शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पानपट्टी बंद करून सुरू केली भाजीपाला विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

माणिक डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये ...

माणिक डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. त्यामुळे पोटासाठी काहीतरी उद्योग करण्याची धडपड सुरू झाली आहे.

अनेक जणांनी रस्त्याकडेला भाजीची दुकाने थाटली आहेत. तर मलकापुरात अनेकांनी पानपट्टी बंद करून भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंशिवाय इतर दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. या लॉकडाऊनचे समाजातील सर्वच घटकांवर मोठे परिणाम होत आहेत. बहुतांश उद्योगांवर विपरीत तर ठराविक व्यवसायावर चांगले परिणाम झाले. या सर्व परिणामांमुळे अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधनच हरवले. परिणामी जगण्यासाठी नव्या व्यवसायाच्या वाटा शोधण्याशिवाय पर्याय उरला नाही. अनेकांनी जुने धंदे बंद करून कोरोना काळात चालणारे नवे व्यवसाय सुरू केले आहेत. अशाच पध्दतीने आगाशिवनगर झोपडपट्टीतील अबालवृध्दांसह तरुण असे शेकडो जण भाजीमंडईच्या व्यवसायाकडे वळले आहेत. अचानक सुरू केलेला भाजीमंडईचा व्यवसायच आज उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे.

या उदरनिर्वाहासाठी धडपडणाऱ्या नागरिकांबरोबरच अनेक छोट्या व्यावसायिकांनीही आपले व्यवसाय बदलले आहेत. काही पानपट्टीधारकांनी पानपट्टीच्या मालाऐवजी भाजीपाला व जीवनावश्यक खाद्यपदार्थांची विक्री सुरू केली आहे. असे अनेक दुकानदार जीवनावश्यक वस्तू विक्रीकडे वळल्याचे दिसत आहेत. त्यामुळे शहरात भाजीविक्रेते व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांमध्ये भरमसाट वाढ झाली आहे.

चौकट :

जखीणवाडी रस्त्यांवर पुन्हा भाजीविक्रेत्यांची गर्दी...

मलकापुरात सुसज्ज भाजी मंडई सुरू झाल्यानंतरही काही व्यापाऱ्यांनी सवता सुभा मांडत कोयना वसाहत येथे जखीणवाडी रस्त्यावरच मंडई थाटली. या ठिकाणी दिवसेंदिवस नवनवीन भाजीविक्रेत्यांची भर पडत असल्यामुळे गर्दी होत आहे. ही गर्दीच कोरोना वाढीस निमंत्रण देत आहे.

चौकट :

उदरनिर्वाहासाठी अनेक जण दररोज सकाळी शिवछावा चौकातील उड्डाणपुलाखाली जाऊन थांबायचे. थोड्याच वेळात अनेक व्यवसायांचे ठेकेदार देतील ते काम करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे ही अनेक कामगारांची नित्याचीच बाब होती. मात्र, या लॉकडाऊनमुळे कामे बंद झाली. पर्यायाने उदरनिर्वाहासाठी अनेकांना भाजीविक्रीचा व्यवसाय निवडावा लागला आहे.

कोट :

सध्या कोरोनाच्या काळात पानपट्टीच्या व्यवसायाला बंदी आहे. जागा स्वतःची आहे. उत्पन्नाचे साधनच बंद झाले. घरात बसून संसाराचा गाडा कसा चालवायचा? त्यामुळे पानपट्टीच्या मलाऐवजी भाजीपाला व बेकरीच्या जीवनावश्यक वस्तूंचा माल भरल्यामुळे चार पैसे मिळतात.

- सुरेश पवार, पानपट्टीचालक, आगाशिवनगर

................................................................................................................................