शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

सातारा : सावधान! विषारी फळांचा भरलाय बाजार, रसायनाने फळे पिकवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 14:52 IST

बाजारात फळांची होणारी कमी-जास्त मागणी आणि दरांचे कमी-जास्त होणारे गणित यांचा मेळ बसवण्यासाठी कच्ची फळे विकत घेऊन ती रसायनांने पिकवून बाजारात विकण्याचा खेळ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा मात्र पुरताच खेळ झालेला आहे. आंबा, केळी, चिकू, टरबूज, खरबूज, सफरचंद, डाळिंब, केळी यासारखी फळे पिकवण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड या घातक रसायनाचा वापर होत आहे.

ठळक मुद्देसावधान! विषारी फळांचा भरलाय बाजाररसायनाने फळे पिकवण्याकडे व्यापाऱ्यांचा कलनागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ

गोडोली : बाजारात फळांची होणारी कमी-जास्त मागणी आणि दरांचे कमी-जास्त होणारे गणित यांचा मेळ बसवण्यासाठी कच्ची फळे विकत घेऊन ती रसायनांने पिकवून बाजारात विकण्याचा खेळ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा मात्र पुरताच खेळ झालेला आहे.निरोगी राखण्यासाठी फळांचा आहार उत्तम मानला जात असला तरी हा आहारही आता अनेक आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे. अल्पावधीतच भरपूर कमाई करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या अनेक अपप्रवृत्ती फळांच्या व्यवसायात तयार झाल्या आहेत. घातक रसायनांचा वापर करून अत्यंत कमी वेळात पिकवलेली फळे बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत.

या प्रवृत्तींना आळा घालणारी अन्न औषध प्रशासन नावाची यंत्रणा मात्र पुरती सुस्तावल्याचे दिसून येत आहे. नैसर्गिक फळ पिकविण्याच्या पद्धतीला फाटा देऊन फळे पिकविण्यासाठी घातक रसायनाचा सर्रास वापर केला जात आहे. आंबा, केळी, चिकू, टरबूज, खरबूज, सफरचंद, डाळिंब, केळी यासारखी फळे पिकवण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड या घातक रसायनाचा वापर होत आहे.

फळे पिकवण्याच्या नैसर्गिक पद्धतीत चार ते पाच दिवसांपेक्षा अधिक काळ लागत असल्याने झटपट पद्धती स्वीकारली जात आहे. यामध्ये कॅल्शिअम कार्बाइड व इथिलिन सोल्युशन या घातक रसायनांचा वापर करून काही तासांतच फळे पिकवली जात आहेत. रसायनांच्या साह्याने पिकवलेल्या या फळांच्यामुळे ग्राहकांना अनेक गंभीर आजार निर्माण होत आहेत.

टॅग्स :fruitsफळेSatara areaसातारा परिसर