शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

२५ वर्षांसाठी १९० कोटींचा आराखडा मंजूर

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

नऊ विषयांवर एकमत : मलकापूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल --नगरपंचायत विशेष सभा

मलकापूर : मुंबईच्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने मलकापूर शहराचा भविष्यातील २५ वर्षांचा विकासआराखडा तयार केला आहे. १८९ कोटी ८४ लाखांचे विकास नियोजन शासनाकडे सादर करण्यास झालेल्या विशेष सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनंदा साठे होत्या. विषय वाचन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. मुख्याधिकारी राजेंद्र तेलींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी मयत कर्मचारी अमोल दोडमनी याला श्रद्धांजली वाहून कामकाजास सुरुवात केली. विषय पत्रिकेवरील सात विषयांसह ऐनवेळच्या दोन अशा नऊ विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सामाजिक, आर्थिक व जातनिहाय प्रारूप याद्या अवगत करणे, नळपाणीपुरवठा योजनेच्या मीटर पुरवठ्यासाठी निविदा मंजूर करणे, शिक्षण व रोजगार हमी कर हे ‘क’ वर्ग नगरपालिका वि नगरपंचायत क्षेत्राला माफ करावा किंवा भाडेमूल्यावर न आकारता तो कर योग्य रकमेवर आकारावा, हा प्रस्ताव शासनाकडे सादर करणे, करवसुली व पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेणे आदी विषय एकमताने मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक सहा हा शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असल्याचे उपनगराध्यक्ष शिंदे यांनी सभागृहात सांगितले. मुंबईच्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने मलकापूरचा भविष्यातील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. असा विकास आराखडा तयार करणे व त्याला शासनाची मंजुरी घेणे बंधनकारक केले आहे. भविष्यात कोणत्याही कामांचा विकास प्रस्ताव मंजूर करावयाचा झाल्यास या आराखड्याची मंजुरी घेणे गरजेचे आहे. तरच शहराला शासनाचा निधी मिळू शकातो. म्हणून मलकापूरचा १८९ कोटी ८४ लाखांचा शहर विकास आराखडा तयार केला आहे. तो शासनास सादर करण्यास सभागृहाची मंजुरी द्यावी. त्यावेळी आराखडा वाचून दाखविण्याची मागणी नगरसेवकांनी केली. वाचनानंतर सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पंचवीस वर्षांचे विकास नियोजन करणारी पहिलीच नगरपंचायत आहे. (प्रतिनिधी) बघण्याचा दृष्टिकोन बदलला मलकापुरात अनेक नावीन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. याची दखल घेऊन सर्वच पातळीवरून मलकापूर शहराकडे शासन व प्रशासनाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. लवकरच मलकापूरचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये सहभाग होईल, असा विश्वास उपनगराध्यक्ष शिंदे यांनी व्यक्त केला. तशा पद्धतीने हालचालीही सुरू आहेत. डी. पी.मध्ये अनेक प्रस्ताव मलकापूरसाठी भविष्यातील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यामधील काही बाबी मलकापूरने अगोदरच अंमलात आणल्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. तर डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अनेक विकासकामे प्रस्तावित आहेत. त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. २५ वर्षांत काय भविष्यात २५ वर्षांत तुम्ही काय विकास करणार याची यादी- सार्वजनिक सुविधा प्रभावीपणे पुरवणे, झोपडपट्टी निर्मूलन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, दळणवळण, पर्यावरण, मूलभूत नागरी सुविधा, स्वतंत्र बांधकाम नियमावली, ई-गव्हर्नंन्स पद्धत, शेती सुधार, पर्यटन, पथदिवे व्यवस्थापन व डेव्हलपमेंट प्लॅनमधील आरक्षणांचा विकास करणे यांचा समावेश आहे.