शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

ग्रामीण भागात ऐन थंडीत राजकीय वातावरण गरमागरम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औंध : खटाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीची तारीख ८ ते १० फेब्रुवारीच्या कालावधीत पार पडणार होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औंध : खटाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीची तारीख ८ ते १० फेब्रुवारीच्या कालावधीत पार पडणार होती. मात्र शनिवारी जिल्हाधिकारी यांनी १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिल्याने वातावरण गरमागरम झाले आहे. कारण सत्तास्थापनेसाठी अनेक दिवसांपासून मनधरणी करून-करून जुळणी करणाऱ्यांची दमछाक होणार आहे, तर ज्यांना सत्तेची समीकरणे जुळविता आली नाहीत, त्यांच्यासाठी ही संधी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण निर्माण झाले आहे.

खटाव तालुक्यात अनेक गावांत सत्तेसाठी काठावरची कसरत सुरू आहे. निवडणूक निकालानंतर आरक्षण जाहीर झाले व त्यानंतर बेरजा सुरू झाल्या. ज्या ठिकाणी अनुसूचित जाती, ओबीसी आरक्षण पडले आहे, त्याठिकाणी उपसरपंच पदासाठी शर्यत सुरू आहे, तर ज्याठिकाणी सर्वसाधारण आहे, त्याठिकाणी मोठी डोकेदुखी असल्याचे पाहावयास मिळत आहे. एखाद्या गावात घासून निकाल झाला आहे, तिथे वातावरण गरम झाले आहे. काही गावात तर शनिवारपासून उमेदवार बाहेरगावी निघून गेले आहेत, त्यांना आता गावात परत बोलवायचे, का निवडीच्या तारखेपर्यंत त्यांचा खर्च सोसायचा, हा प्रश्न पॅनेलप्रमुखांना सतावत आहे.

निवडणूक प्रक्रियेची तारीख पुढे गेल्याने सत्तास्थापनेसाठी सदस्यांची मनधरणी करता करता दमछाक होत आहे. ज्याला त्याला पहिल्यांदाच पद हवे असल्याने आता या वाढलेल्या कालावधीचा नेमका कोणाला फायदा होणार, हे येणारा काळच ठरविणार आहे. मात्र, निवडीसाठी वाढलेले दिवस हे डोकेदुखी वाढविणारे आहेत, हे निश्चित.

(चौकट)

बैठकीला व चर्चांना ऊत

गावोगावी सत्तास्थापनेसाठी जोरदार बैठका सुरू आहेत. भावकी, पै-पाहुणे, वाडा याभोवतीच ग्रामीण भागात राजकारण फिरत आहे. त्यात ही निवडीची तारीख पुढे गेल्याने आता गावोगावचे आरक्षण पण बदलणार का? अशा चर्चांना ऊत आला आहे.