शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास वाहतूक कोंडीचा; कोल्हापूर-पुणे महामार्गावर प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 14:45 IST

वेळे परिसरात खंबाटकी बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने या बोगद्यातून पाण्याचे पाट वाहू लागले आहेत.

- अभिनव पवार

दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेले चाकरमानी पुन्हा आपापल्या शहरात परतत असताना ट्रॅफिक जाम मुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असून नेहमीपेक्षा दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने महामार्गावर प्रचंड गर्दी होती. खड्ड्यात हरवलेल्या महामार्गावरून वाट शोधताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली होती. त्यामुळेच ठिकठिकाणी महामार्ग ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडला.

वेळे परिसरात खंबाटकी बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने या बोगद्यातून पाण्याचे पाट वाहू लागले आहेत. यामुळेच या बोगद्यातून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. परिणामी महामार्गावर वाहनांची गर्दी वाढून ट्रॅफिक जाम ची समस्या निर्माण होते. 

खंबाटकी बोगद्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे रविवारी वेळे येथील महामार्गावर दुपारपासूनच भल्या मोठ्या वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली. या रांगा जवळपास तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाढल्या होत्या. कासव गतीने बोगद्यातून वाहतूक चालू होती व महामार्ग वाहनांच्या संख्येने प्रचंड फुलून गेला होता, त्यामुळेच वाहतूक कोंडी झाली होती. 

वाहतूक अगदीच धिम्या गतीने पुढे सरकत होती. त्यामुळे परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तासनतास थांबून कासवगतीने पुढे सरकनाऱ्या वाहनांमुळे प्रवाशी मात्र अस्वस्थ झाले होते. काही वाहने बंद पडू लागली होती त्यामुळे देखील वाहतूक कोंडी आणखी वाढत होती.

प्रत्येक सणासुदीला महामार्गावर ट्रॅफिक जाम ची समस्या उद्भवत असते. याचा थेट परिणाम येथील स्थानिकांवर होत असतो. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वसलेल्या वेळे गावातील लहानथोर ग्रामस्थांना रस्ता ओलांडताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. परिणामी अपघात होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांची आवश्यक ती डागडुजी करून वेळे परिसरातील महामार्ग तात्काळ दुरुस्त करण्यास प्रथम प्राधान्य द्यावे असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Trafficवाहतूक कोंडी