शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतुकीमुळे एस. टी. मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:27 IST

सातारा : कोरोनानंतर गेल्यावर्षी तब्बल सहा ते सात महिने एस. टी.ची चाकं एकाच ठिकाणी थांबली होती. त्यामुळे झालेले नुकसान ...

सातारा : कोरोनानंतर गेल्यावर्षी तब्बल सहा ते सात महिने एस. टी.ची चाकं एकाच ठिकाणी थांबली होती. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी मालवाहतुकीचा पर्याय राज्य परिवहन महामंडळाने निवडला. त्याचा महामंडळाला फायदाही होत आहे. मात्र, या गाड्या घेऊन जाणाऱ्या चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाॅकडाऊनमुळे हाॅटेलही बंद असल्याने जेवणाची आबाळ होत आहे.

मध्यवर्ती कार्यालयाकडून मालवाहतुकीचा पर्याय खुला केला. मात्र, या क्षेत्राचा अनुभव नसल्याने ही सेवा कितपण यशस्वी होईल, हा प्रश्न होता. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाचे विभाग नियंत्रक सागर पळसुले व इतर सहकारी अधिकाऱ्यांना घेऊन एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये जात होते. त्याचा आता सकारात्मक परिणाम झालेला अनुभवायला मिळत आहे. लांब लांबच्या ऑर्डर मिळत आहेत. मात्र, या गाड्या घेऊन जाणाऱ्यांना काहीवेळेला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रसंगी पदरमोड होत आहे. काही ठिकाणी मुक्कामाचीही सोय नाही, अशी तक्रार होत असते.

तीन कोटींची कमाई

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सहा महिने कसलेच उत्पन्न मिळाले नव्हते. त्यानंतर एस. टी. सुरू झाली, पण फारसा फरक पडला नाही. मात्र, मालवाहतुकीचा मोठा फरक जाणवत आहे.

ही सुविधा सुरू झाल्यापासून साताऱ्यातील उद्योजकांना नवा पर्याय मिळाला आहे. साहजिकच त्यातून एस. टी.ला कोट्यवधींचे उत्पन्न मिळत आहे.

या योजनेतून एस. टी.च्या तिजोरीत तब्बल तीन कोटी ११ लाख रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे या पडत्या काळात मोठा दिलासा मिळाला असल्याचे समजले जाते.

परतीचा माल मिळेपर्यंत तेथेच मुक्काम

मालवाहतूक ट्रक घेऊन गेलेल्या चालकांना परतीचा माल मिळेपर्यंत तेथेच मुक्काम करावा लागतो. मात्र, त्यांच्यासाठी कंपनीत कसलीही सोय नसते. अनेकदा गाडीतच झोपावे लागते तसेच जवळच्या बसस्थानकात गेले तरी तेथे गैरसोय होते. प्रशासनाकडून चांगली वागणूक मिळत नसल्याचा अनेक चालकांना राज्यभरात अनुभव येत आहे. त्यामुळे ज्यांच्या जिवावर एस. टी.ला सोन्याचे दिवस बघायला मिळत आहेत, त्या चालकांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी एस. टी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेण्याची मागणी केली जात आहे.

पदरमोड करुन कसं परवडणार..!

एस. टी. घेऊन जाणाऱ्या चालक-वाहकांच्या जेवणाची सोय होते. मात्र, ट्रक घेऊन जाणाऱ्यांची होत नाही. त्यामुळे खिशातील पैसे घालून जेवावे लागते. एकावेळचे जेवण करायचे म्हटले तर किमान तीनशे रुपये खर्च येतो. अशावेळी पदरमोड करणे कसे परवडणार.

- एक चालक

एस. टी.चा प्रत्येक कर्मचारी एस. टी.ला दैवतच मानतो. मात्र, प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना जी वागणूक मिळते, ती मालट्रकच्या चालकांना सातारा विभागाच्या बाहेर गेल्यावर मिळत नाही. त्यामुळे वाईट वाटतं. यासाठी वरिष्ठांनी स्थानिक प्रशासनाला सूचना कराव्यात.

- एक चालक.

आगाऊ रक्कम दिली जात नाही..!

राज्य परिवहन महामंडळाचा मालवाहतूक ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकांना प्रशासनाकडून कोणत्याही स्वरुपाची आगाऊ रक्कम दिली जात नाही. त्यामुळे या प्रवासात होणारा खर्च खिशातूनच करावा लागतो.

महामंडळाचे प्रत्येक तालुक्यात आगार आहे. तेथे गाड्यांची दुरुस्ती, डिझेल उपलब्ध होत असते. त्यामुळे बाहेर खर्च करण्याची गरजच भासत नाही.

कंपनीकडून वाहतुकीचा खर्च मिळतो तो महामंडळाला परस्पर मिळत असल्याने चालकांना इतर स्वरुपात पैसे मिळत नाहीत. त्यामुळे बाहेर गेल्यावर जेवण, राहण्याची सोय स्वखर्चातून करावी लागते.

नियमानुसार चालकांनी ट्रक घेऊन गेल्यानंतर दोन दिवसात तेथून परतीसाठी माल न मिळाल्यास ट्रक संबंधित आगारात जमा करुन अन्य एस. टी.ने स्वत:च्या आगारात यावे. मात्र, लाॅकडाऊन असल्याने आठ दिवस थांबावे लागते. त्यामुळे जेवणावरही विनाकारण खर्च वाढत जातो.

- जनक जाधव

अध्यक्ष, एस. टी. कामगार संघटना, सातारा आगार.