शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची मागणी तरीही माणमध्ये पाणी !

By admin | Updated: May 16, 2016 00:49 IST

किरकसाल येथे ग्रामस्थांनी केले जलपूजन : अरुण गोरेंचा विरोधकांना टोला

दहिवडी : ‘उरमोडी योजनेचे पाणी आ. जयकुमार गोरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे किरकसालच्या बोगद्यातून पुन्हा एकदा माण तालुक्यात झेपावले आहे. ऐन दुष्काळात तीव्र पाणीटंचाई असताना हे पाणी आल्याने दिलासा मिळणार आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून आ. गोरेंनी वारंवार उरमोडीचे पाणी माण-खटावमध्ये आणूनही कोकलणाऱ्या बिनकामाच्या विरोधकांना आता पुन्हा एकदा चपराक बसली आहे,’ असा टोला माण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण गोरे यांनी लगावला. दरम्यान, यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्याची मागणी असतानाही माण तालुक्यात पाणी आणल्याचे स्पष्ट केले. रविवारी उरमोडी योजनेचे पाणी किरकसाल बोगद्यातून माण तालुक्यात आल्यानंतर जलपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला किरकसाल येथील ग्रामस्थ उपस्थित होते. दुष्काळात माण तालुक्यात आलेले पाणी पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसून येत होता. सर्वांनीच उरमोडीच्या या पाण्याचे उत्साहात पूजन केले. त्यानंतर बोराटवाडी येथे अरुण गोरे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना सभापती अरुण गोरे म्हणाले, ‘माण-खटावच्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक कायमचा मिटवण्यासाठीच आ. जयकुमार गोरे यांनी सुरूवातीपासूनच प्रयत्न केले. उरमोडी योजनेसाठी आघाडीच्या कार्यकाळात कित्येक पट अधिक निधी आणून रखडलेली कामे मार्गी लावली. विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत माणदेशी जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे साडेतीन वर्षातच म्हणजे २०११-१२ मध्ये कण्हेर जोड कालव्याची कामे युद्धपातळीवर मार्गी लावून ऐन दुष्काळात सलग २७९ दिवस उरमोडीचे पाणी येरळवाडी तलावात सोडले होते. त्यानंतरच्या काळात पंपहाऊस एक व दोनची क्षमता वाढवून पाणी माण तालुक्यात आणण्यासाठी आमदार गोरेंनी जोरदार प्रयत्न केले होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेवून कॅनॉलचीही कामे पूर्ण केली. आमदारांच्या प्रयत्नांना यश येवून २४ आॅगस्ट २०१४ रोजी उरमोडीचे पाणी पहिल्यांदा माण तालुक्यात पोहचले होते. त्यावेळीही हजारोंच्या संख्येने माणदेशी जनता जलपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. त्याचबरोबर यावर्षीही १४ जानेवारीला पुन्हा एकदा उरमोडी योजनेचे पाणी जनतेच्या मागणीनुसार माणमध्ये आणले होते. दरम्यानच्या काळात कॅनॉल, पंपहाऊस, भूसंपादनाच्या कामासाठीही आमदार गोरेंनी विशेष प्रयत्न केले आहेत. प्रमाणिक आणि निरंतर प्रयत्नांमुळे उरमोडीचे पाणी माण तालुक्यात येत आहे. मात्र, पाण्यासाठी काहीच प्रयत्न न करणारे किंबहुना ज्यांना माण-खटावच्या मातीशी देणे घेणे नाही. असे रिकामटेकडे आणि पात्रता नसणारे विरोधक येणारे पाणी दिसत असूनही कायमच कोकलत आहेत, त्यांना आमदार जयकुमारे गोरेंच्या प्रयत्नांनी वेळोवेळी चपराकही दिलेली आहे, तरीही त्यांना याचा नेहमीच विसर पडत आलेला आहे. रविवारी आलेल्या उरमोडी योजनेच्या पाण्यामुळे दु्ष्काळातही येथील जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसू येत होता. यापुढेही माण-खटावच्या विकासासाठी आमदार गोरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.‘ या पत्रकारपरिषदेस दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, दिगंबर राजगे, आप्पा बोराटे, बाळासाहेब पिसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)