शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांचे दर तेजीत, सफरचंदापेक्षा वाटाणा झाला महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 14:07 IST

सातारा : अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानंतर भाजीपाल्याचे दर वाढत चालले आहेत. टोमॅटो तेजीत असून, गवार आणि शेवगा शेंगही भाव ...

सातारा : अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानंतर भाजीपाल्याचे दर वाढत चालले आहेत. टोमॅटो तेजीत असून, गवार आणि शेवगा शेंगही भाव खात आहे. त्यातच मागील काही महिन्यांपासून वाटाण्याचा दर १०० रुपयांच्याही पुढे आहे. त्यामुळे सफरचंदापेक्षाही वाटाणा महाग दराने घेण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून भाज्यांचे दर तेजीत आहेत. महिन्याभरापूर्वी तर वांगी १०० रुपये किलोपर्यंत पोहोचली होती. तर टोमॅटोचा भाव ८० रुपयांवर गेलेला. मात्र, त्यानंतर वांगी आणि टोमॅटोचे दर थोडे कमी झाले. तरीही सध्या वांगी आणि टोमॅटोचा दर किमान ६० रुपयांपर्यंत आहे. त्याचबरोबर वाटाण्याचा दर पाच महिन्यांपासून वाढलेला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला १६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळे मंडईत किलोचा दर सतत १०० रुपयांच्या पुढे राहिला. सध्याही साताऱ्यातील मंडईत कोबीचा अपवाद वगळता कोणतीही भाजी ३० ते ४० रुपयांच्या खाली नाही. फ्लॉवर, भेंडी, पावटा, गवार यांचेही दर वाढलेलेच आहेत.

भाजीपाला दर (प्रतिकिलो)

वांगी ६०

कोबी ३० ते ४०

टोमॅटो ६०-८०

फ्लॉवर ४०-६०

शेवगा शेंग ८०-१००

गवार ६०-८०

वाटाणा १००-१२०

दोडका ६०-८०

काळा घेवडा ८०

कारली ४०

आजचा भाव

सफरचंद १००

टोमॅटो ८०

नुकसानामुळे वाढले दर...

- जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात अनेकवेळा अतिवृष्टी झाली होती. यामध्ये भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली. आताही तशीच स्थिती टिकून आहे.

- जिल्ह्यात मागील १० दिवसांत अवकाळी पाऊस होता. यामुळे शेतमालाचे नुकसान झाले. तसेच चिखलामुळे भाजीपाला बाहेर काढता आला नाही. परिणामी भाज्यांचे दर वाढले आहेत.

वाटाणा अन् टोमॅटो परवडेना...

मागील चार महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढत गेले आहेत. यामध्ये वाटाण्याचा दर तर सतत १०० रुपयांच्या पुढे आहे. तर टोमॅटोही ८० रुपये किलोने मिळतो. यामुळे वाटाणा आणि टोमॅटोचा वापर भाज्यांत कमीच करण्याची वेळ आली आहे. - पुष्पा पाटील, गृहिणी

पालेभाज्या महाग झाल्या आहेत. तसेच फळभाज्यांचीही हीच स्थिती आहे. शेवगा शेंग १०० रुपये किलोपर्यंत आहे. तसेच इतर कोणत्याही भाज्या घेण्यास गेले तर ६० रुपयांच्या आत नाहीत. टोमॅटोचे भाव एकदमच कडाडले आहेत. - शामराव काळे, ग्राहक

आणखी काही दिवस दर वाढलेलेच राहणार...

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. याला कारण म्हणजे पावसामुळे भाज्यांचे झालेले नुकसान. काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाचा भाज्यांना फटका बसला. त्यामुळे आता आणखी दर वाढले आहेत. - शरद मोरे, विक्रेता

आम्हालाही भाज्या महागच मिळतात. त्यामुळे पुढे ग्राहकांना विक्री करताना दर वाढवून घ्यावा लागतो. आता कोणतीही भाजी ४० रुपयांच्या आत नाही. त्याचबरोबर काही भाज्यांचा दर हा १०० रुपयांच्याही पुढे आहे. ग्राहक आर्थिक उपलब्धततेनुसार खरेदी करतात. - तुषार डोंगरे, विक्रेता

टॅग्स :Satara areaसातारा परिसरvegetableभाज्या