शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मालवाहतुकीमुळे एस. टी. मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:27 IST

सातारा : कोरोनानंतर गेल्यावर्षी तब्बल सहा ते सात महिने एस. टी.ची चाकं एकाच ठिकाणी थांबली होती. त्यामुळे झालेले नुकसान ...

सातारा : कोरोनानंतर गेल्यावर्षी तब्बल सहा ते सात महिने एस. टी.ची चाकं एकाच ठिकाणी थांबली होती. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी मालवाहतुकीचा पर्याय राज्य परिवहन महामंडळाने निवडला. त्याचा महामंडळाला फायदाही होत आहे. मात्र, या गाड्या घेऊन जाणाऱ्या चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाॅकडाऊनमुळे हाॅटेलही बंद असल्याने जेवणाची आबाळ होत आहे.

मध्यवर्ती कार्यालयाकडून मालवाहतुकीचा पर्याय खुला केला. मात्र, या क्षेत्राचा अनुभव नसल्याने ही सेवा कितपण यशस्वी होईल, हा प्रश्न होता. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाचे विभाग नियंत्रक सागर पळसुले व इतर सहकारी अधिकाऱ्यांना घेऊन एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये जात होते. त्याचा आता सकारात्मक परिणाम झालेला अनुभवायला मिळत आहे. लांब लांबच्या ऑर्डर मिळत आहेत. मात्र, या गाड्या घेऊन जाणाऱ्यांना काहीवेळेला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रसंगी पदरमोड होत आहे. काही ठिकाणी मुक्कामाचीही सोय नाही, अशी तक्रार होत असते.

तीन कोटींची कमाई

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सहा महिने कसलेच उत्पन्न मिळाले नव्हते. त्यानंतर एस. टी. सुरू झाली, पण फारसा फरक पडला नाही. मात्र, मालवाहतुकीचा मोठा फरक जाणवत आहे.

ही सुविधा सुरू झाल्यापासून साताऱ्यातील उद्योजकांना नवा पर्याय मिळाला आहे. साहजिकच त्यातून एस. टी.ला कोट्यवधींचे उत्पन्न मिळत आहे.

या योजनेतून एस. टी.च्या तिजोरीत तब्बल तीन कोटी ११ लाख रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे या पडत्या काळात मोठा दिलासा मिळाला असल्याचे समजले जाते.

परतीचा माल मिळेपर्यंत तेथेच मुक्काम

मालवाहतूक ट्रक घेऊन गेलेल्या चालकांना परतीचा माल मिळेपर्यंत तेथेच मुक्काम करावा लागतो. मात्र, त्यांच्यासाठी कंपनीत कसलीही सोय नसते. अनेकदा गाडीतच झोपावे लागते तसेच जवळच्या बसस्थानकात गेले तरी तेथे गैरसोय होते. प्रशासनाकडून चांगली वागणूक मिळत नसल्याचा अनेक चालकांना राज्यभरात अनुभव येत आहे. त्यामुळे ज्यांच्या जिवावर एस. टी.ला सोन्याचे दिवस बघायला मिळत आहेत, त्या चालकांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी एस. टी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेण्याची मागणी केली जात आहे.

पदरमोड करुन कसं परवडणार..!

एस. टी. घेऊन जाणाऱ्या चालक-वाहकांच्या जेवणाची सोय होते. मात्र, ट्रक घेऊन जाणाऱ्यांची होत नाही. त्यामुळे खिशातील पैसे घालून जेवावे लागते. एकावेळचे जेवण करायचे म्हटले तर किमान तीनशे रुपये खर्च येतो. अशावेळी पदरमोड करणे कसे परवडणार.

- एक चालक

एस. टी.चा प्रत्येक कर्मचारी एस. टी.ला दैवतच मानतो. मात्र, प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना जी वागणूक मिळते, ती मालट्रकच्या चालकांना सातारा विभागाच्या बाहेर गेल्यावर मिळत नाही. त्यामुळे वाईट वाटतं. यासाठी वरिष्ठांनी स्थानिक प्रशासनाला सूचना कराव्यात.

- एक चालक.

आगाऊ रक्कम दिली जात नाही..!

राज्य परिवहन महामंडळाचा मालवाहतूक ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकांना प्रशासनाकडून कोणत्याही स्वरुपाची आगाऊ रक्कम दिली जात नाही. त्यामुळे या प्रवासात होणारा खर्च खिशातूनच करावा लागतो.

महामंडळाचे प्रत्येक तालुक्यात आगार आहे. तेथे गाड्यांची दुरुस्ती, डिझेल उपलब्ध होत असते. त्यामुळे बाहेर खर्च करण्याची गरजच भासत नाही.

कंपनीकडून वाहतुकीचा खर्च मिळतो तो महामंडळाला परस्पर मिळत असल्याने चालकांना इतर स्वरुपात पैसे मिळत नाहीत. त्यामुळे बाहेर गेल्यावर जेवण, राहण्याची सोय स्वखर्चातून करावी लागते.

नियमानुसार चालकांनी ट्रक घेऊन गेल्यानंतर दोन दिवसात तेथून परतीसाठी माल न मिळाल्यास ट्रक संबंधित आगारात जमा करुन अन्य एस. टी.ने स्वत:च्या आगारात यावे. मात्र, लाॅकडाऊन असल्याने आठ दिवस थांबावे लागते. त्यामुळे जेवणावरही विनाकारण खर्च वाढत जातो.

- जनक जाधव

अध्यक्ष, एस. टी. कामगार संघटना, सातारा आगार.