शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

सातारा : प्र नंतर शासकीयही पडण्याच्या बेतात, प्रशासकीय इमारतीकडे दुर्लक्ष, स्वच्छतेचे तीन-तेरा; पाण्याचाही तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 18:40 IST

सातारा येथील प्रशासकीय इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत असून, या टोलेजंग इमारतीच्या नावातील ह्यप्रह्ण पडून केवळ शासकीय हे अक्षर उरले आहे. स्टीलमधील ही अक्षरे गंजून पडत आहेत, आता उरलेले शासकीय ही अक्षरेही पडण्याच्या बेतात आहेत.

ठळक मुद्देस्टीलमधील अक्षरे गंजून पडत आहेतआता उरलेले शासकीय अक्षरेही पडण्याच्या बेतात सैन्य भरतीनंतर अस्वच्छतेचे साम्राज्य

सातारा : येथील प्रशासकीय इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत असून, या टोलेजंग इमारतीच्या नावातील प्र पडून केवळ शासकीय हे अक्षर उरले आहे. स्टीलमधील ही अक्षरे गंजून पडत आहेत, आता उरलेले शासकीय ही अक्षरेही पडण्याच्या बेतात आहेत.

इमारतीला सुरुवातीच्या काळात केलेली रंगरंगोटी आता फिकी पडलेली आहे. त्यातच इमारतीच्या दर्शनी भागात लावलेली स्टीलची अक्षरेही गंजून पडू लागली आहेत. प्रशासकीय इमारत असे या दर्शनी भागाच्या इमारतीवर लिहिण्यात आले होते. यातील प्र  हे अक्षर केव्हाच पडून गेले आहे.

उरलेली शासकीय ही अक्षरेही गंजू लागल्याचे दिसते. त्याकडे दुर्लक्ष केले गेल्यास ती अक्षरेही पडून जाण्याची शक्यता असून, भविष्यात ही इमारत शासकीय की खासगी? हे ओळखणेही अवघड होण्याची दाट शक्यता आहे.ही इमारत जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वांच्याच दुर्लक्षाचे धनी बनले आहे. इमारतीतील लिफ्ट कधी सुरू होते, तर अनेकदा ती बंदस्थितीत पाहायला मिळते. चार मजल्यांच्या इमारतीवर विविध शासकीय कार्यालये आहेत. साहजिकच कामानिमित्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांना पायऱ्या चढूनच वर जावे लागते.

अपंगांचे हाल होताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला इमारतीत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. पाण्याची वारंवार टंचाई होत असल्याने स्वच्छतागृहे अस्वच्छ राहून दुर्गंधी पसरताना पाहायला मिळते.जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, आत्मा, जिल्हा माहिती अधिकारी, सीआयडी, जिल्हा वाहतूक शाखा, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, महिला व बालकल्याण विभाग अशी शासकीय कार्यालये या इमारतीत आहेत. शेकडो लोक कामानिमित्त कार्यालयात येत असतात. इमारतीचा परिसरही अस्वच्छ बनला आहे.सैन्य भरतीनंतर अस्वच्छतेचे साम्राज्यसातारा शहरात पोलिस परेड मैदानावर नुकतीच भरती प्रक्रिया पार पडली. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो युवक आले होते. त्यांनी आणलेल्या साहित्याच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, यांचा खच या इमारतीत पडलेला दिसतो. त्यामुळे येथे स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार