शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : राज्यातील अंगणवाडीतार्इंच्या नोकरीबाबत प्रशासन हलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 17:45 IST

राज्यातील अंगणवाडीतार्इंचे सेवानिवृत्तीचे वय पुन्हा ६५ करण्यात येऊनही तसा आदेश न निघाल्याने संघटना आक्रमक झाल्या होत्या. एक एप्रिलला एक दिवस बाकी असताना शनिवारी महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी पत्र काढले आहे. त्यामध्ये शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत सेविकांची मानधनी सेवा समाप्त करण्यात येऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे. असे असले तरी शासनाचा अध्यादेश दुपारपर्यंततरी निघाला नव्हता. सध्यस्थितीत मात्र, अंगणवाडीतार्इंची सेवा राहिली आहे.

ठळक मुद्देराज्यातील अंगणवाडीतार्इंच्या नोकरीबाबत प्रशासन हललेसचिवांचे पत्र प्राप्त : शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत सेवासमाप्ती करु नये अशी सूचना

सातारा : राज्यातील अंगणवाडीतार्इंचे सेवानिवृत्तीचे वय पुन्हा ६५ करण्यात येऊनही तसा आदेश न निघाल्याने संघटना आक्रमक झाल्या होत्या. एक एप्रिलला एक दिवस बाकी असताना शनिवारी महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी पत्र काढले आहे. त्यामध्ये शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत सेविकांची मानधनी सेवा समाप्त करण्यात येऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे. असे असले तरी शासनाचा अध्यादेश दुपारपर्यंततरी निघाला नव्हता. सध्यस्थितीत मात्र, अंगणवाडीतार्इंची सेवा राहिली आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० केल्यानंतर कर्मचारी व विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधिमंडळात ६५ वयोमर्यादा कायम ठेवण्याची घोषणा केली. मात्र, यासंबंधीचा अध्यादेश किंवा पत्र बुधवारपर्यंततरी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले नव्हते.

त्यामुळे एक एप्रिलला अवघे तीन दिवस शिल्लक असताना राज्यातील १० हजारांहून अधिक अंगणवाडीतार्इंच्या जीवाला घोर कायम राहिला होता. त्यानंतर अंगणवाडी संघटना आक्रमक झाल्या. त्यातच गुरूवार आणि शुक्रवार सुट्टी असल्याने संघटनेने शनिवारी एकात्मिक बालविकास विभागाचे सचिव आणि मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार संघटनेचे पदाधिकारी शनिवारी मुंबईला गेले आहेत. त्यांनी सचिवांची भेट घेतली.

त्यानंतर सचिवांनी पत्र काढले आहे. त्यामध्ये एक एप्रिल रोजी वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. त्यामध्ये पुढील पाच वर्षांसाठी मानधनी पदावर त्या काम करण्यास पात्र आहेत का याबाबत सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांना सेवेत ठेवण्यात यावे किंवा कसे याचा निर्णय लवकरच मंत्रीमंडळाच्या मान्यतेने घेण्यात येणार आहे.

त्यामुळे एक एप्रिलला वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या सेविका, मतदनीस यांना शासनाचा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत त्यांची मानधनी सेवा समाप्त करु नये अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाचा अध्यादेश येईपर्यंततरी ६० वर्षे पूर्ण झालेल्या अंगणवाडीताई कामावर राहणार आहेत. या पत्रामुळे सातारा जिल्ह्यातील २९५ कर्मचाऱ्यांबरोबरच राज्यातील सुमारे दहा हजारांहून अधिक अंगणवाडीतार्इंची सेवा सध्यातरी कायम राहणार असल्याचे आशादायक चित्र आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकारSchoolशाळा