शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

भाज्यांचे दर तेजीत, सफरचंदापेक्षा वाटाणा झाला महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 14:07 IST

सातारा : अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानंतर भाजीपाल्याचे दर वाढत चालले आहेत. टोमॅटो तेजीत असून, गवार आणि शेवगा शेंगही भाव ...

सातारा : अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानंतर भाजीपाल्याचे दर वाढत चालले आहेत. टोमॅटो तेजीत असून, गवार आणि शेवगा शेंगही भाव खात आहे. त्यातच मागील काही महिन्यांपासून वाटाण्याचा दर १०० रुपयांच्याही पुढे आहे. त्यामुळे सफरचंदापेक्षाही वाटाणा महाग दराने घेण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून भाज्यांचे दर तेजीत आहेत. महिन्याभरापूर्वी तर वांगी १०० रुपये किलोपर्यंत पोहोचली होती. तर टोमॅटोचा भाव ८० रुपयांवर गेलेला. मात्र, त्यानंतर वांगी आणि टोमॅटोचे दर थोडे कमी झाले. तरीही सध्या वांगी आणि टोमॅटोचा दर किमान ६० रुपयांपर्यंत आहे. त्याचबरोबर वाटाण्याचा दर पाच महिन्यांपासून वाढलेला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला १६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळे मंडईत किलोचा दर सतत १०० रुपयांच्या पुढे राहिला. सध्याही साताऱ्यातील मंडईत कोबीचा अपवाद वगळता कोणतीही भाजी ३० ते ४० रुपयांच्या खाली नाही. फ्लॉवर, भेंडी, पावटा, गवार यांचेही दर वाढलेलेच आहेत.

भाजीपाला दर (प्रतिकिलो)

वांगी ६०

कोबी ३० ते ४०

टोमॅटो ६०-८०

फ्लॉवर ४०-६०

शेवगा शेंग ८०-१००

गवार ६०-८०

वाटाणा १००-१२०

दोडका ६०-८०

काळा घेवडा ८०

कारली ४०

आजचा भाव

सफरचंद १००

टोमॅटो ८०

नुकसानामुळे वाढले दर...

- जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात अनेकवेळा अतिवृष्टी झाली होती. यामध्ये भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली. आताही तशीच स्थिती टिकून आहे.

- जिल्ह्यात मागील १० दिवसांत अवकाळी पाऊस होता. यामुळे शेतमालाचे नुकसान झाले. तसेच चिखलामुळे भाजीपाला बाहेर काढता आला नाही. परिणामी भाज्यांचे दर वाढले आहेत.

वाटाणा अन् टोमॅटो परवडेना...

मागील चार महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढत गेले आहेत. यामध्ये वाटाण्याचा दर तर सतत १०० रुपयांच्या पुढे आहे. तर टोमॅटोही ८० रुपये किलोने मिळतो. यामुळे वाटाणा आणि टोमॅटोचा वापर भाज्यांत कमीच करण्याची वेळ आली आहे. - पुष्पा पाटील, गृहिणी

पालेभाज्या महाग झाल्या आहेत. तसेच फळभाज्यांचीही हीच स्थिती आहे. शेवगा शेंग १०० रुपये किलोपर्यंत आहे. तसेच इतर कोणत्याही भाज्या घेण्यास गेले तर ६० रुपयांच्या आत नाहीत. टोमॅटोचे भाव एकदमच कडाडले आहेत. - शामराव काळे, ग्राहक

आणखी काही दिवस दर वाढलेलेच राहणार...

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. याला कारण म्हणजे पावसामुळे भाज्यांचे झालेले नुकसान. काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाचा भाज्यांना फटका बसला. त्यामुळे आता आणखी दर वाढले आहेत. - शरद मोरे, विक्रेता

आम्हालाही भाज्या महागच मिळतात. त्यामुळे पुढे ग्राहकांना विक्री करताना दर वाढवून घ्यावा लागतो. आता कोणतीही भाजी ४० रुपयांच्या आत नाही. त्याचबरोबर काही भाज्यांचा दर हा १०० रुपयांच्याही पुढे आहे. ग्राहक आर्थिक उपलब्धततेनुसार खरेदी करतात. - तुषार डोंगरे, विक्रेता

टॅग्स :Satara areaसातारा परिसरvegetableभाज्या