शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

वाहन गेले की थरथरतो ‘सांगवी पूल’

By admin | Updated: December 29, 2014 23:41 IST

निरा नदी : फलटणकरांना प्रतीक्षा नव्याची...

फलटण : फलटण-बारामती रस्त्यावरील सांगवी येथील निरा नदीवरील वाहतुकीच्या पुलाची मोठी दुर्दशा झाली आहे. या पुलावरील वर्दळ पाहता हा पुल साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे. या पुलाशेजारी नवीन पुलाचे कामही रखडल्याने प्रवाशांच्यात भितीचे वातावरण आहे.फलटण ते बारामती हे २५ किलामिटर अंतर असून सध्या शिरवळ फलटण बारामती असा चौपदरीकरणाचे काम मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्ण रस्ता खाजगी ठेकेदाराकडे वर्ग करण्यात आला आहे. फलटण ते बारामती रस्त्यांवर अनेक ठिकाणी त्यांनी रस्त्याची, पुलांची कामे सुरू करून अर्धवट स्थितीत ठेवली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वळणे, खड्डे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.फलटण ते बारामती रस्त्यावर सतत अपघातांची मालिका सुरू असून त्यामध्ये शेकडो जणांचा जीव रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गेला आहे. अनेकांना अपघातामुळे अपंगत्वही आले आहे. अशीच परिस्थिती निरा नदीवर असलेल्या जुन्या व नव्या पुलांची झाली आहे. निरा नदीवर सांगवी येथे जुना पुल आहे. या पुलाला बाजुने कठडे व या कठड्यांना अपघात होवू नये म्हणून साखळदंड आहेत. या पुलावरून दररोज लहान, मोठे, अवजड अशी हजारो वाहनांची दिवसरात्र वर्दळ चालु असते. या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहेच पण पुलावरील कट्टे तुटलेल्या स्थितीत आहेत. पुलाला कठडे नसल्याने जर अपघात होवून कोणी नदीत पडले तर त्याला वाचवणे अवघड होत आहे. रात्रीच्या वेळेस तर तुटलेल्या कठड्यामुळे हा पुल भयानक परिस्थितीत दिसतो. दहा बारा वर्षांपूर्वी एक वऱ्हाडाचा अख्खा ट्रक नदीत पडून अनेकांचा मृत्यू झाला होता. आजही या पुलावरून जाताना अनेकांना त्या अपघाताची आठवण होते. मात्र शासकीय यंत्रणा किंवा चौपदरीकरणाचे काम हाती घेतलेल्या ठेकेदारांनी या पुलाकडे तसेच रस्त्याच्या दुरावस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. फलटण बारामती रस्ता चौपदरीकरणासाठी ठेकेदाराला हस्तांतरीत करण्यात आल्याने या रस्त्याच्या डागडुजीकडे आम्हाला लक्ष देता येत नसल्याचे शासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वाहनांच्या वर्दळीने थरथरतो रस्तानिरा नदीवरील या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम चौपदरीकरणांतर्गत हाती घेण्यात आले. पण अर्धवट स्थितीत हा पूल सोडून दिल्याने या पुलाचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे जुन्या पुलावरूनच पूर्ण वाहतुक सुरू आहे. पुलावरील खड्डे व तुटलेले कट्टे यामुळे मोठ्या वाहनांच्या येण्या जाण्यामुळे पूल थरथरताना दिसतो. एखाद्या दिवशी धोकादायक स्थितीत असलेला पूल तुटल्यास याला कोण जबाबदार राहणार असा सवाल वाहनधारक उपस्थित करत आहेत.