शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

सातारा : ब्रह्मपुरीतील पुलाचा भराव लागला खचू , उद्घाटनापूर्वीच धोक्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 14:43 IST

रहिमतपूर-अंगापूर गावाला जोडणारा ब्रह्मपुरी येथील कृष्णा नदीवरील भल्या मोठ्या पुलावरून रात्रंदिवस वाळूच्या डंपरची वाहतूक सुरू आहे. डंपरच्या शेकडो फेऱ्यांमुळे ब्रह्मपुरीतील पुलाचा दोन्ही बाजूंचा भराव खचू लागला आहे.

ठळक मुद्दे ब्रह्मपुरीतील पुलाचा भराव लागला खचू उद्घाटनापूर्वीच धोक्याचा इशारा वाळूच्या डंपरचीही राजरोस वाहतूक

अंगापूर : रहिमतपूर-अंगापूर गावाला जोडणारा ब्रह्मपुरी येथील कृष्णा नदीवरील भल्या मोठ्या पुलावरून रात्रंदिवस वाळूच्या डंपरची वाहतूक सुरू आहे. डंपरच्या शेकडो फेऱ्यांमुळे ब्रह्मपुरीतील पुलाचा दोन्ही बाजूंचा भराव खचू लागला आहे.उद्घाटनापूर्वीच नव्या पुलाला धोका निर्माण झाल्याने अंगापूर ग्रामस्थांमतून संताप व्यक्त केला जात आहे.अंगापूर व रहिमतपूर येथिल लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करून ब्रह्मपुरी येथील कृष्णा नदीवर पुलाची उभारणी केली. या पुलामुळे माणदेश ते कोकण, व्हाया नॅशनल हायवे नंबर चार असा प्रवास जवळचा होणार आहे. तसेच अंगापूर ते रहिमतपूर या दरम्यानचा दळणवळणास चांगल्या पद्धतीने चालना मिळाली.

कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्यानंतर पुलाची यशस्वीपणे उभारणी झाली. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या पुलाचा वापर चुकीच्या पद्धतीने आणि धोकादायकरीत्या सुरू आहे. राजरोसपणे रात्रंदिवस या पुलावरून वाळूच्या डंपरची ये-जा सुरू असते. वाळूची ओव्हरलोड वाहने या पुलावरून जाताना पुलाचा थरकाप होत आहे.

वाळूची वाहतूक सुरू असताना पुलावर उभे राहिली असता वाळूच्या वजनदार वाहनाने पुलाचा थरकाप होत असल्याचे नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडत आहे. पूर्व-पश्चिम असा उभारलेला पुलाच्या अंगापूरच्या दिशेला दक्षिण बाजूस पुलाला टाकलेला भराव खचू लागला आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम उघडे पडू लागले आहे.पुलाच्या आजूबाजूला जवळपास वाळूचा उपसा झाल्यास पुलाला निर्माण झालेला धोक्यात आणखी वाढ होणार आहे. सातारा-कोरेगाव तालुक्याला जोडणाऱ्या या टोलेजंग पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने अंगापूर ग्रामस्थ अस्वस्थ झाले आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने आवश्यक ती कठोर पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा