शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

ग्रामीण भागात ऐन थंडीत राजकीय वातावरण गरमागरम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औंध : खटाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीची तारीख ८ ते १० फेब्रुवारीच्या कालावधीत पार पडणार होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औंध : खटाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीची तारीख ८ ते १० फेब्रुवारीच्या कालावधीत पार पडणार होती. मात्र शनिवारी जिल्हाधिकारी यांनी १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिल्याने वातावरण गरमागरम झाले आहे. कारण सत्तास्थापनेसाठी अनेक दिवसांपासून मनधरणी करून-करून जुळणी करणाऱ्यांची दमछाक होणार आहे, तर ज्यांना सत्तेची समीकरणे जुळविता आली नाहीत, त्यांच्यासाठी ही संधी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण निर्माण झाले आहे.

खटाव तालुक्यात अनेक गावांत सत्तेसाठी काठावरची कसरत सुरू आहे. निवडणूक निकालानंतर आरक्षण जाहीर झाले व त्यानंतर बेरजा सुरू झाल्या. ज्या ठिकाणी अनुसूचित जाती, ओबीसी आरक्षण पडले आहे, त्याठिकाणी उपसरपंच पदासाठी शर्यत सुरू आहे, तर ज्याठिकाणी सर्वसाधारण आहे, त्याठिकाणी मोठी डोकेदुखी असल्याचे पाहावयास मिळत आहे. एखाद्या गावात घासून निकाल झाला आहे, तिथे वातावरण गरम झाले आहे. काही गावात तर शनिवारपासून उमेदवार बाहेरगावी निघून गेले आहेत, त्यांना आता गावात परत बोलवायचे, का निवडीच्या तारखेपर्यंत त्यांचा खर्च सोसायचा, हा प्रश्न पॅनेलप्रमुखांना सतावत आहे.

निवडणूक प्रक्रियेची तारीख पुढे गेल्याने सत्तास्थापनेसाठी सदस्यांची मनधरणी करता करता दमछाक होत आहे. ज्याला त्याला पहिल्यांदाच पद हवे असल्याने आता या वाढलेल्या कालावधीचा नेमका कोणाला फायदा होणार, हे येणारा काळच ठरविणार आहे. मात्र, निवडीसाठी वाढलेले दिवस हे डोकेदुखी वाढविणारे आहेत, हे निश्चित.

(चौकट)

बैठकीला व चर्चांना ऊत

गावोगावी सत्तास्थापनेसाठी जोरदार बैठका सुरू आहेत. भावकी, पै-पाहुणे, वाडा याभोवतीच ग्रामीण भागात राजकारण फिरत आहे. त्यात ही निवडीची तारीख पुढे गेल्याने आता गावोगावचे आरक्षण पण बदलणार का? अशा चर्चांना ऊत आला आहे.