शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

वाहन गेले की थरथरतो ‘सांगवी पूल’

By admin | Updated: December 29, 2014 23:41 IST

निरा नदी : फलटणकरांना प्रतीक्षा नव्याची...

फलटण : फलटण-बारामती रस्त्यावरील सांगवी येथील निरा नदीवरील वाहतुकीच्या पुलाची मोठी दुर्दशा झाली आहे. या पुलावरील वर्दळ पाहता हा पुल साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे. या पुलाशेजारी नवीन पुलाचे कामही रखडल्याने प्रवाशांच्यात भितीचे वातावरण आहे.फलटण ते बारामती हे २५ किलामिटर अंतर असून सध्या शिरवळ फलटण बारामती असा चौपदरीकरणाचे काम मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्ण रस्ता खाजगी ठेकेदाराकडे वर्ग करण्यात आला आहे. फलटण ते बारामती रस्त्यांवर अनेक ठिकाणी त्यांनी रस्त्याची, पुलांची कामे सुरू करून अर्धवट स्थितीत ठेवली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वळणे, खड्डे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.फलटण ते बारामती रस्त्यावर सतत अपघातांची मालिका सुरू असून त्यामध्ये शेकडो जणांचा जीव रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गेला आहे. अनेकांना अपघातामुळे अपंगत्वही आले आहे. अशीच परिस्थिती निरा नदीवर असलेल्या जुन्या व नव्या पुलांची झाली आहे. निरा नदीवर सांगवी येथे जुना पुल आहे. या पुलाला बाजुने कठडे व या कठड्यांना अपघात होवू नये म्हणून साखळदंड आहेत. या पुलावरून दररोज लहान, मोठे, अवजड अशी हजारो वाहनांची दिवसरात्र वर्दळ चालु असते. या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहेच पण पुलावरील कट्टे तुटलेल्या स्थितीत आहेत. पुलाला कठडे नसल्याने जर अपघात होवून कोणी नदीत पडले तर त्याला वाचवणे अवघड होत आहे. रात्रीच्या वेळेस तर तुटलेल्या कठड्यामुळे हा पुल भयानक परिस्थितीत दिसतो. दहा बारा वर्षांपूर्वी एक वऱ्हाडाचा अख्खा ट्रक नदीत पडून अनेकांचा मृत्यू झाला होता. आजही या पुलावरून जाताना अनेकांना त्या अपघाताची आठवण होते. मात्र शासकीय यंत्रणा किंवा चौपदरीकरणाचे काम हाती घेतलेल्या ठेकेदारांनी या पुलाकडे तसेच रस्त्याच्या दुरावस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. फलटण बारामती रस्ता चौपदरीकरणासाठी ठेकेदाराला हस्तांतरीत करण्यात आल्याने या रस्त्याच्या डागडुजीकडे आम्हाला लक्ष देता येत नसल्याचे शासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वाहनांच्या वर्दळीने थरथरतो रस्तानिरा नदीवरील या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम चौपदरीकरणांतर्गत हाती घेण्यात आले. पण अर्धवट स्थितीत हा पूल सोडून दिल्याने या पुलाचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे जुन्या पुलावरूनच पूर्ण वाहतुक सुरू आहे. पुलावरील खड्डे व तुटलेले कट्टे यामुळे मोठ्या वाहनांच्या येण्या जाण्यामुळे पूल थरथरताना दिसतो. एखाद्या दिवशी धोकादायक स्थितीत असलेला पूल तुटल्यास याला कोण जबाबदार राहणार असा सवाल वाहनधारक उपस्थित करत आहेत.