शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

सांगलीची मागणी तरीही माणमध्ये पाणी !

By admin | Updated: May 16, 2016 00:49 IST

किरकसाल येथे ग्रामस्थांनी केले जलपूजन : अरुण गोरेंचा विरोधकांना टोला

दहिवडी : ‘उरमोडी योजनेचे पाणी आ. जयकुमार गोरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे किरकसालच्या बोगद्यातून पुन्हा एकदा माण तालुक्यात झेपावले आहे. ऐन दुष्काळात तीव्र पाणीटंचाई असताना हे पाणी आल्याने दिलासा मिळणार आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून आ. गोरेंनी वारंवार उरमोडीचे पाणी माण-खटावमध्ये आणूनही कोकलणाऱ्या बिनकामाच्या विरोधकांना आता पुन्हा एकदा चपराक बसली आहे,’ असा टोला माण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण गोरे यांनी लगावला. दरम्यान, यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्याची मागणी असतानाही माण तालुक्यात पाणी आणल्याचे स्पष्ट केले. रविवारी उरमोडी योजनेचे पाणी किरकसाल बोगद्यातून माण तालुक्यात आल्यानंतर जलपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला किरकसाल येथील ग्रामस्थ उपस्थित होते. दुष्काळात माण तालुक्यात आलेले पाणी पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसून येत होता. सर्वांनीच उरमोडीच्या या पाण्याचे उत्साहात पूजन केले. त्यानंतर बोराटवाडी येथे अरुण गोरे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना सभापती अरुण गोरे म्हणाले, ‘माण-खटावच्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक कायमचा मिटवण्यासाठीच आ. जयकुमार गोरे यांनी सुरूवातीपासूनच प्रयत्न केले. उरमोडी योजनेसाठी आघाडीच्या कार्यकाळात कित्येक पट अधिक निधी आणून रखडलेली कामे मार्गी लावली. विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत माणदेशी जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे साडेतीन वर्षातच म्हणजे २०११-१२ मध्ये कण्हेर जोड कालव्याची कामे युद्धपातळीवर मार्गी लावून ऐन दुष्काळात सलग २७९ दिवस उरमोडीचे पाणी येरळवाडी तलावात सोडले होते. त्यानंतरच्या काळात पंपहाऊस एक व दोनची क्षमता वाढवून पाणी माण तालुक्यात आणण्यासाठी आमदार गोरेंनी जोरदार प्रयत्न केले होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेवून कॅनॉलचीही कामे पूर्ण केली. आमदारांच्या प्रयत्नांना यश येवून २४ आॅगस्ट २०१४ रोजी उरमोडीचे पाणी पहिल्यांदा माण तालुक्यात पोहचले होते. त्यावेळीही हजारोंच्या संख्येने माणदेशी जनता जलपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. त्याचबरोबर यावर्षीही १४ जानेवारीला पुन्हा एकदा उरमोडी योजनेचे पाणी जनतेच्या मागणीनुसार माणमध्ये आणले होते. दरम्यानच्या काळात कॅनॉल, पंपहाऊस, भूसंपादनाच्या कामासाठीही आमदार गोरेंनी विशेष प्रयत्न केले आहेत. प्रमाणिक आणि निरंतर प्रयत्नांमुळे उरमोडीचे पाणी माण तालुक्यात येत आहे. मात्र, पाण्यासाठी काहीच प्रयत्न न करणारे किंबहुना ज्यांना माण-खटावच्या मातीशी देणे घेणे नाही. असे रिकामटेकडे आणि पात्रता नसणारे विरोधक येणारे पाणी दिसत असूनही कायमच कोकलत आहेत, त्यांना आमदार जयकुमारे गोरेंच्या प्रयत्नांनी वेळोवेळी चपराकही दिलेली आहे, तरीही त्यांना याचा नेहमीच विसर पडत आलेला आहे. रविवारी आलेल्या उरमोडी योजनेच्या पाण्यामुळे दु्ष्काळातही येथील जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसू येत होता. यापुढेही माण-खटावच्या विकासासाठी आमदार गोरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.‘ या पत्रकारपरिषदेस दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, दिगंबर राजगे, आप्पा बोराटे, बाळासाहेब पिसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)