शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

सातारा : राज्यातील अंगणवाडीतार्इंच्या नोकरीबाबत प्रशासन हलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 17:45 IST

राज्यातील अंगणवाडीतार्इंचे सेवानिवृत्तीचे वय पुन्हा ६५ करण्यात येऊनही तसा आदेश न निघाल्याने संघटना आक्रमक झाल्या होत्या. एक एप्रिलला एक दिवस बाकी असताना शनिवारी महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी पत्र काढले आहे. त्यामध्ये शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत सेविकांची मानधनी सेवा समाप्त करण्यात येऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे. असे असले तरी शासनाचा अध्यादेश दुपारपर्यंततरी निघाला नव्हता. सध्यस्थितीत मात्र, अंगणवाडीतार्इंची सेवा राहिली आहे.

ठळक मुद्देराज्यातील अंगणवाडीतार्इंच्या नोकरीबाबत प्रशासन हललेसचिवांचे पत्र प्राप्त : शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत सेवासमाप्ती करु नये अशी सूचना

सातारा : राज्यातील अंगणवाडीतार्इंचे सेवानिवृत्तीचे वय पुन्हा ६५ करण्यात येऊनही तसा आदेश न निघाल्याने संघटना आक्रमक झाल्या होत्या. एक एप्रिलला एक दिवस बाकी असताना शनिवारी महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी पत्र काढले आहे. त्यामध्ये शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत सेविकांची मानधनी सेवा समाप्त करण्यात येऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे. असे असले तरी शासनाचा अध्यादेश दुपारपर्यंततरी निघाला नव्हता. सध्यस्थितीत मात्र, अंगणवाडीतार्इंची सेवा राहिली आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० केल्यानंतर कर्मचारी व विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधिमंडळात ६५ वयोमर्यादा कायम ठेवण्याची घोषणा केली. मात्र, यासंबंधीचा अध्यादेश किंवा पत्र बुधवारपर्यंततरी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले नव्हते.

त्यामुळे एक एप्रिलला अवघे तीन दिवस शिल्लक असताना राज्यातील १० हजारांहून अधिक अंगणवाडीतार्इंच्या जीवाला घोर कायम राहिला होता. त्यानंतर अंगणवाडी संघटना आक्रमक झाल्या. त्यातच गुरूवार आणि शुक्रवार सुट्टी असल्याने संघटनेने शनिवारी एकात्मिक बालविकास विभागाचे सचिव आणि मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार संघटनेचे पदाधिकारी शनिवारी मुंबईला गेले आहेत. त्यांनी सचिवांची भेट घेतली.

त्यानंतर सचिवांनी पत्र काढले आहे. त्यामध्ये एक एप्रिल रोजी वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. त्यामध्ये पुढील पाच वर्षांसाठी मानधनी पदावर त्या काम करण्यास पात्र आहेत का याबाबत सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांना सेवेत ठेवण्यात यावे किंवा कसे याचा निर्णय लवकरच मंत्रीमंडळाच्या मान्यतेने घेण्यात येणार आहे.

त्यामुळे एक एप्रिलला वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या सेविका, मतदनीस यांना शासनाचा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत त्यांची मानधनी सेवा समाप्त करु नये अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाचा अध्यादेश येईपर्यंततरी ६० वर्षे पूर्ण झालेल्या अंगणवाडीताई कामावर राहणार आहेत. या पत्रामुळे सातारा जिल्ह्यातील २९५ कर्मचाऱ्यांबरोबरच राज्यातील सुमारे दहा हजारांहून अधिक अंगणवाडीतार्इंची सेवा सध्यातरी कायम राहणार असल्याचे आशादायक चित्र आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकारSchoolशाळा