शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नितीन गडकरींकडे रोपवेचा प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:42 IST

सातारा : अजिंक्यतारा किल्ला ते पायथा, सज्जनगड ते परळी पायथा व महाबळेश्वर ते प्रतापगड या तीन रोपवेच्या प्रकल्पांना भरघोस ...

सातारा : अजिंक्यतारा किल्ला ते पायथा, सज्जनगड ते परळी पायथा व महाबळेश्वर ते प्रतापगड या तीन रोपवेच्या प्रकल्पांना भरघोस निधी द्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय भूपृष्ठ व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

गडकरी आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी कराड येथील जाहीर कार्यक्रमात उदयनराजेंच्या वतीने स्वीकृत नगरसेवक ॲड. दत्ता बनकर यांनी गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात उदयनराजे यांनी राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरण तसेच राज्य व जिल्हा महामार्ग मजबुतीकरण विकास कार्यक्रमांबद्दल गडकरी यांना धन्यवाद देऊन समाधान व्यक्त केले आहे. अजिंक्यतारा किल्ला ते पायथा, सज्जनगड ते परळी पायथा व महाबळेश्वर ते प्रतापगड या तीन मार्गिकांवर रोपवे बनविण्यासाठी भरघोस निधी देण्याची मागणी केली. राष्ट्रीय महामार्ग, केंद्रीय रस्ते निधी, पंतप्रधान सडक योजना इत्यादीच्या माध्यमातून महामार्ग डांबरीकरण, खंडाळ्याचा नवीन प्रस्तावित बोगदा, महामार्गावरील धोकादायक ठिकाणांचे नियमन, नवीन सहापदरीकरणाची कामे करण्यात यावीत. आजपर्यंत आम्ही केलेल्या मागण्यांना आपण सर्वोच्च प्राधान्याने निधी दिला. जिल्ह्यातील काही कामांचा लोकार्पण सोहळा होत आहे याचे प्रचंड समाधान उदयनराजे यांनी विशेषत्वाने व्यक्त केले आहे. जिल्ह्यात रोपवेच्या माध्यमातून पर्यटन व आर्थिक चक्राला गती देण्याचा प्रयत्न आहे.

रोपवेची संकल्पना खरोखर चांगली व उपयुक्त आहे. या योजनेची सुविधा उपलब्ध झाल्यावर दुर्गम भागातील दळणवळण सुलभ होणार आहे. आपण दिलेल्या प्रस्तावाला विनाविलंब मंजुरी व निधी दिला जाईल; याशिवाय सातारा शहराच्या हद्दीतील महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांना सीआरएफ अंतर्गत निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे प्रसिद्धिपत्रकात शेवटी नमूद करण्यात आले आहे.