शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे होऊच नयेत यासाठीच ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:37 IST

गावागावत सीसीटीव्ही, ग्रामपंचायतींवर भोंगा आणि ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गावांच्या सुरक्षेची घेतलेली काळजी चोरांच्या मनातही धडकी भरवतेय. - अजय गोरड, सहायक पोलीस निरीक्षक, उंब्रज

ठळक मुद्देमहामार्ग अन् गावांची सुरक्षितता महत्त्वाची..!

दीपक शिंदे।सातारा : गेल्या पंधरा दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पण चोºया होऊच नयेत, यासाठी काही अधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग राबविले आणि त्यामध्ये त्यांना यशही आल्याचे उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले.

प्रश्न : वाढत्या चो-या रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या?उत्तर : चोरी करणाºया व्यक्तीला आपल्याला कोणी पाहिलं ही भीती असते. त्याच्या या कमजोरीचाच आम्ही शस्त्र म्हणून वापर केला. या चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर केला. प्रत्येक गावामध्ये सीसीटीव्ही लावला जावा, असा आग्रह धरला. त्यामुळे चोरट्यांवर पहिल्यांदा सीसीटीव्हीचा आणि नंतर पोलिसांचा वचक बसला. आपल्याला कोणी पाहत नाही, असा त्याचा भ्रम निघून गेला आणि चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले.

प्रश्न : गाव पातळीवर गावकºयांचे सहकार्य कसे मिळते?उत्तर : गावातील लोक उत्स्फूर्तपणे पोलिसांच्या मदतीला येतात. अशा लोकांची ग्राम सुरक्षा पथकामध्ये नेमणूक केली. त्यामध्ये तरुण, मध्यमवयीन ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांचा समावेश केला. त्यामुळे प्रत्येक घटना पोलिसांना कळू लागली. यामुळेही चोºया आणि गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.

प्रश्न : यात्राकाळात काय खबरदारी घेण्यात आली ?उत्तर : पालीची खंडोबा आणि उंब्रजची सीतामाई या दोन मोठ्या यात्रा होतात. याठिकाणी चोºयांचे प्रमाण टाळण्यासाठी मोठ्या स्पीकरवरून लोकांना माहिती दिली. सर्वजण सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेºयाच्या नजरेत असल्याची जाणीव करून दिली. त्यामुळे लोकांमध्ये वचक निर्माण होऊन यात्रांमधील चोºयांचे प्रमाण घटले.

  • गुन्हेगारांची कुंडली मांडण्याचा उपक्रम

उंब्रज परिसरात असलेल्या छोट्या-मोठ्या सर्वच गुन्हेगारांची कुंडलीच पोलीस स्टेशनमध्ये मांडण्यात आली आहे. असा गुन्हेगार जेव्हा एखाद्या गुन्ह्यामध्ये पुन्हा अटक होईल तेव्हा त्याने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची कुंडलीच त्याच्यासमोर मांडली जाते. त्याने केलेले चुकीचे काम आणि त्यामध्ये होत नसलेली सुधारणा यामुळे त्याला जास्तीत जास्त शासन होईल अशा प्रकारचे नियोजन करण्यात येते. त्यामुळे वचकही बसतो.

  • गावक-यांच्या सुरक्षितेसाठी भोंगा

ग्रामसुरक्षा दलाच्या नजरेत एखाद्या चुकीचा प्रकार किंवा चोरीची घटना घडणार असल्याचे दिसले तर पोलीस पाटलांनी ग्रामपंचायतीवर बसविण्यात आलेला भोंगा वाजवायचा. यामुळे गावातील लोक जागे होतात आणि चोरीच्या उद्देशाने आलेले चोरटेही आपला उद्देश साध्य होणार नाही, असे समजून निघून जातात. या भोंग्याला पोलीस सायरनचा आवाज देण्यात आला आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर