शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

२५ वर्षांसाठी १९० कोटींचा आराखडा मंजूर

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

नऊ विषयांवर एकमत : मलकापूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल --नगरपंचायत विशेष सभा

मलकापूर : मुंबईच्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने मलकापूर शहराचा भविष्यातील २५ वर्षांचा विकासआराखडा तयार केला आहे. १८९ कोटी ८४ लाखांचे विकास नियोजन शासनाकडे सादर करण्यास झालेल्या विशेष सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनंदा साठे होत्या. विषय वाचन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. मुख्याधिकारी राजेंद्र तेलींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी मयत कर्मचारी अमोल दोडमनी याला श्रद्धांजली वाहून कामकाजास सुरुवात केली. विषय पत्रिकेवरील सात विषयांसह ऐनवेळच्या दोन अशा नऊ विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सामाजिक, आर्थिक व जातनिहाय प्रारूप याद्या अवगत करणे, नळपाणीपुरवठा योजनेच्या मीटर पुरवठ्यासाठी निविदा मंजूर करणे, शिक्षण व रोजगार हमी कर हे ‘क’ वर्ग नगरपालिका वि नगरपंचायत क्षेत्राला माफ करावा किंवा भाडेमूल्यावर न आकारता तो कर योग्य रकमेवर आकारावा, हा प्रस्ताव शासनाकडे सादर करणे, करवसुली व पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेणे आदी विषय एकमताने मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक सहा हा शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असल्याचे उपनगराध्यक्ष शिंदे यांनी सभागृहात सांगितले. मुंबईच्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने मलकापूरचा भविष्यातील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. असा विकास आराखडा तयार करणे व त्याला शासनाची मंजुरी घेणे बंधनकारक केले आहे. भविष्यात कोणत्याही कामांचा विकास प्रस्ताव मंजूर करावयाचा झाल्यास या आराखड्याची मंजुरी घेणे गरजेचे आहे. तरच शहराला शासनाचा निधी मिळू शकातो. म्हणून मलकापूरचा १८९ कोटी ८४ लाखांचा शहर विकास आराखडा तयार केला आहे. तो शासनास सादर करण्यास सभागृहाची मंजुरी द्यावी. त्यावेळी आराखडा वाचून दाखविण्याची मागणी नगरसेवकांनी केली. वाचनानंतर सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पंचवीस वर्षांचे विकास नियोजन करणारी पहिलीच नगरपंचायत आहे. (प्रतिनिधी) बघण्याचा दृष्टिकोन बदलला मलकापुरात अनेक नावीन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. याची दखल घेऊन सर्वच पातळीवरून मलकापूर शहराकडे शासन व प्रशासनाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. लवकरच मलकापूरचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये सहभाग होईल, असा विश्वास उपनगराध्यक्ष शिंदे यांनी व्यक्त केला. तशा पद्धतीने हालचालीही सुरू आहेत. डी. पी.मध्ये अनेक प्रस्ताव मलकापूरसाठी भविष्यातील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यामधील काही बाबी मलकापूरने अगोदरच अंमलात आणल्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. तर डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अनेक विकासकामे प्रस्तावित आहेत. त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. २५ वर्षांत काय भविष्यात २५ वर्षांत तुम्ही काय विकास करणार याची यादी- सार्वजनिक सुविधा प्रभावीपणे पुरवणे, झोपडपट्टी निर्मूलन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, दळणवळण, पर्यावरण, मूलभूत नागरी सुविधा, स्वतंत्र बांधकाम नियमावली, ई-गव्हर्नंन्स पद्धत, शेती सुधार, पर्यटन, पथदिवे व्यवस्थापन व डेव्हलपमेंट प्लॅनमधील आरक्षणांचा विकास करणे यांचा समावेश आहे.