शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

मानेगावच्या पुलावरील ‘एस’ वळण ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST

सणबूर : ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील मानेगावच्या पुलावरील ‘एस’ आकाराचे वळण अतिशय धोकादायक आहे. वारंवार तिथे ...

सणबूर : ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील मानेगावच्या पुलावरील ‘एस’ आकाराचे वळण अतिशय धोकादायक आहे. वारंवार तिथे अपघात होत असले तरी उपाययोजना मात्र शून्यच असल्याने संबंधित विभागाचे डोळे उघडणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

ढेबेवाडी ते कऱ्हाड या २७ किलोमीटरच्या मार्गावर वाहनांची रात्रं-दिवस वर्दळ असते. अलीकडच्या काळात त्याचे मानेगावपर्यंत चौपदरीकरण आणि तेथून पुढे रुंदीकरण झाले आहे. रस्ता विस्तारल्यामुळे वाहन चालकही सुसाट झाल्याने ओघानेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरील काही वळणे पूर्वीपासूनच अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. चौपदरीकरणानंतरही त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. त्यामध्ये मानेगावच्या पुलानजीकच असलेल्या वळणाचा प्रामुख्याने समावेश आहे. रस्त्याच्या चौपदरीकरण आणि रुंदीकरणावेळी संबंधितांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्याने या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. दोन्ही बाजूकडून येणाऱ्या वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने गोंधळ उडत आहे. वेग नियंत्रणासाठी वळणाच्या दोन्ही बाजूला झेब्रा क्राॅसिंग करणे गरजेचे आहे. तरच अपघातावर नियंत्रण मिळविता येईल. मात्र, बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाबाबत वाहनचालक प्रवासी व जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

(चौकट)

सर्वच वळणांचा सर्व्हे करा..

मानेगावजवळचे धोकादायक वळण केवळ अपघातच घडल्यानंतर चर्चेत येते. संबंधित विभाग ठोस उपाययोजनांसाठी पावले उचलत नसल्याने मूळ समस्या कायम आहे. या मार्गावरील सर्वच वळणांचा सर्व्हे करून आवश्यक उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.

३१सणबूर

ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील मानेगावच्या पुलावरील ‘एस’ आकाराचे वळण अतिशय धोकादायक ठरत आहे.