शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

‘बालसंगोपन’चा अधिकार कार्यालय प्रमुखांनाच -- सातारा जिल्हा परिषदेचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:45 IST

कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या बालसंगोपन रजेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेने दप्तरी आदेशाद्वारे या रजा मंजूर करण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार कार्यालय प्रमुखांना दिल्याने

सातारा : कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या बालसंगोपन रजेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेने दप्तरी आदेशाद्वारे या रजा मंजूर करण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार कार्यालय प्रमुखांना दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा विषय ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरला होता.

याबाबत अधिक माहिती अशी, शासन निर्णयानुसार बºयाच कर्मचाºयांनी बालसंगोपन रजा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले होते. मात्र, जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांची संख्या तसेच केलेले अर्ज मंजूर केल्यास प्रशासकीय कामकाजावर विपरित परिणाम होणार असल्याचं परिपत्रक काढलं. त्यानुसार रजा मंजुरीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पुढील सूचना निर्गमित होईपर्यंत याबाबत कोणताच निर्णय घेण्यात येऊ नये, असे स्पष्ट संकेत केले होते. जिल्हा परिषदेच्या या पत्रकामुळे कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

याविषयी ‘लोकमत’ने बालसंगोपन रजा अंतर्गत किती अर्ज प्राप्त झाले, याचा शोध घेतला असता रजेसाठी अवघे २५ अर्ज आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावर तातडीने उपाययोजनेची बैठक घेऊन याबाबत निर्णय देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.त्यानुसार जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण दप्तरी आदेश काढला आहे. त्यानुसार बालसंगोपन रजा देण्याचे अधिकार कार्यालय प्रमुखांकडे देण्यात आले आहेत. रजा मंजुरीबाबत रजा मंजुरीचा हिशोब संबंधित कर्मचारी यांच्या मूळ सेवा पुस्तकामध्ये स्वतंत्रपणे नमूद करणे बंधनकारककरण्यात आले आहे. या रजा मंजूर करताना रजा मंजुरीच्या आदेशाची प्रत संबंधित खातेप्रमुख व सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सातारा यांच्याकडे द्यावे लागणार आहेत. जिल्हा परिषदेने बालसंगोपन रजेबाबत दिलेल्या या आदेशामुळे कर्मचाºयांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी भ्रमणध्वरीद्वारे ‘लोकमत’चे आभार मानले.या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे!शासकीय कामकाजाच्या प्रशासकीयदृष्ट्या अडथळा निर्माण होणार नाही, याची खातरजमा करून पर्यायी व्यवस्था करूनच ही रजा मंजूर करण्यात यावी, असे निर्देशित केले आहे.वर्षात ६० दिवसांपर्यंतच्या कमाल मर्यादेपर्यंत रजा मंजुरीबाबत प्रशासकीय कामकाजाची, कार्यालयाची निकड लक्षात घेऊन मंजूर करता येईल. कालावधी कमी-जादा करण्याचे अंतिम अधिकार प्रकरणपरत्वये संंबंधित कार्यालय प्रमुख यांच्याकडे राहणार आहे. 

बालसंगोपन रजेचा अधिकार कार्यालय प्रमुखांना देण्यात आला आहे. मात्र, कार्यालयाची निकड लक्षात घेऊन ही रजा रद्द करण्याचा किंवा कार्यालय प्रमुखांनी फेटाळलेली रजा विशेष बाब म्हणून मंजूर करण्याचा अधिकार माझ्याकडे राखून ठेवला आहे.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद