शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

बिबट्यासह बछड्यांना लावले पळवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST

तळमावले : भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांना साईकडे (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी हुसकावून लावले. येथील यादव ...

तळमावले : भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांना साईकडे (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी हुसकावून लावले. येथील यादव मळ्यात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साईकडे परिसरात पंधरा दिवसांपासून बिबट्याचा दोन बछड्यांसह वावर आहे. पाळीव श्वान, तसेच परिसरातील काही जनावरांवरही त्याने हल्ला केला आहे. गणेश मळ्यातही ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले होते. यादव मळ्यात बिबट्या दिसल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला हुसकावून लावले.

कार्वे ते धानाई मंदिर रस्त्याची दुरवस्था

कार्वे : येथील धानाई मंदिर मार्गाची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्ता खचला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. या परिसरातील शेतकरी, तसेच वाहन चालकांकडून या मार्गाचा वापर होतो. टेंभू तसेच कार्वे चौकीकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात असल्याने हा रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे. कऱ्हाड ते ओगलेवाडी या मार्गाला हा पर्यायी रस्ता आहे.

आटके विभागात मशागत रखडली

कऱ्हाड : गत काही दिवसांत झालेला वळीव पाऊस आणि त्यानंतर गत आठवड्यात चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर पडलेल्या पावसाने आटके (ता. कऱ्हाड) परिसरातील मशागती रखडल्या आहेत. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे पावसाळापूर्व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. गत दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गावोगावी विलगीकरण कक्षांची गरज

कऱ्हाड : जिल्ह्यासह कऱ्हाड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष उभारणे गरजेचे आहे. क्वारंटाईन असणाऱ्या ग्रामस्थांसाठी शाळा खोल्या आरक्षित करीत विलगीकरण कक्ष केल्यास कोरोना संसर्ग कमी होण्यास मदत होईल. ग्रामस्थांसह गावोगावच्या ग्रामपंचायतींनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

धोकादायक विद्युत खांब हटवा

सणबूर : मंद्रुळकोळे खुर्द (ता. पाटण) येथील मार्गालगत असलेला वीज खांब धोकादायक स्थितीत आहे. हा खांब वाकला असून, त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. खांबाची दुरुस्ती करावी अथवा तो खांब हटवून नवीन खांब बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कोरेगाव रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

कऱ्हाड : कार्वेपासून कोरेगावकडे जाणाऱ्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे. मात्र, निधी दिला जात नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. पंधरा वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम झाले. तेव्हापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तसेच या रस्त्यासाठी निधीही मिळालेला नाही. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.

केंजळ ते कवठे रस्ता धोकादायक

कऱ्हाड : तालुक्यातील केंजळ ते कवठे रस्ता धोकादायक बनला आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय प्रल्हाद यादव यांनी पत्रकाद्वारे केली आहे. या रस्त्याची गत कित्येक वर्षांपासून डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.