शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सातारा झेडपी सरसावली, सुरक्षा किट मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 15:23 IST

राज्यात पिकांवर औषध फवारणी करताना शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरसावली असून, पाच हजार शेतकऱ्यांना औषध फवारणीवेळी वापरण्यासाठी सुरक्षा किट देणार आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  

सातारा - राज्यात पिकांवर औषध फवारणी करताना शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरसावली असून, पाच हजार शेतकऱ्यांना औषध फवारणीवेळी वापरण्यासाठी सुरक्षा किट देणार आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  

गेल्या महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात व इतर ठिकाणी पिकांवर औषध फवारणी करताना अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. सर्व बाजूंनी राज्य शासनावर टीका करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या. शासनाकडून मदतीचे आश्वासन देण्यात आले. अशा या घटनेनंतर सातारा जिल्हा परिषदही शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुढे आली आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांना औषध फवारणीवेळी वापरण्यासाठी सुरक्षा किट वाटपाचा निर्णय घेतला. त्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे. कृषी समिती सभापती मनोज पवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. 

जिल्ह्यात एकूण ९३४ दुकाने ही कीटकनाशक विक्रीची आहेत. या दुकानात सुरक्षा किट उपलब्ध करून देण्यात आले आहे. तशा विक्रीच्या सूचनाही दुकानदारांना करण्यात आल्या आहेत. या किटची किंमत १५० रुपये आहे. त्यापैकी ५० रुपये हे शेतकºयांनी भरायचे असून, १०० रुपये अनुदान मिळणार आहे. ७ नोव्हेंबरला ही योजना सुरू झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ५०० हून अधिक शेतकऱ्यांची याचा लाभ घेतला आहे.