शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, लसूणची सफरचंदाच्या भावात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:19 IST

मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कांद्यासह लसणाची दरवाढ काही केल्या थांबलेली नाही. कांद्याला प्रति किलो शंभर रुपये दर तर लसूण प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये किलो असल्याने कांद्याच्या या भावाने सफरचंदाच्या प्रति किलोच्या भावाची बरोबरी गाठली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना मात्र हा कांदा व लसूण डोळ्यात पाणी आणू लागला आहे.

ठळक मुद्देकांदा, लसूणची सफरचंदाच्या भावात विक्रीगृहिणींचे बजेट कोलमडले : दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद

खटाव : मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कांद्यासह लसणाची दरवाढ काही केल्या थांबलेली नाही. कांद्याला प्रति किलो शंभर रुपये दर तर लसूण प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये किलो असल्याने कांद्याच्या या भावाने सफरचंदाच्या प्रति किलोच्या भावाची बरोबरी गाठली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना मात्र हा कांदा व लसूण डोळ्यात पाणी आणू लागला आहे.मागील वर्षी कांद्याची आवक तसेच उत्पादन वाढल्यामुळे घाऊक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या कांद्याचे भाव प्रति किलो १० रुपये असा मिळाला होता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. यावर्षी मात्र कांद्याच्या उत्पादनातच घट झाल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

कांदा व लसणाचे सध्या बाजारातील दर कडाडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील अत्यावश्यक असलेल्या या दोन घटकांमुळे गृहिणींना फोडणीला तडका देताना हात आखडता घेताना दमछाक होत आहे.तर गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडतानाचे चित्र दिसून येत आहे. सर्वसाधारण पाच ते दहा रुपये किलो दराने मिळणाऱ्या कांद्याने थेट शंभर रुपयांपर्यंत मजल मारली आहे. कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता कांदा व्यापारी व्यक्त करत आहेत. कोणतेही पदार्थ तयार करण्यात कांद्याला पहिले स्थान दिले जाते; परंतु कांद्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आता कांदा भाव खाऊ लागला आहे.

तर रोजच्या जेवणातून तूर्त कांदा हद्दपार होताना दिसतो आहे. तर औषधी म्हणून पाहिले जाणारे लसूणदेखील आता भाव खाऊ लागल्याने फोडणीचा तडका देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या दोन महत्त्वाच्या घटकाचा दर गगनाला भिडला आहे. त्यामुळे सध्या महिला तसेच व्यावसायिक आपला हात आखडता घेताना दिसून येत आहेत. 

कांदा हा नाशवंत असल्याने त्याची साठवणूक करून ठेवता येत नाही. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे शेतात झालेल्या नुकसानीमुळे पालेभाज्याचे तसेच कडधान्याचे दर वाढले आहेत. या वाढत्या दरामुळे03 महिलांचे स्वयंपाक घरातील आठवड्याचे तसेच महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आवश्यक त्या पदार्थांमध्ये कांदा व लसूण हे लागतेच, त्यामुळे याला दुसरा पर्याय नसल्याने त्याचे प्रमाण कमी करावे लागत आहे.-शबाना काझी,गृहिणी खटाव

टॅग्स :onionकांदाSatara areaसातारा परिसर