शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

‘सघन’ लागवड झाली ‘सगुण’!

By admin | Updated: May 27, 2016 22:20 IST

किसन वीरचा प्रयोग यशस्वी : एका एकरात लगडली हजारो फळे

भुर्इंज : एका एकरात तब्बल १३४८ झाडांची लागवड आणि चारच वर्षांत हजारो फळांनी लगडलेली झाडं हा चमत्कार नाही, तर हे चित्र प्रत्यक्षात साकारलं आहे येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर. विशेष म्हणजे, सघन पद्धतीने केलेल्या या लागवडीतील सर्वच्या सर्व आंब्यांच्या झाडांची उगवण क्षमता शंभर टक्के आहे. हे किमया पाहण्यासाठी शेतकरी आता येथे येत असून, सघन लागवड पद्धतीचा धडा येथून घेऊन जात आहेत. आजोबाने लावलेल्या झाडाचे आंबे नातवाने खायचे, असे पूर्वी समजले जायचे; पण आता तसे राहिले नाही. पारंपरिक पद्धतीत आंब्याची झाडे लावताना दहा बाय दहा मीटर अंतरावर खड्डा घेऊन केलेल्या लागवडीत एका एकरात आंब्याची फक्त ४० झाडांची लागवड होते. मात्र ‘किसन वीर’ ने अवलंब केलेल्या सघन लागवड पद्धतीत तीन बाय एक मीटर अंतराचे खड्डे घेऊन एका एकरात १३४८ आणि तीन बाय दोन मीटर अंतराचे खड्डे घेऊन एका एकरात ६७४ झाडांची लागवड केली आहे. येथे जेव्हा ही रोपे लावली गेली तेव्हा त्यांचे वय एक वर्षाचे होते. या रोपांची वाढ होताना जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करण्यावर या ठिकाणी भर देण्यात आला. त्यामुळे झाडांना लगडलेली फळे दर्जेदार आणि देखणी आहेत. सेंद्रिय खतांसोबत वेळेवर छाटणी आणि इतर सर्व काळजी घेतली गेल्याने सघन पद्धतीच्या या बागांमध्ये प्रत्येक झाड टवटवीत फळांनी लगडले आहेत. या बागेतील फळाचे वजन २८० ग्रॅम ते ३५० ग्रॅम एवढे भरत आहे. या बागेची जोपासना करताना किसन वीर कारखान्याने उत्पादीत केलेल्याच गांडूळ खत, कृषीलक्ष्मी समृद्ध खत, फॉस्पो कंपोस्ट आणि जैविक द्रवरूप खतांचा वापर केला असून, सर्वच्या सर्व झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात आले आहे. हजारो फळांनी लगडलेल्या हा बहर आल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी या बागेला भेट दिली त्यावेळी ते हरखून गेले होते. यावेळी संचालक नवनाथ केंजळे, पै. मधुकर शिंदे, नंदकुमार निकम, शेखर भोसले पाटील, दत्तात्रय शिंदे, विशाल सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) शंका-कुशंका संपल्या...या ठिकाणी हापूस, रत्ना, केशर, आम्रपाली, तोतापुरी, सिंधू अशा सहा प्रकारच्या जातींच्या आंब्यांची लागवड केली आहे. सघन लागवडीचा हा प्रयोग या परिसरातील पहिला प्रयोग आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होईल की नाही, अशी शंका अनेकांच्या मनात होती. मात्र, या पद्धतीचा पूर्ण अभ्यास करून आणि कोकण कृ षी विद्यापीठाने सुचवलेल्या रोपांची लागवड करून हा प्रयोग येथे साकारला गेला.किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सघण पध्दतीने लागवड केलेली आंब्यांची झाडे फळांनी लगडली आहेत.