शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Satara Bus Accident: बसमध्ये चेष्टा-मस्करी सुरू होती अन् होत्याचं नव्हतं झालं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 15:12 IST

Satara Bus Accident: दैव बलवत्तर म्हणूनच या बसमधील प्रकाश सावंत-देसाई बचावले आहेत. त्यांनी सांगितलेलं अपघाताचं कारण अधिकच अस्वस्थ करणारं आहे.

पोलादपूर/सातारा: महाबळेश्वरला पावसाळी सहलीसाठी निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी मिनी बस पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात ६०० फूट खोल कोसळल्यानं ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. दैव बलवत्तर म्हणूनच या बसमधील प्रकाश सावंत-देसाई बचावले आहेत. त्यांनी सांगितलेलं अपघाताचं कारण अधिकच अस्वस्थ करणारं आहे. ड्रायव्हरनं केवळ क्षणभरासाठी मागे पाहिलं आणि कुणाला काही कळायच्या आत बस दरीत गेली, होत्याचं नव्हतं झालं.  

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी दरवर्षी लावणी वगैरे झाल्यानंतर पिकनिकला जातात. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ड्रायव्हरसह ३४ जण वर्षासहलीला निघाले होते. दोन दिवस धम्माल करण्यासाठी सगळेच उत्सुक होते. त्यांनी ग्रूप फोटो काढला आणि बस महाबळेश्वरच्या दिशेनं रवाना झाली. परंतु, नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. 

बसमध्ये सगळेजण एन्जॉय करत होते. चेष्टा-मस्करी करत करत प्रवास सुरू होता. तेव्हा, बस चालकाने सहज मागे बघितलं आणि बस रस्ता सोडून मातीवर गेली. त्यावेळी ड्रायव्हरने ब्रेक लावले, पण मातीवरून घसरत जाऊन बस दरीत कोसळली, असं प्रकाश यांनी सांगितलं. 

(Inputs: वार्ताहर प्रकाश कदम)

असे बचावले प्रकाश सावंत-देसाई

प्रकाश सावंत-देसाई हे कृषी विद्यापीठात साहायक अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. बस दरीत जात असताना प्रकाश दारातून बाहेर फेकले गेले. झाडाच्या आधाराने ते बचावले आणि नंतर फांद्यांना धरूनच साधारण अर्ध्या तासात रस्त्यावर पोहोचले. घाटातील वाहनांना अडवून त्यांनी अपघाताची माहिती दिली आणि कृषी विद्यापीठातील वरिष्ठांनाही घडलेली घटना सांगितली. त्यानंतर वेगाने सूत्रं हलली आणि स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकं वेगानं घटनास्थळी पोहोचली. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बघ अपघातAccidentअपघातMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान