शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

चाऱ्याबाबत खटावचा कृषी विभाग अनभिज्ञ -वडूज येथे आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 20:37 IST

खटाव पंचायत समितीच्या सभागृहात दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुक्यात सध्या किती चारा उपलब्ध आहे, तो किती दिवस टिकेल,असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र,

ठळक मुद्देचाऱ्याबाबत खटावचा कृषी विभाग अनभिज्ञ अधिकारी, पदाधिकाºयांची उपस्थिती

वडूज : खटाव पंचायत समितीच्या सभागृहात दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुक्यात सध्या किती चारा उपलब्ध आहे, तो किती दिवस टिकेल,असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र, तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव चौगुले यांना त्याची योग्य माहिती देता आली नाही. यावेळी त्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे कºहाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी अधिकाºयांना फैलावर घेतले.

आढावा बैठकीस आ. शशिकांत शिंदे, माजी आ. प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निबांळकर, सभापती कल्पना मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, सुनीता कचरे, कल्पना खाडे, उपसभापती संतोष साळुंखे, माजी सभापती संदीप मांडवे, माजी उपसभापती कैलास घाडगे, पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण, आनंदराव भोंडवे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब इंगळे, राजेंद्र कचरे, सुनील घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चारा उपलब्धतेच्या प्रश्नांवर चौगुले यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्गाप्रसाद उंडेगावकर यांच्याकडे बोट दाखवले. त्यावर तुमची जबाबदारी असल्याने तुमच्याकडे माहिती असणे गरजेचे आहे, असा मुद्दा आ. बाळासाहेब पाटील यांनी मांडला. त्यावर कृषी अधिकाºयांनी आपल्याकडे डबल चार्ज आहे. त्यामुळे माहिती उपलब्ध नाही असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदाधिकाºयांचा अधिक आग्रह झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाची टिप्पणी वाचून दाखवत पदाधिकाºयांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

माजी आ. प्रभाकर घार्गे यांनी ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगातून पाण्याच्या टाक्या घेण्याबाबत जिल्हा परिषदेने परवानगी देण्याची मागणी केली. तर प्रदीप विधाते यांनी बोअरवेल दुरुस्ती यंत्रणा वाढविण्याबरोबर वर्गणीची अट शिथील करण्याची मागणी केली. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी उरमोडी लाभक्षेत्रात प्रामुख्याने चारा लागवड करा, महसूल विभागाने टँकर प्रस्ताव प्रलंबित ठेवू नये. तसेच दुष्काळ परिस्थितीवर पदाधिकारी, अधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी समन्वयातून मार्ग काढावा, असे आवाहन केले.सभापती कल्पना मोरे यांनी स्वागत केले. चाँद काझी यांनी सूत्रसंचालन केले. उपसभापती संतोष सांळुंखे यांनी आभार मानले.

 

-खटाव तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळ परिस्थिती अंत्यत गंभीर आहे. तरी खटाव तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीत समावेश् केला नाही. त्यामुळे खटाव दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत विधानसभेत आवाज उठवणार आहे.शशिकांत शिंदे, आमदार-खटाव तालुक्यात उरमोडी धरणातील पाणी परिसरातील पारगाव, येळीव व इतर छोट्या-मोठ्या पाझर तलावात सोडल्यास परिसरातील शेतीला पाणी मिळेल. त्यामुळे त्वरित उरमोडीचे पाणी सोडा.-बाळासाहेब पाटील, आमदारउन्हाळा सुरु होण्यापूर्वीच पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे तालुक्यातून ज्या गावांनी टँकरचे प्रस्ताव पाठविले असतील, ते प्रस्ताव तातडीने मंजूर करणे, टँकर तपासून घेणे, टँकर सुरू करण्यापूर्वी स्थानिक उपाययोजनांना प्राधान्य द्या.-संजीवराजे नाईक-निंबाळकर, अध्यक्ष, जिल्हा परिषद

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी