शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

समर्थ मंदिर - बोगदा रस्ता टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : समर्थ मंदिर ते बोगदा रस्त्यावर नगरसेवक सुहास राजेशिर्के यांच्या प्रयत्नातून पथदिवे बसविणे व रुंदीकरणाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : समर्थ मंदिर ते बोगदा रस्त्यावर नगरसेवक सुहास राजेशिर्के यांच्या प्रयत्नातून पथदिवे बसविणे व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पथदिव्यांमुळे या रस्त्याला नवी झळाळी प्राप्त होणार असल्याने परिसरातील नागरिक व वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २० मध्ये रखडलेली अनेक कामे मार्गी लावली आहेत. याच प्रभागातील समर्थ मंदिर ते बोगदा रस्त्यावर विजेचे खांब विसंगत उभे असल्याने तसेच फ़ूटपाथ नसल्याने कुरणेश्वर, सज्जनगड, कास व ठोसेघर या पर्यटन क्षेत्रांकडे जाणाऱ्या पर्यटकांना, नागरिकांना व वाहनधारकांना अडचणी उद्भवत होत्या. तसेच या रस्त्यांवर पथदिवे नादुरुस्त असल्याने रात्रीच्यावेळी छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले होते. यावर तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याने नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी सातारा नगरपालिकेत पाठपुरावा करुन या रस्त्यावरील विसंगत असणारे खांब रस्त्याच्या कडेला बसवून रस्ता रुंद करण्याचे काम हाती घेतले. तसेच चालत जाणाऱ्या नागरिकांसाठी फ़ूटपाथ करण्याचे कामही लवकरच सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या रस्त्यावर एलईडी दिवे बसविले जाणार असल्याने रस्ता उजळून निघणार आहे.

या कामासाठी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र माने, सहाय्यक अभियंता अभिजित पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या कामाचा शुभारंभ पेठेतील प्रतिष्ठित नागरिक संतोष चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सचिन क्षीरसागर, जनता बँक चेअरमन अतुल जाधव व नागरिक उपस्थित होते.

फोटो मेल :

साताऱ्यातील समर्थ मंदिर येथे नगरसेवक सुहास राजेशिर्के यांच्या उपस्थितीत पथदिवे बसविण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.