शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कांदा, लसूणची सफरचंदाच्या भावात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:19 IST

मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कांद्यासह लसणाची दरवाढ काही केल्या थांबलेली नाही. कांद्याला प्रति किलो शंभर रुपये दर तर लसूण प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये किलो असल्याने कांद्याच्या या भावाने सफरचंदाच्या प्रति किलोच्या भावाची बरोबरी गाठली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना मात्र हा कांदा व लसूण डोळ्यात पाणी आणू लागला आहे.

ठळक मुद्देकांदा, लसूणची सफरचंदाच्या भावात विक्रीगृहिणींचे बजेट कोलमडले : दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद

खटाव : मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कांद्यासह लसणाची दरवाढ काही केल्या थांबलेली नाही. कांद्याला प्रति किलो शंभर रुपये दर तर लसूण प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये किलो असल्याने कांद्याच्या या भावाने सफरचंदाच्या प्रति किलोच्या भावाची बरोबरी गाठली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना मात्र हा कांदा व लसूण डोळ्यात पाणी आणू लागला आहे.मागील वर्षी कांद्याची आवक तसेच उत्पादन वाढल्यामुळे घाऊक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या कांद्याचे भाव प्रति किलो १० रुपये असा मिळाला होता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. यावर्षी मात्र कांद्याच्या उत्पादनातच घट झाल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

कांदा व लसणाचे सध्या बाजारातील दर कडाडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील अत्यावश्यक असलेल्या या दोन घटकांमुळे गृहिणींना फोडणीला तडका देताना हात आखडता घेताना दमछाक होत आहे.तर गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडतानाचे चित्र दिसून येत आहे. सर्वसाधारण पाच ते दहा रुपये किलो दराने मिळणाऱ्या कांद्याने थेट शंभर रुपयांपर्यंत मजल मारली आहे. कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता कांदा व्यापारी व्यक्त करत आहेत. कोणतेही पदार्थ तयार करण्यात कांद्याला पहिले स्थान दिले जाते; परंतु कांद्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आता कांदा भाव खाऊ लागला आहे.

तर रोजच्या जेवणातून तूर्त कांदा हद्दपार होताना दिसतो आहे. तर औषधी म्हणून पाहिले जाणारे लसूणदेखील आता भाव खाऊ लागल्याने फोडणीचा तडका देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या दोन महत्त्वाच्या घटकाचा दर गगनाला भिडला आहे. त्यामुळे सध्या महिला तसेच व्यावसायिक आपला हात आखडता घेताना दिसून येत आहेत. 

कांदा हा नाशवंत असल्याने त्याची साठवणूक करून ठेवता येत नाही. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे शेतात झालेल्या नुकसानीमुळे पालेभाज्याचे तसेच कडधान्याचे दर वाढले आहेत. या वाढत्या दरामुळे03 महिलांचे स्वयंपाक घरातील आठवड्याचे तसेच महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आवश्यक त्या पदार्थांमध्ये कांदा व लसूण हे लागतेच, त्यामुळे याला दुसरा पर्याय नसल्याने त्याचे प्रमाण कमी करावे लागत आहे.-शबाना काझी,गृहिणी खटाव

टॅग्स :onionकांदाSatara areaसातारा परिसर