शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पानपट्टी बंद करून सुरू केली भाजीपाला विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

माणिक डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये ...

माणिक डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. त्यामुळे पोटासाठी काहीतरी उद्योग करण्याची धडपड सुरू झाली आहे.

अनेक जणांनी रस्त्याकडेला भाजीची दुकाने थाटली आहेत. तर मलकापुरात अनेकांनी पानपट्टी बंद करून भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंशिवाय इतर दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. या लॉकडाऊनचे समाजातील सर्वच घटकांवर मोठे परिणाम होत आहेत. बहुतांश उद्योगांवर विपरीत तर ठराविक व्यवसायावर चांगले परिणाम झाले. या सर्व परिणामांमुळे अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधनच हरवले. परिणामी जगण्यासाठी नव्या व्यवसायाच्या वाटा शोधण्याशिवाय पर्याय उरला नाही. अनेकांनी जुने धंदे बंद करून कोरोना काळात चालणारे नवे व्यवसाय सुरू केले आहेत. अशाच पध्दतीने आगाशिवनगर झोपडपट्टीतील अबालवृध्दांसह तरुण असे शेकडो जण भाजीमंडईच्या व्यवसायाकडे वळले आहेत. अचानक सुरू केलेला भाजीमंडईचा व्यवसायच आज उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे.

या उदरनिर्वाहासाठी धडपडणाऱ्या नागरिकांबरोबरच अनेक छोट्या व्यावसायिकांनीही आपले व्यवसाय बदलले आहेत. काही पानपट्टीधारकांनी पानपट्टीच्या मालाऐवजी भाजीपाला व जीवनावश्यक खाद्यपदार्थांची विक्री सुरू केली आहे. असे अनेक दुकानदार जीवनावश्यक वस्तू विक्रीकडे वळल्याचे दिसत आहेत. त्यामुळे शहरात भाजीविक्रेते व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांमध्ये भरमसाट वाढ झाली आहे.

चौकट :

जखीणवाडी रस्त्यांवर पुन्हा भाजीविक्रेत्यांची गर्दी...

मलकापुरात सुसज्ज भाजी मंडई सुरू झाल्यानंतरही काही व्यापाऱ्यांनी सवता सुभा मांडत कोयना वसाहत येथे जखीणवाडी रस्त्यावरच मंडई थाटली. या ठिकाणी दिवसेंदिवस नवनवीन भाजीविक्रेत्यांची भर पडत असल्यामुळे गर्दी होत आहे. ही गर्दीच कोरोना वाढीस निमंत्रण देत आहे.

चौकट :

उदरनिर्वाहासाठी अनेक जण दररोज सकाळी शिवछावा चौकातील उड्डाणपुलाखाली जाऊन थांबायचे. थोड्याच वेळात अनेक व्यवसायांचे ठेकेदार देतील ते काम करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे ही अनेक कामगारांची नित्याचीच बाब होती. मात्र, या लॉकडाऊनमुळे कामे बंद झाली. पर्यायाने उदरनिर्वाहासाठी अनेकांना भाजीविक्रीचा व्यवसाय निवडावा लागला आहे.

कोट :

सध्या कोरोनाच्या काळात पानपट्टीच्या व्यवसायाला बंदी आहे. जागा स्वतःची आहे. उत्पन्नाचे साधनच बंद झाले. घरात बसून संसाराचा गाडा कसा चालवायचा? त्यामुळे पानपट्टीच्या मलाऐवजी भाजीपाला व बेकरीच्या जीवनावश्यक वस्तूंचा माल भरल्यामुळे चार पैसे मिळतात.

- सुरेश पवार, पानपट्टीचालक, आगाशिवनगर

................................................................................................................................