपारी उकाडा, फेब्रुवारीतच कमाल तापमान ३५ अंशावरसतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक

सातारा : गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील कमाल तापमानात सतत वाढ होत असून फेब्रुवारीतच ३५ अंशाचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे किमान तापमानात घट झाल्याने पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत आहे. सतत बदलत असणाऱ्या अशा वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्याने आजारी पडण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात थंडी जाणवत आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून तर किमान तापमान ११ ते १५ अंशाच्या दरम्यान होते. तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमान ९ अंशांपर्यंत खाली आले होते. हे तापमान दोन वर्षांतील निच्चांकी ठरले होते.

त्यानंतर संक्रातीच्या दरम्यान, किमान तापमानात तसेच कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचे चटके जाणवू लागले होते. जानेवारी महिन्यातच कमाल तापमान ३० अंशांच्यावर गेले व बरेच दिवस ते स्थिर होते.फेब्रुवारी महिन्यापासून तर किमान आणि कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली. कमाल तापमान ३० च्यावर जाऊ लागले. तर किमान तापमानात वाढ होऊन ते १८ अंशापर्यंत पोहोचले. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे.

किमान तापमान १५ अंशावरुन १७ अंशापर्यंत पोहोचले तसेच त्यात उतारही आला. सध्या साताऱ्यांतील किमान तापमान १७.०७ अंशावरुन १४.०७ पर्यंत खाली आले आहेत. तर दुसरीकडे कमाल तापमान ३३ अंशावरुन ३५ च्या पुढे गेले. त्यामुळे दिवसा उकाडा आणि पहाटे थंडी जाणवत आहे.

अशा सतत बदलत जाणाऱ्या वातावरणामुळे थंडी, ताप, खोकला अशा आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गावोगावच्या रुग्णालयातही उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.तापमान      किमान             कमालदि. २०              १५.०५    ३३.०८दि. २१             १६.००     ३४.०२दि. २२             १६.०१    ३३.०६दि. २३            १७.००       ३४.०१दि. २४           १७.०७       ३३.०६दि. २५            १५.०५         ३४.०२दि. २६            १३.०५     ३५.०१दि. २७            १४.०७ ..........

टॅग्स :TemperatureतापमानSatara areaसातारा परिसर